शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

मुदखेड रेल्वस्थानकाला अस्वच्छतेचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:28 IST

येथील रेल्वेस्थानक आणि परिसराला अस्वच्छतेचा विळखा पडला असून या अस्वच्छतेचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे़ नगर परिषद राबवत असलेल्या स्वच्छता मोहिमेला रेल्वे प्रशासनाकडून मात्र हरताळ फासला जात आहे.

ठळक मुद्देरेल्वे प्रशासनाचे दुर्लक्षनगर परिषदेच्या स्वच्छता मोहिमेला हरताळ

मुदखेड : येथील रेल्वेस्थानक आणि परिसराला अस्वच्छतेचा विळखा पडला असून या अस्वच्छतेचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे़ नगर परिषद राबवत असलेल्या स्वच्छता मोहिमेला रेल्वे प्रशासनाकडून मात्र हरताळ फासला जात आहे.शहरानजीक असलेल्या मुदखेड रेल्वेस्थानकावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. प्रवेशद्वाराजवळ व तिकीट खिडकीजवळील भिंती गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगल्या आहेत. स्टेशन परिसरात दुर्गंधी पसरली असून प्रवाशांना नाक मुठीत धरून रेल्वेयात्रा करावी लागत आहे. हे रेल्वेस्थानक अस्वच्छतेमुळे विळख्यात सापडल्याने प्रवाशांची कुचंबणा होत आहे. मुदखेड येथील जुन्या रेल्वेस्थानकात स्वच्छता व सोयी-सुविधांबाबत अभाव आहे. उपाहारगृह चालकाकडून अस्वच्छता पसरविली जात असल्याचे अनेक प्रवाशांचे म्हणणे आहे. स्टेशनमध्ये कचरा टाकण्यासाठी ठेवलेल्या कचराकुंड्या योग्य पद्धतीने ठेवल्या नसून तीन प्रकारच्या कचराकुंड्या ठेवण्याचे वरिष्ठ पातळीवरुन आदेश असताना एकच जुन्या प्रकारची तुटक्याफुटक्या कचराकुंड्या दिसून येत आहेत. रेल्वे प्रशासनाने स्वच्छतेचे संपूर्ण कंत्राट बी.आर.चव्हाण आणि ए.आर. चौधरी यांना दोन वर्षांसाठी यांना दिले असून ही संपूर्ण जबाबदारी कंत्राटदाराची आहे, असे रेल्वे प्रशासन सांगितले जात असून जबाबदारी झटकली जाते आहे. कंत्राटदाराकडून स्वच्छतेच्या कामासाठी दहा जण हजेरीपटावर दाखवून केवळ दोन ते तीन जण काम करत असल्याचे रेल्वे विभागाच्या एका वरिष्ठ कर्मचाºयाने सांगितले आहे. मुदखेड रेल्वेस्थानकात अनेक प्लॅटफॉर्मवर घाणीचे साम्राज्य असून साफसफाईच्या नावाने बोंबाबोंबच आहे. रेल्वेस्थानकात नित्यनेमाने साफसफाई केली जात नाही.

  • सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे अशा परिस्थितीत प्रवाशांनी प्रतीक्षालयातील घाणीमुळे थांबायचे कसे ? त्यामुळे प्रतीक्षालय व परिसराची स्वच्छता करावी अशी मागणी होत आहे.

प्रचंड दुर्गंधी पसरलीस्थानकातील प्रतीक्षालयाची दुरवस्था झाली असून, ते नियमितपणे उघडले जात नसल्याने प्रतीक्षालयात घाण वास येतो. विशेषत: प्रतीक्षालयातील शौचालयाची नियमितपणे साफसफाई होत नसल्याने त्यात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. येथील रेल्वे कर्मचाºयांच्या मनमानीवर वरिष्ठ अधिकाºयांचा वचक राहिला नाही. रेल्वे कर्मचाºयांच्या या मनमानीला तात्काळ लगाम बसणे गरजेचे आहे़ प्रवासी विचारणा करण्यास गेल्यास त्यांना संबंधित कर्मचारी माहिती न देता उद्धटपणाची वागणूक देत असल्याचे चित्र आहे़

टॅग्स :Nandedनांदेडrailwayरेल्वेSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान