शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

नांदेड जिल्ह्यातील शहरी मालमत्ताधारकांना सरसकट मावेजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:18 IST

तुळजापूर-बुटीबोरी ३६१ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर येणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, हदगाव व लोहा शहरातील मालमत्ताधारकांना ग्रामीण भागापेक्षा कमी मावेजा मिळत होता. परंतु, शहरालगतच्या ग्रामीण भागास मिळणा-या मावेजाप्रमाणेच या शहरांनाही उर्वरित मावेजा तात्काळ अदा करण्यात यावा, असा शासनाने निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे या शहरातील मालमत्ताधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे़

ठळक मुद्देजमीन अधिग्रहण : अर्धापूर, हदगाव, लोहा शहरातील मालमत्ताधारक होणार मालामाल

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : तुळजापूर-बुटीबोरी ३६१ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर येणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, हदगाव व लोहा शहरातील मालमत्ताधारकांना ग्रामीण भागापेक्षा कमी मावेजा मिळत होता. परंतु, शहरालगतच्या ग्रामीण भागास मिळणा-या मावेजाप्रमाणेच या शहरांनाही उर्वरित मावेजा तात्काळ अदा करण्यात यावा, असा शासनाने निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे या शहरातील मालमत्ताधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे़केंद्रीय रस्ते व वाहतूक विभागाच्या वतीने राज्यामध्ये रस्ते बांधणीचे काम सुरु आहे. त्याचाच भाग म्हणून ३६१ क्रमांकाच्या तुळजापूर-बुटीबोरी या रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण सुरु आहे. यासाठी अनेक शेतकºयांच्या जमिनीचे व शहरातील प्लॉटधारकांच्या मालमत्तेचे अधिग्रहण करण्यात येत आहे.हे अधिग्रहण करताना शासनाच्या मार्गदर्शक सूचना क्र.१६ (ब) व २९ (ब) या नियमांचा अवलंब करण्यात येतो. यामध्ये ग्रामीण भागाला बाजारमूल्यांचा गुणांक २ तर शहरी भागास गुणांक १ प्रमाणे मावेजा दिला जातो. यामुळे ग्रामीण भागापेक्षा जास्तीच्या किमती असलेल्या शहरी भागातील प्लॉटधारकांना मात्र मावेजा कमी मिळत आहे. त्यासोबतच ज्या शेतकºयांची जमीन अधिग्रहण करण्यात येत आहे. या शेतकºयांना सरसकट मावेजा न देता यासाठीचे विशिष्ट टप्पे पाडण्यात आले आहेत. एकाच कुटुंबातील अनेक व्यक्तींच्या नावाने जमिनी असताना मावेजा मात्र एकत्रित कुटुंबपद्धतीने देण्यात येत आहे. यामुळे जमीनधारकांवर मोठा अन्याय होत आहे. यासंदर्भात शेतकºयांनी अनेक आंदोलने केली.याची दखल घेवून माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अर्धापूर तालुक्यातील पार्डी येथे अन्यायग्रस्त शेतकºयांची भूमिका समजून घेण्यासाठी बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सरसकट मावेजा देण्यात यावा, शहरी भागासाठी २ गुणांकप्रमाणे मोबदला देण्याची मागणी केली़दरम्यानच्या काळात नितीन गडकरी व मुख्यमंत्री फडणवीस हे नांदेड जिल्ह्याच्या दौºयावर आले असता १९ एप्रिल रोजी आ. डी. पी. सावंत, आ. अमिताताई चव्हाण व माजी आ. रोहिदास चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने त्यांची विमानतळावर भेट घेवून सरसकट मावेजा देण्याची मागणी केली होती़यासंदर्भात २ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांचे अप्पर सचिव यांच्या अध्यक्षतेखाली मावेजासंदर्भात बैठक घेण्यात आली. त्यात नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, लोहा व हदगाव शहरातील प्लॉटधारकांना गुणांक २ प्रमाणे मावेजा देण्याची चर्चा झाली़ ग्रामीण भागापेक्षा या शहरातील प्लॉटधारकांना मावेजा कमी मिळत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्यामुळे यामध्ये बदल करुन ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातसुद्धा मावेजा देण्यात यावा. पूर्वी दिलेला मावेजा व सध्या मंजूर करण्यात आलेला मावेजा यातील फरक काढून विभागीय महसूल आयुक्तांंच्या मान्यतेनुसार ही रक्कम प्लॉटधारकांना तात्काळ अदा करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत़---ज्यांच्या नावे सातबारा आहे, त्यांना...मावेजा देताना एकत्र कुटुंबपद्धती प्रमाणे न देता त्याऐवजी ज्यांच्या नावे सातबारा उतारा आहे, त्या व्यक्तींना हा मावेजा देण्यात यावा. रस्त्यासाठी जी जमीन शासनाने अधिग्रहित केली आहे़ त्याचे टप्पे न पाडता सरसकट मावेजा देण्यात यावा. हे प्रकरण शासनाकडे विचाराधीन असल्यामुळे यावर लवकरच निर्णय अपेक्षित असून यासाठीही खा.अशोकराव चव्हाण प्रयत्नशील आहेत. खा़ चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश आल्यामुळे जिल्ह्यातील अर्धापूर, लोहा व हदगाव शहरातील प्लॉटधारकांसह ग्रामीण भागातील जमीनधारकांना न्याय मिळाला आहे़

टॅग्स :Nandedनांदेडhighwayमहामार्गfundsनिधी