शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

भाजपाच्या काळात नांदेडचा विकास खुंटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 00:51 IST

राज्यात गेल्या साडेचार वर्षांत गुंतवणूक नाही, कारखाने नाहीत, रोजगार नाही़ गेल्या ४५ वर्षांत जेवढी नाही तेवढी यावेळी बेरोजगारी वाढली आहे़ भाजपाच्या काळात नांदेडचा विकास खुंटला असून काँग्रेसची सत्ता आल्यास नांदेडातच रोजगार निर्माण करण्यात येईल़

ठळक मुद्देअशोकराव चव्हाण रोजगारवाढीसाठी विशेष प्रयत्न करणार

नांदेड : राज्यात गेल्या साडेचार वर्षांत गुंतवणूक नाही, कारखाने नाहीत, रोजगार नाही़ गेल्या ४५ वर्षांत जेवढी नाही तेवढी यावेळी बेरोजगारी वाढली आहे़ भाजपाच्या काळात नांदेडचा विकास खुंटला असून काँग्रेसची सत्ता आल्यास नांदेडातच रोजगार निर्माण करण्यात येईल़ नांदेडच्या तरुणांना बाहेर जाण्याची वेळ येणार नाही, असे प्रतिपादन खा़ अशोकराव चव्हाण यांनी केले़लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बोंढार येथे आयोजित सभेत ते बोलत होते़ यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री नसीम खान, आ़डी़पी़सावंत यांची उपस्थिती होती़ चव्हाण म्हणाले, डॉ़बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान जाळले जात असताना भाजपा सरकार मात्र गप्प बसले होते़ सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय जनहितकारी निर्णय घेतात़ मात्र भाजप सरकार तेच घेतलेले निर्णय पुन्हा न्यायालयाकडे पुनर्विचारासाठी पाठविते़ देशात अशाप्रकारे हुकूमशाही कारभार सुरु असल्याचा घणाघात खा़अशोकराव चव्हाण यांनी केला़कॉग्रेस पक्ष स्वायत्त, संविधानिक संस्थांना स्वतंत्रता देणारा पक्ष आहे़ तर भाजप, आरएसएस संविधान मानत नाहीत़ विचार थोपविण्याचे तसेच प्रत्येक संस्थेवर आरएसएसच्या व्यक्तीचा सहभाग ठेवणे हेच एकमेव काम सुरु आहे़ असेही ते म्हणाले़ तर हॉटेल सिटी प्राईडमध्ये बुद्धिजीवी वर्गाची बैठक घेण्यात आली़ या बैठकीत चव्हाण म्हणाले, भाजपाने देशातील व्यापाऱ्यांना चोर ठरविले आहे़ जीएसटी, नोटाबंदी करुन वाताहत केली आहे़ देशात प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचा अधिकार आहे़ परंतु पंतप्रधानांनी चार्टर्ड अकाऊंटन्ट यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावून दम दिला, असेही ते म्हणाले़ यावेळी अ‍ॅड़विजय भोपी, अ‍ॅड़सिद्दीकी, जयप्रकाश फलोर, गुणाल मालपाणी, अ‍ॅड़भोसले, अ‍ॅड़हांडे, रहेमान सिद्दीकी, गोविंद मुंदडा यांची उपस्थिती होती़शीख बांधवांशी साधला संवाद- गुरुद्वारा गेट क्रमांक ५ येथे अशोकराव चव्हाण यांनी शीख बांधवांशी संवाद साधला़ गुरुद्वारामुळेच नांदेडची ओळख असून भाजपाच्या काळात धर्मामध्ये ढवळाढवळ करण्यात येत आहे़ काँग्रेसने अशी ढवळाढवळ कधीही केली नाही़ परंतु भाजपच्या काळात मात्र सरकार गुरुद्वाराच्या प्रबंधनाचा चेअरमन ठरवित आहे़ कारण पंतप्रधानांना त्या जागी आरएसएस-भाजपाचा व्यक्ती पाहिजे़ पीएमच्या ‘मन की बात नसून दिल की बात’ ची गरज आहे़ भाजप सरकार देश आणि राज्यात भीतीचे वातावरण निर्माण करीत आहे़ कोणी काय खायचं, काय बोलायचं, कोणते कपडे घालायचे हे सरकारच ठरवित आहे़ विचार थोपवून सर्वसामान्यांवर अन्याय करणा-या सरकारला खाली खेचा, असे आवाहनही चव्हाण यांनी केले़ यावेळी विरेंद्रसिंघ गाडीवाले, नरेंद्र चव्हाण, रवींद्रसिंघ बुंगई, डिम्पल नवाब, प्रकाशकौर खालसा, रणजितसिंघ कामठेकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेस