शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

नांदेड जिल्ह्यातील शहरी मालमत्ताधारकांना सरसकट मावेजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:18 IST

तुळजापूर-बुटीबोरी ३६१ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर येणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, हदगाव व लोहा शहरातील मालमत्ताधारकांना ग्रामीण भागापेक्षा कमी मावेजा मिळत होता. परंतु, शहरालगतच्या ग्रामीण भागास मिळणा-या मावेजाप्रमाणेच या शहरांनाही उर्वरित मावेजा तात्काळ अदा करण्यात यावा, असा शासनाने निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे या शहरातील मालमत्ताधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे़

ठळक मुद्देजमीन अधिग्रहण : अर्धापूर, हदगाव, लोहा शहरातील मालमत्ताधारक होणार मालामाल

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : तुळजापूर-बुटीबोरी ३६१ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर येणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, हदगाव व लोहा शहरातील मालमत्ताधारकांना ग्रामीण भागापेक्षा कमी मावेजा मिळत होता. परंतु, शहरालगतच्या ग्रामीण भागास मिळणा-या मावेजाप्रमाणेच या शहरांनाही उर्वरित मावेजा तात्काळ अदा करण्यात यावा, असा शासनाने निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे या शहरातील मालमत्ताधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे़केंद्रीय रस्ते व वाहतूक विभागाच्या वतीने राज्यामध्ये रस्ते बांधणीचे काम सुरु आहे. त्याचाच भाग म्हणून ३६१ क्रमांकाच्या तुळजापूर-बुटीबोरी या रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण सुरु आहे. यासाठी अनेक शेतकºयांच्या जमिनीचे व शहरातील प्लॉटधारकांच्या मालमत्तेचे अधिग्रहण करण्यात येत आहे.हे अधिग्रहण करताना शासनाच्या मार्गदर्शक सूचना क्र.१६ (ब) व २९ (ब) या नियमांचा अवलंब करण्यात येतो. यामध्ये ग्रामीण भागाला बाजारमूल्यांचा गुणांक २ तर शहरी भागास गुणांक १ प्रमाणे मावेजा दिला जातो. यामुळे ग्रामीण भागापेक्षा जास्तीच्या किमती असलेल्या शहरी भागातील प्लॉटधारकांना मात्र मावेजा कमी मिळत आहे. त्यासोबतच ज्या शेतकºयांची जमीन अधिग्रहण करण्यात येत आहे. या शेतकºयांना सरसकट मावेजा न देता यासाठीचे विशिष्ट टप्पे पाडण्यात आले आहेत. एकाच कुटुंबातील अनेक व्यक्तींच्या नावाने जमिनी असताना मावेजा मात्र एकत्रित कुटुंबपद्धतीने देण्यात येत आहे. यामुळे जमीनधारकांवर मोठा अन्याय होत आहे. यासंदर्भात शेतकºयांनी अनेक आंदोलने केली.याची दखल घेवून माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अर्धापूर तालुक्यातील पार्डी येथे अन्यायग्रस्त शेतकºयांची भूमिका समजून घेण्यासाठी बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सरसकट मावेजा देण्यात यावा, शहरी भागासाठी २ गुणांकप्रमाणे मोबदला देण्याची मागणी केली़दरम्यानच्या काळात नितीन गडकरी व मुख्यमंत्री फडणवीस हे नांदेड जिल्ह्याच्या दौºयावर आले असता १९ एप्रिल रोजी आ. डी. पी. सावंत, आ. अमिताताई चव्हाण व माजी आ. रोहिदास चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने त्यांची विमानतळावर भेट घेवून सरसकट मावेजा देण्याची मागणी केली होती़यासंदर्भात २ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांचे अप्पर सचिव यांच्या अध्यक्षतेखाली मावेजासंदर्भात बैठक घेण्यात आली. त्यात नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, लोहा व हदगाव शहरातील प्लॉटधारकांना गुणांक २ प्रमाणे मावेजा देण्याची चर्चा झाली़ ग्रामीण भागापेक्षा या शहरातील प्लॉटधारकांना मावेजा कमी मिळत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्यामुळे यामध्ये बदल करुन ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातसुद्धा मावेजा देण्यात यावा. पूर्वी दिलेला मावेजा व सध्या मंजूर करण्यात आलेला मावेजा यातील फरक काढून विभागीय महसूल आयुक्तांंच्या मान्यतेनुसार ही रक्कम प्लॉटधारकांना तात्काळ अदा करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत़---ज्यांच्या नावे सातबारा आहे, त्यांना...मावेजा देताना एकत्र कुटुंबपद्धती प्रमाणे न देता त्याऐवजी ज्यांच्या नावे सातबारा उतारा आहे, त्या व्यक्तींना हा मावेजा देण्यात यावा. रस्त्यासाठी जी जमीन शासनाने अधिग्रहित केली आहे़ त्याचे टप्पे न पाडता सरसकट मावेजा देण्यात यावा. हे प्रकरण शासनाकडे विचाराधीन असल्यामुळे यावर लवकरच निर्णय अपेक्षित असून यासाठीही खा.अशोकराव चव्हाण प्रयत्नशील आहेत. खा़ चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश आल्यामुळे जिल्ह्यातील अर्धापूर, लोहा व हदगाव शहरातील प्लॉटधारकांसह ग्रामीण भागातील जमीनधारकांना न्याय मिळाला आहे़

टॅग्स :Nandedनांदेडhighwayमहामार्गfundsनिधी