शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नांदेड जिल्हाही कोवळ्या कळ्या असुरक्षितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:25 IST

नांदेड जिल्हाही कोवळ्या कळ्यांसाठी असुरक्षितच असल्याचे गेल्या पंधरा महिन्यांतील आकडेवारीवरुन स्पष्ट होते़ २०१७ या वर्षात जिल्ह्यात ६५ अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटना घडल्या होत्या़ तर यावर्षी गेल्या तीन महिन्यांतच २६ कोवळ्या कळ्यांना खुडण्यात आले आहे़

ठळक मुद्दे९१ अल्पवयीन मुलींवर बलात्कार : हुंड्याच्या पैशासाठी ११ महिलांना गमवावा लागला जीव

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : कठुआ, उन्नाव यासह शेजारील परभणी जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवरील पाशवी बलात्काराच्या घटनांनी सर्वसामान्यांना हादरवून सोडले असताना नांदेड जिल्हाही कोवळ्या कळ्यांसाठी असुरक्षितच असल्याचे गेल्या पंधरा महिन्यांतील आकडेवारीवरुन स्पष्ट होते़ २०१७ या वर्षात जिल्ह्यात ६५ अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटना घडल्या होत्या़ तर यावर्षी गेल्या तीन महिन्यांतच २६ कोवळ्या कळ्यांना खुडण्यात आले आहे़ दिवसेंदिवस अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांत होणारी वाढ चिंताजनक आहे़कठुआ आणि उन्नाव येथील घटनेने देश हादरला आहे़ देशभर या कृत्याच्या निषेधार्थ मोर्चे काढण्यात येत आहेत़ या घटनांनी कोवळ्या कळ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे़ याबाबत केंद्र शासनाने बलात्काराच्या कायद्यात सुधारणा केली़ परंतु त्यामुळे खरोखरच अशा घटनांवर आळा घालणे शक्य होईल का? याबाबत सर्वांच्याच मनात सांशकता आहे़ त्यात दिवसेंदिवस अल्पवयीन मुली आणि महिलांवरील अत्याचारांच्या घटनांत वाढच होत आहे़यातील मोजक्याच घटनांची पोलिसांत नोंद होते़ अनेक पीडितांना पोलीस ठाण्यापर्यंत जावूच दिले जात नाही़ जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांत २६ अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या घटना घडल्या़ तीन दिवसाला एक बलात्कार असे चिंतानजक हे प्रमाण आहे़ २०१७ मध्ये वर्षभरात महिलांवरील बलात्काराच्या ८५ घटना घडल्या आहेत़ छेडछाड आणि विनयभंगांच्या १७७ तक्रारीच ठाण्यापर्यंत पोहोचल्या़ प्रत्यक्षात याची संख्या कितीतरी पटीने जास्त आहे़ अल्पवयीन मुली व महिलांना लग्नाचे किंवा इतर आमिष दाखवून पळवून नेल्याचे ८६ प्रकार उघडकीस आले आहेत़तर पुरुषी अत्याचाराला बळी पडलेल्या १७ महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे़ जिल्ह्यात अशाप्रकारे महिलांवरील अत्याचारात दरवर्षी वाढ होताना दिसत आहे़ महिलांसाठी कठोर कायदे करण्यात आले़ परंतु प्रत्यक्षात पीडितांना ठाण्यापर्यंतच पोहोचू दिले जात नाही़ त्या ठाण्यापर्यंत पोहोचल्या गुन्हा नोंदविला तरी, त्यानंतर दबावतंत्रांचा वापर करण्यात येतो़त्यामुळे अनेक पीडितांना न्याय मिळतच नाही़ माहूर, किनवट यासारख्या आदिवासी भागात तर अल्पवयीन मुली, महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण अधिक आहे़ परंतु अशिक्षितपणामुळे अनेक प्रकरणे प्रतिष्ठितांच्या मध्यस्थीने तिथेच संपविली जातात़ त्यामुळे पीडितांना न्याय मिळत नाही़२५१ महिलांनी केला आत्महत्येचा प्रयत्नसासरच्या मंडळीकडून लग्नानंतर होणाऱ्या हुंड्याच्या पैशाची मागणी पूर्ण न करु शकल्याने ११ महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे़ तर २९४ महिलांनी या विरोधात बंड पुकारत सासरच्या मंडळींना ठाण्याच्या पायरी चढायला भाग पाडले़ यामध्ये १३ महिलांवर त्यांच्याच कुटुंबातील सदस्यांकडून प्राणघातक हल्ला केल्याच्या घटनाही घडल्या आहेत़ तर २५१ महिलांनी आत्महत्या करुन आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न केला आहे़ महिला अत्याचारांची गेल्या वर्षभरातील ही आकडेवारी चिंताजनक असून याबाबत ठोस पावले उचलण्याची गरज आहे़ महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी पोलीस दलाकडून अनेक पथकांची स्थापना करण्यात आली आहे़

टॅग्स :Rapeबलात्कारWomenमहिलाCrimeगुन्हा