शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडमध्ये शेतकºयांची पीक कर्जाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 00:58 IST

नांदेड : कर्जाची नियमितपणे परतफेड करणाºया शेतकºयांना कर्जमाफीतून वगळण्यात आले़ त्यामुळे यंदा बहुतांश शेतकºयांनी पीक कर्ज घेण्याकडे पाठ फिरविली असून आहे ते कर्ज कायम ठेवल्याचे खरीप आणि रबी हंगामात घेतलेल्या पीक कर्जाच्या आकडेवारीवरून दिसते़ यंदा खरिपासाठी केवळ ९१ हजार १०९ शेतकºयांनी ४२३़६७ कोटी रूपयांचे पीक कर्ज घेतले आहे़ तर रबीसाठी आजपर्यंत केवळ २ टक्केच पीक कर्ज वाटप झाले आहे़

ठळक मुद्देखरिपात केवळ २८ टक्के पीक कर्ज वाटप : रबी हंगामासाठी आजपर्यंत ९ कोटींचे वाटप

श्रीनिवास भोसले ।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : कर्जाची नियमितपणे परतफेड करणाºया शेतकºयांना कर्जमाफीतून वगळण्यात आले़ त्यामुळे यंदा बहुतांश शेतकºयांनी पीक कर्ज घेण्याकडे पाठ फिरविली असून आहे ते कर्ज कायम ठेवल्याचे खरीप आणि रबी हंगामात घेतलेल्या पीक कर्जाच्या आकडेवारीवरून दिसते़ यंदा खरिपासाठी केवळ ९१ हजार १०९ शेतकºयांनी ४२३़६७ कोटी रूपयांचे पीक कर्ज घेतले आहे़ तर रबीसाठी आजपर्यंत केवळ २ टक्केच पीक कर्ज वाटप झाले आहे़छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला़ यामध्ये लावलेल्या नियम व अटींमुळे आजपर्यंत प्रत्यक्षात किती शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ झाला याची माहिती जिल्हा प्रशासनासह, बँक अधिकारी, जिल्हा उपनिबंधक कोणाकडेही आकडेवारी उपलब्ध नाही़ केवळ आॅनलाईन अर्ज केलेल्या आणि ग्रीन लिस्टमध्ये असलेल्या शेतकºयांची संख्या प्रत्येकाकडून सांगितली जात आहे़दरम्यान, कर्जाची नियमित परतफेड करणाºया लाखो शेतकºयांना कर्जमाफीतून वगळण्यात आले़ या नियमामुळे जिल्ह्यातील ६ हजार ८१० चालू बाकीदार, कर्जाची नियमितपणे परतफेड करणाºया शेतकºयांना सरसकट दीड लाखांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही़ तसेच त्यांना दिले जाणारे प्रोत्साहन अनुदानही आजपर्यंत मिळालेले नाही़ त्यामुळे कर्जमाफीचा गोंधळ आजपर्यंत तरी संपलेला नाही़कर्जमाफीनंतर बहुतांश शेतकºयांनी पीक कर्जाकडे पाठ फिरविली़ मागील वर्षात खरीप हंगामामध्ये ९२ टक्के कर्जवाटप झाले होते़ यंदा केवळ २८ टक्के वाटप झाले आहे़ खरिपासाठी १५२६़२५ कोटी रूपये उद्दिष्ट असताना ९१ हजार १०९ शेतकºयांना केवळ ३२३़६७ कोटी पीक कर्ज वाटप करण्यात आले़ तर रबीची टक्केवारी केवळ २ असून आजपर्यंत ८०४ शेतकºयांनी ८़९९ कोटी रूपये पीक कर्ज घेतले आहे़ रबीसाठी यंदा ३९९़४ कोटी रूपयांचे उद्दिष्ट आहे़जिल्ह्यात २६ राष्ट्रीयीकृत, १ महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि जिल्हा मध्यवर्ती बँक अशा एकूण २८ बँकाच्या विविध शाखांमधून पीक कर्ज वाटप केले जात आहे़ आजपर्यंत रबी हंगामासाठी वाटप केलेले पीक कर्ज पुढीलप्रमाणे- (उद्दिष्ट आणि वाटप) बँक आॅफ बरोदा (५ कोटी ३३ लाख- वाटप २८ लाख), देना बँक - ( २३ कोटी ४८ लाख - वाटप ५६ लाख), बँक आॅफ इंडिया (१७ कोटी ६९ लाख - वाटप १० लाख), एचडीएफसी बँक (५ कोटी २९ लाख - वाटप ४ कोटी ६२ लाख), आयसीआयसीआय बँक (३ कोटी ११ लाख - वाटप १ कोटी ६७ लाख), महाराष्ट्र ग्रामीण बँक ( ६८ कोटी २३ लाख - वाटप १ कोटी ७५ लाख) पीककर्ज वाटप केले आहे़युनायटेड कमर्शियल बँक, युनियन बँक, कॅनरा बँक, आयडीबीआय बँक, सेंट्रल बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र, स्टेट बँक आॅफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, पंजाब आणि सिंध बँक, आंध्र बँक, अलाहाबाद बँक, सिंडिकेट बँक, ओरिएन्टल बँक, कॉर्पोरेशन बँक, इंडियन ओहरसेझ बँक, विजया बँक, करूर वैश्य बँक, कर्नाटका बँक, अ‍ॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, डीसीबी बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक यांनी आजपर्यंत रबीसाठी एक रूपयाचेदेखील पीक कर्ज वाटप केले नाही़ यंदाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी एक महिन्याचा वेळ आहे़ आॅक्टोबरपासून रबीसाठी पीक कर्ज वाटप सुरू आहे़ तर खरिपासाठी ३१ आॅक्टोबरपर्यंत केवळ २८ टक्केच पीककर्ज वाटप झाले आहे़