शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्हाही कोवळ्या कळ्या असुरक्षितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:25 IST

नांदेड जिल्हाही कोवळ्या कळ्यांसाठी असुरक्षितच असल्याचे गेल्या पंधरा महिन्यांतील आकडेवारीवरुन स्पष्ट होते़ २०१७ या वर्षात जिल्ह्यात ६५ अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटना घडल्या होत्या़ तर यावर्षी गेल्या तीन महिन्यांतच २६ कोवळ्या कळ्यांना खुडण्यात आले आहे़

ठळक मुद्दे९१ अल्पवयीन मुलींवर बलात्कार : हुंड्याच्या पैशासाठी ११ महिलांना गमवावा लागला जीव

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : कठुआ, उन्नाव यासह शेजारील परभणी जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवरील पाशवी बलात्काराच्या घटनांनी सर्वसामान्यांना हादरवून सोडले असताना नांदेड जिल्हाही कोवळ्या कळ्यांसाठी असुरक्षितच असल्याचे गेल्या पंधरा महिन्यांतील आकडेवारीवरुन स्पष्ट होते़ २०१७ या वर्षात जिल्ह्यात ६५ अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटना घडल्या होत्या़ तर यावर्षी गेल्या तीन महिन्यांतच २६ कोवळ्या कळ्यांना खुडण्यात आले आहे़ दिवसेंदिवस अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांत होणारी वाढ चिंताजनक आहे़कठुआ आणि उन्नाव येथील घटनेने देश हादरला आहे़ देशभर या कृत्याच्या निषेधार्थ मोर्चे काढण्यात येत आहेत़ या घटनांनी कोवळ्या कळ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे़ याबाबत केंद्र शासनाने बलात्काराच्या कायद्यात सुधारणा केली़ परंतु त्यामुळे खरोखरच अशा घटनांवर आळा घालणे शक्य होईल का? याबाबत सर्वांच्याच मनात सांशकता आहे़ त्यात दिवसेंदिवस अल्पवयीन मुली आणि महिलांवरील अत्याचारांच्या घटनांत वाढच होत आहे़यातील मोजक्याच घटनांची पोलिसांत नोंद होते़ अनेक पीडितांना पोलीस ठाण्यापर्यंत जावूच दिले जात नाही़ जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांत २६ अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या घटना घडल्या़ तीन दिवसाला एक बलात्कार असे चिंतानजक हे प्रमाण आहे़ २०१७ मध्ये वर्षभरात महिलांवरील बलात्काराच्या ८५ घटना घडल्या आहेत़ छेडछाड आणि विनयभंगांच्या १७७ तक्रारीच ठाण्यापर्यंत पोहोचल्या़ प्रत्यक्षात याची संख्या कितीतरी पटीने जास्त आहे़ अल्पवयीन मुली व महिलांना लग्नाचे किंवा इतर आमिष दाखवून पळवून नेल्याचे ८६ प्रकार उघडकीस आले आहेत़तर पुरुषी अत्याचाराला बळी पडलेल्या १७ महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे़ जिल्ह्यात अशाप्रकारे महिलांवरील अत्याचारात दरवर्षी वाढ होताना दिसत आहे़ महिलांसाठी कठोर कायदे करण्यात आले़ परंतु प्रत्यक्षात पीडितांना ठाण्यापर्यंतच पोहोचू दिले जात नाही़ त्या ठाण्यापर्यंत पोहोचल्या गुन्हा नोंदविला तरी, त्यानंतर दबावतंत्रांचा वापर करण्यात येतो़त्यामुळे अनेक पीडितांना न्याय मिळतच नाही़ माहूर, किनवट यासारख्या आदिवासी भागात तर अल्पवयीन मुली, महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण अधिक आहे़ परंतु अशिक्षितपणामुळे अनेक प्रकरणे प्रतिष्ठितांच्या मध्यस्थीने तिथेच संपविली जातात़ त्यामुळे पीडितांना न्याय मिळत नाही़२५१ महिलांनी केला आत्महत्येचा प्रयत्नसासरच्या मंडळीकडून लग्नानंतर होणाऱ्या हुंड्याच्या पैशाची मागणी पूर्ण न करु शकल्याने ११ महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे़ तर २९४ महिलांनी या विरोधात बंड पुकारत सासरच्या मंडळींना ठाण्याच्या पायरी चढायला भाग पाडले़ यामध्ये १३ महिलांवर त्यांच्याच कुटुंबातील सदस्यांकडून प्राणघातक हल्ला केल्याच्या घटनाही घडल्या आहेत़ तर २५१ महिलांनी आत्महत्या करुन आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न केला आहे़ महिला अत्याचारांची गेल्या वर्षभरातील ही आकडेवारी चिंताजनक असून याबाबत ठोस पावले उचलण्याची गरज आहे़ महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी पोलीस दलाकडून अनेक पथकांची स्थापना करण्यात आली आहे़

टॅग्स :Rapeबलात्कारWomenमहिलाCrimeगुन्हा