शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या काळात नांदेडचा विकास खुंटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 00:51 IST

राज्यात गेल्या साडेचार वर्षांत गुंतवणूक नाही, कारखाने नाहीत, रोजगार नाही़ गेल्या ४५ वर्षांत जेवढी नाही तेवढी यावेळी बेरोजगारी वाढली आहे़ भाजपाच्या काळात नांदेडचा विकास खुंटला असून काँग्रेसची सत्ता आल्यास नांदेडातच रोजगार निर्माण करण्यात येईल़

ठळक मुद्देअशोकराव चव्हाण रोजगारवाढीसाठी विशेष प्रयत्न करणार

नांदेड : राज्यात गेल्या साडेचार वर्षांत गुंतवणूक नाही, कारखाने नाहीत, रोजगार नाही़ गेल्या ४५ वर्षांत जेवढी नाही तेवढी यावेळी बेरोजगारी वाढली आहे़ भाजपाच्या काळात नांदेडचा विकास खुंटला असून काँग्रेसची सत्ता आल्यास नांदेडातच रोजगार निर्माण करण्यात येईल़ नांदेडच्या तरुणांना बाहेर जाण्याची वेळ येणार नाही, असे प्रतिपादन खा़ अशोकराव चव्हाण यांनी केले़लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बोंढार येथे आयोजित सभेत ते बोलत होते़ यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री नसीम खान, आ़डी़पी़सावंत यांची उपस्थिती होती़ चव्हाण म्हणाले, डॉ़बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान जाळले जात असताना भाजपा सरकार मात्र गप्प बसले होते़ सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय जनहितकारी निर्णय घेतात़ मात्र भाजप सरकार तेच घेतलेले निर्णय पुन्हा न्यायालयाकडे पुनर्विचारासाठी पाठविते़ देशात अशाप्रकारे हुकूमशाही कारभार सुरु असल्याचा घणाघात खा़अशोकराव चव्हाण यांनी केला़कॉग्रेस पक्ष स्वायत्त, संविधानिक संस्थांना स्वतंत्रता देणारा पक्ष आहे़ तर भाजप, आरएसएस संविधान मानत नाहीत़ विचार थोपविण्याचे तसेच प्रत्येक संस्थेवर आरएसएसच्या व्यक्तीचा सहभाग ठेवणे हेच एकमेव काम सुरु आहे़ असेही ते म्हणाले़ तर हॉटेल सिटी प्राईडमध्ये बुद्धिजीवी वर्गाची बैठक घेण्यात आली़ या बैठकीत चव्हाण म्हणाले, भाजपाने देशातील व्यापाऱ्यांना चोर ठरविले आहे़ जीएसटी, नोटाबंदी करुन वाताहत केली आहे़ देशात प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचा अधिकार आहे़ परंतु पंतप्रधानांनी चार्टर्ड अकाऊंटन्ट यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावून दम दिला, असेही ते म्हणाले़ यावेळी अ‍ॅड़विजय भोपी, अ‍ॅड़सिद्दीकी, जयप्रकाश फलोर, गुणाल मालपाणी, अ‍ॅड़भोसले, अ‍ॅड़हांडे, रहेमान सिद्दीकी, गोविंद मुंदडा यांची उपस्थिती होती़शीख बांधवांशी साधला संवाद- गुरुद्वारा गेट क्रमांक ५ येथे अशोकराव चव्हाण यांनी शीख बांधवांशी संवाद साधला़ गुरुद्वारामुळेच नांदेडची ओळख असून भाजपाच्या काळात धर्मामध्ये ढवळाढवळ करण्यात येत आहे़ काँग्रेसने अशी ढवळाढवळ कधीही केली नाही़ परंतु भाजपच्या काळात मात्र सरकार गुरुद्वाराच्या प्रबंधनाचा चेअरमन ठरवित आहे़ कारण पंतप्रधानांना त्या जागी आरएसएस-भाजपाचा व्यक्ती पाहिजे़ पीएमच्या ‘मन की बात नसून दिल की बात’ ची गरज आहे़ भाजप सरकार देश आणि राज्यात भीतीचे वातावरण निर्माण करीत आहे़ कोणी काय खायचं, काय बोलायचं, कोणते कपडे घालायचे हे सरकारच ठरवित आहे़ विचार थोपवून सर्वसामान्यांवर अन्याय करणा-या सरकारला खाली खेचा, असे आवाहनही चव्हाण यांनी केले़ यावेळी विरेंद्रसिंघ गाडीवाले, नरेंद्र चव्हाण, रवींद्रसिंघ बुंगई, डिम्पल नवाब, प्रकाशकौर खालसा, रणजितसिंघ कामठेकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेस