शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
2
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
3
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
6
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
7
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
8
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
9
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
10
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
11
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
12
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
13
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
14
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
15
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
17
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
18
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
19
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
20
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार

नांदेड जिल्ह्यातपंतप्रधान रोजगारनिर्मिती नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:49 IST

बेरोजगारांसाठी असलेल्या पंतप्रधान रोजगारनिर्मिती कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात बँकांच्या उदासीनतेमुळे उद्दिष्टापेक्षा निम्म्याच अर्जदारांना या योजनेचा लाभ मिळाला आहे़ त्यामुळे बेरोजगारी कमी करण्याच्या शासनाच्या धोरणालाच खीळ बसत आहे़ जिल्हा उद्योग केंद्रामार्फत बँकांकडे ७०५ प्रस्ताव पाठविण्यात आले होते़ त्यापैकी तब्बल ६४५ प्रस्ताव विविध कारणांमुळे नाकारण्यात आले आहेत़ उद्दिष्टाच्या तुलनेत सात पट प्रस्ताव आले होते़ परंतु त्यापैकी निम्मेच प्रस्ताव मंजूर झाले आहेत़

ठळक मुद्देबँकांची उदासीनता : बेरोजगारांच्या ७०५ प्रस्तावांपैकी ६५४ नाकारले

शिवराज बिचेवार।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : बेरोजगारांसाठी असलेल्या पंतप्रधान रोजगारनिर्मिती कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात बँकांच्या उदासीनतेमुळे उद्दिष्टापेक्षा निम्म्याच अर्जदारांना या योजनेचा लाभ मिळाला आहे़ त्यामुळे बेरोजगारी कमी करण्याच्या शासनाच्या धोरणालाच खीळ बसत आहे़ जिल्हा उद्योग केंद्रामार्फत बँकांकडे ७०५ प्रस्ताव पाठविण्यात आले होते़ त्यापैकी तब्बल ६४५ प्रस्ताव विविध कारणांमुळे नाकारण्यात आले आहेत़ उद्दिष्टाच्या तुलनेत सात पट प्रस्ताव आले होते़ परंतु त्यापैकी निम्मेच प्रस्ताव मंजूर झाले आहेत़केंद्र सरकारच्या सूक्ष्म,लघू व मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत बेरोजगारांसाठी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविण्यात येतो़ या योजनेच्या माध्यमातून बेरोजगारांना लघू उद्योग तसेच सेवा उद्योगासाठी आर्थिक सहाय्य केले जाते़ यासाठी जिल्हा उद्योग केंद्रात आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज द्यावा लागतो़ २०१७-१८ या आर्थिक वर्षात पंतप्रधान रोजगारनिर्मिती कार्यक्रमाअंतर्गत नांदेड जिल्ह्याला १०७ प्रकल्पांचे उद्दिष्ट देण्यात आले होते़जिल्हा उद्योग केंद्राकडून रितसर आलेल्या अर्जापैकी छाननी करुन ७०५ प्रस्ताव बँकेकडे पाठविण्यात आले होते़ मार्जिन मनीसह २१२ कोटी १२ लाखांचे हे प्रस्ताव होते़ परंतु, बँकांकडे हे प्रस्ताव आल्यानंतर त्यातील केवळ ६० प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे़ १ कोटी ५५ लाख १२ हजार रुपये कर्जमागणी या प्रस्तावानुसार होते़ त्यातील ३१ प्रकरणांतील ८४ लाख ८ हजार रुपये मिळाले आहेत़ एकूण २३ बँकांकडे हे प्रस्ताव पाठविण्यात आले होते़ परंतु, निम्मेच प्रस्ताव मंजूर झाल्याने बेरोजगारी कमी कशी होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे़ दरम्यान, मुद्रा योजनेची अवस्थाही अशीच काहीशी आहे़ अनेक बेरोजगारांनी मुद्रासाठी अर्ज केले़ परंतु कामाचा व्याप अधिक असल्याचे सांगून ही प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली़या कारणामुळे नाकारले प्रस्तावउद्योगास वाव नसणे, उद्योग उभा करण्यासाठी पोषक स्थिती नसणे, प्रस्तावित उद्योग आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची शक्यता नसणे, दाखल प्रस्ताव संबंधित बँकेच्या कार्यक्षेत्रात नसणे, बँकेला हवे असलेले तारण न मिळणे, उद्योगासाठी पुरेशी जागा नसणे़अर्जदाराला उद्योग व्यवसायाचा अनुभव नसणे, कर्ज मंजूर करण्यात बँक अधिकाऱ्यांची सकारात्मक भूमिका नसणे, कर्ज मंजुरीचे दायित्व स्वीकारण्याचे धाडस टाळणे आदी कारणांमुळे हे प्रस्ताव नाकारण्यात आले आहेत़बँक कर्मचाºयांच्या कामाचा वाढला व्यापजिल्हा उद्योग केंद्राकडून बँकांकडे अनेक योजनांचे प्रस्ताव पाठविले जातात़ परंतु कर्जमाफी, पीक विमा यासह इतर योजनांची कामेच अद्याप पूर्ण झाली नाहीत़ त्यामुळे बँक कर्मचारी कामाचा ताण असल्याचे सांगून उद्योग केंद्राकडून पाठविण्यात आलेले अनेक प्रस्ताव नाकारतात किंवा प्रलंबित ठेवतात़ त्यात अपुºया कर्मचाºयांची समस्याही कायम आहे़सरकारी योजनेतून कर्ज मिळते म्हणून बेरोजगार जिल्हा उद्योग केंद्रामार्फत प्रस्ताव करतात़ मात्र त्यासाठी आवश्यक बाबींचे पालन करत नाहीत़ तसेच निवडलेला उद्योग, सेवा उद्योगाच्या पूर्वप्राथमिक अभ्यास न करता अर्ज केले जातात़ तसेच कर्ज उचलण्यासाठी सुरु करण्यापुरतेच उद्योग दाखविण्याचेही प्रकारही घडतात़

टॅग्स :NandedनांदेडbankबँकjobनोकरीEmployeeकर्मचारी