शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यातील शहरी मालमत्ताधारकांना सरसकट मावेजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:18 IST

तुळजापूर-बुटीबोरी ३६१ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर येणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, हदगाव व लोहा शहरातील मालमत्ताधारकांना ग्रामीण भागापेक्षा कमी मावेजा मिळत होता. परंतु, शहरालगतच्या ग्रामीण भागास मिळणा-या मावेजाप्रमाणेच या शहरांनाही उर्वरित मावेजा तात्काळ अदा करण्यात यावा, असा शासनाने निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे या शहरातील मालमत्ताधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे़

ठळक मुद्देजमीन अधिग्रहण : अर्धापूर, हदगाव, लोहा शहरातील मालमत्ताधारक होणार मालामाल

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : तुळजापूर-बुटीबोरी ३६१ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर येणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, हदगाव व लोहा शहरातील मालमत्ताधारकांना ग्रामीण भागापेक्षा कमी मावेजा मिळत होता. परंतु, शहरालगतच्या ग्रामीण भागास मिळणा-या मावेजाप्रमाणेच या शहरांनाही उर्वरित मावेजा तात्काळ अदा करण्यात यावा, असा शासनाने निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे या शहरातील मालमत्ताधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे़केंद्रीय रस्ते व वाहतूक विभागाच्या वतीने राज्यामध्ये रस्ते बांधणीचे काम सुरु आहे. त्याचाच भाग म्हणून ३६१ क्रमांकाच्या तुळजापूर-बुटीबोरी या रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण सुरु आहे. यासाठी अनेक शेतकºयांच्या जमिनीचे व शहरातील प्लॉटधारकांच्या मालमत्तेचे अधिग्रहण करण्यात येत आहे.हे अधिग्रहण करताना शासनाच्या मार्गदर्शक सूचना क्र.१६ (ब) व २९ (ब) या नियमांचा अवलंब करण्यात येतो. यामध्ये ग्रामीण भागाला बाजारमूल्यांचा गुणांक २ तर शहरी भागास गुणांक १ प्रमाणे मावेजा दिला जातो. यामुळे ग्रामीण भागापेक्षा जास्तीच्या किमती असलेल्या शहरी भागातील प्लॉटधारकांना मात्र मावेजा कमी मिळत आहे. त्यासोबतच ज्या शेतकºयांची जमीन अधिग्रहण करण्यात येत आहे. या शेतकºयांना सरसकट मावेजा न देता यासाठीचे विशिष्ट टप्पे पाडण्यात आले आहेत. एकाच कुटुंबातील अनेक व्यक्तींच्या नावाने जमिनी असताना मावेजा मात्र एकत्रित कुटुंबपद्धतीने देण्यात येत आहे. यामुळे जमीनधारकांवर मोठा अन्याय होत आहे. यासंदर्भात शेतकºयांनी अनेक आंदोलने केली.याची दखल घेवून माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अर्धापूर तालुक्यातील पार्डी येथे अन्यायग्रस्त शेतकºयांची भूमिका समजून घेण्यासाठी बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सरसकट मावेजा देण्यात यावा, शहरी भागासाठी २ गुणांकप्रमाणे मोबदला देण्याची मागणी केली़दरम्यानच्या काळात नितीन गडकरी व मुख्यमंत्री फडणवीस हे नांदेड जिल्ह्याच्या दौºयावर आले असता १९ एप्रिल रोजी आ. डी. पी. सावंत, आ. अमिताताई चव्हाण व माजी आ. रोहिदास चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने त्यांची विमानतळावर भेट घेवून सरसकट मावेजा देण्याची मागणी केली होती़यासंदर्भात २ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांचे अप्पर सचिव यांच्या अध्यक्षतेखाली मावेजासंदर्भात बैठक घेण्यात आली. त्यात नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, लोहा व हदगाव शहरातील प्लॉटधारकांना गुणांक २ प्रमाणे मावेजा देण्याची चर्चा झाली़ ग्रामीण भागापेक्षा या शहरातील प्लॉटधारकांना मावेजा कमी मिळत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्यामुळे यामध्ये बदल करुन ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातसुद्धा मावेजा देण्यात यावा. पूर्वी दिलेला मावेजा व सध्या मंजूर करण्यात आलेला मावेजा यातील फरक काढून विभागीय महसूल आयुक्तांंच्या मान्यतेनुसार ही रक्कम प्लॉटधारकांना तात्काळ अदा करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत़---ज्यांच्या नावे सातबारा आहे, त्यांना...मावेजा देताना एकत्र कुटुंबपद्धती प्रमाणे न देता त्याऐवजी ज्यांच्या नावे सातबारा उतारा आहे, त्या व्यक्तींना हा मावेजा देण्यात यावा. रस्त्यासाठी जी जमीन शासनाने अधिग्रहित केली आहे़ त्याचे टप्पे न पाडता सरसकट मावेजा देण्यात यावा. हे प्रकरण शासनाकडे विचाराधीन असल्यामुळे यावर लवकरच निर्णय अपेक्षित असून यासाठीही खा.अशोकराव चव्हाण प्रयत्नशील आहेत. खा़ चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश आल्यामुळे जिल्ह्यातील अर्धापूर, लोहा व हदगाव शहरातील प्लॉटधारकांसह ग्रामीण भागातील जमीनधारकांना न्याय मिळाला आहे़

टॅग्स :Nandedनांदेडhighwayमहामार्गfundsनिधी