शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

नांदेड जिल्ह्यात अवकाळीने पळविला तोंडचा घास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 00:28 IST

फेब्रुवारीमधील गारपिटीच्या नुकसानीने बळीराजा सावरतो न सावरतो तोच रविवारी झालेल्या अवकाळीसह गारपिटीने शेकडो हेक्टरवरील फळबागांसह हळद, ऊस पिकांना फटका बसला आहे़ यामध्ये नांदेड, अर्धापूर, हदगाव, मुदखेड तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे़

ठळक मुद्देशेकडो हेक्टरला फटका : केळीच्या बागा झाल्या आडव्या, हळदीचा रंगही पडला फिका

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : फेब्रुवारीमधील गारपिटीच्या नुकसानीने बळीराजा सावरतो न सावरतो तोच रविवारी झालेल्या अवकाळीसह गारपिटीने शेकडो हेक्टरवरील फळबागांसह हळद, ऊस पिकांना फटका बसला आहे़ यामध्ये नांदेड, अर्धापूर, हदगाव, मुदखेड तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे़हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार,रविवारी नांदेड जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने झोडपले़ वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटांत पाऊस झाला़ नांदेड शहर व परिसरात तासभर झालेल्या पावसाने शहरातील नाल्या ओहरफ्लो होवून सर्वत्र रस्त्यांनी पाणीच पाणी झाले होते़ तर होर्डिंग्ज आणि दुकानांसमोरील बॅनर वा-याने रस्त्यावर येवून पडले होते़ तर ग्रामीण भागात आंबा, केळी, चिकू, ऊस आदी पिकांसह अनेक ठिकाणच्या शेतातील झोपड्या वादळी वाºयाने जमीनदोस्त केल्या़ घरावरील पत्रे उडूनही नुकसान झाल्याच्या घटना नांदेड तालुक्यातील तळणी, धानोरा परिसरात घडल्या़ वाºयाचा जोर प्रचंड असल्याने झाडांच्या फांद्या पडून महावितरणचे मोठे नुकसान झाले़इसापूर धरणाचे पाणी न मिळाल्याने अर्धापूर तालुक्यातील बहुतांश शेतकºयांनी आपल्या केळीच्या बागा तोडून काढल्या होत्या़ त्यातच काही शेतकºयांनी उपलब्ध पाण्यामध्ये ठिबक तसेच जिवाचे रान करून आपल्या केळी बागा जगविल्या आहेत़ केळीचे घड नुकतेच भरत असताना वादळी वाºयाने कहर केला़ यात बहुतांश ठिकाणच्या बागांना फटका बसला असून उभ्या केळी आडव्या झाल्या आहेत़ तसेच हळद वाळून ती ढोल करायला (पॉलिश) आली असता अवकाळीने गाठले़ हळद भिजल्याने कोट्यवधी रूपयांचा तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे़ साडेआठ हजार रूपये प्रतिक्विंटल मिळणारा भाव हळद भिजल्याने निम्मादेखील मिळणार नाही़नांदेड तालुक्यातील राहाटी, तळणी, धानोरा आदी परिसरातील आंब्यासह संत्रा, मोसंबी, केळीच्या बागांचे नुकसान झाले आहे़ वाºयाच्या जोराने उभा ऊसदेखील आडवा झाला आहे़ तालुक्यात अंदाजे २०० हेक्टर बागायती आणि ५० हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार किरण अंबेकर यांनी दिली़ मंगळवारपासून प्रत्यक्षात पंचनाम्यांना सुरूवात होईल़ यानंतर नुकसानीचा खरा आकडा समोर येईल, असेही अंबेकर यांनी सांगितले़ पाऊस अन् गारांमुळे पार्डी परिसरातील निमगाव देळूब, कारवाडी, चोरंबा, शेणी भागातील केळी, ज्वारी, टरबूज, हळद, आंब्यासह भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले़ सोसाट्याच्या वाºयामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेली़ झाडे उन्मळून पडली़ निमगाव येथे केळीचे नुकसान झाले असून हातात आलेले केळीची बाग गेल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत़कर्नाटकला जाणारी डाळही भिजलीमाहूर तालुक्यातील वाई बाजारसह परिसरात वादळी वाºयासह गारांचा पाऊस झाला़ यामध्ये वाई परिसरातील वादळी वाºयासह पावसाने परिसरातील बागायतीचे पिकांचे नुकसान झाले़ तसेच जय योगेश्वर अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज (दालमिल)मधील हजारो क्विंटल तूरडाळ भिजली़दालमिलचे टिनशेड जमिनीच्या दिशेने झुकल्याने शेडमध्ये असलेली १२६०० पोती तूरडाळ पावसाने भिजून खराब झाली़ ही डाळ कर्नाटक सरकारला पुरवठा करायची होती. सदर पोत्यामध्ये १ किलो वजनी असलेले २५ पॉकीट होते़ तसेच या शेडच्या परिसरात ३९० किलो मोकळी तूरडाळ व ३० क्विंटल हरभºयाचेही नुकसान झाले़ यात मोठे नुकसान झाल्याचे इंडस्ट्रीजचे मालक अतीश गेंटलवार यांनी सांगितले़महसूल विभागाचे मंडळ निरीक्षक व्ही़एमग़ड्डमवार, अव्वल कारकून एस़पी़जुकंटवार, संतोष पवार, तलाठी काळे यांनी पंचनामा केला़फेब्रुवारीत झालेल्या गारपिटीत २०० कोटींचे अनुदान वाटपफेब्रुवारीमध्ये झालेल्या गारपिटीने लिंबगाव परिसरातील फळबागांसह उन्हाळी ज्वारीचे मोठे नुकसान झाले होते़ दरम्यान, शासनाच्या वतीने दीड ते दोन महिन्यांतच नुकसानग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदत दिली़ पिकानुसार शेतकºयांना अनुदान देण्यात आले़ नांदेड तालुक्यात जवळपास २०० कोटी रूपयांचे अनुदान शेतकºयांना वाटप करण्यात आले़ अवकाळीने वाई बाजार येथील अ‍ॅग्रो इंडस्ट्रीचे नुकसान झाले आहे़नांदेड उत्तरमध्ये नुकसानीची आ. डी. पी. सावंत यांनी पाहणी करून शेतकºयांना तात्काळ मदत करण्याची मागणी केली़ नाळेश्वर, राहाटी व ढोकी गावांतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़ आ़सावंत यांनी भेट देवून शेतकºयांशी संवाद साधला़ यावेळी सभापती सुखदेव जाधव, साहेबराव धनगे, दीपक पाटील, नरहरी वाघ, माधवराव वाघ, रंगनाथ वाघ, बबन वाघमारे, अतुल वाघ आदी उपस्थित होते़

टॅग्स :RainपाऊसHailstormगारपीटfruitsफळे