शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विष्णुपूरीतील पाण्याच्या नियोजनासाठी हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 19:24 IST

वेळापत्रकाचे योग्य नियोजन गरजेचे

ठळक मुद्देआजपासून सोनखेड, बाभुळगाव तलावात पाणी

नांदेड : गतवर्षी विष्णुपुरीतील पाण्याचे योग्य नियोजन न झाल्याने  नांदेडकरांना १० ते १५ दिवसाआड पाणी मिळाले़ त्यातही डिग्रस बंधाऱ्यातून पाणी घ्यावे लागले़ त्यामुळे यंदा विष्णुपुरीच्या पाण्याच्या योग्य नियोजनासाठी जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली हालचालींना वेग आला आहे़ गोदावरीतील पाण्याचा येवा सध्या बंद झाल्याने विष्णुपूरीचा एकही दरवाजा उघडलेला नाही़ उपलब्ध पाणी इतर बंधाऱ्यात लिफ्ट करून वरील भागातून येणारे पाणी विष्णुपूरीतच रोखले जाणार आहे़ 

नांदेड शहराची तहान भागवणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे विष्णुपूरी प्रकल्प तुडूंब भरला आहे़ त्याबरोबरच गोदावरी नदीवरील दिग्रस उच्च पातळी बंधारा आणि अंतेश्वर बंधाऱ्यातील जलसाठ्यातही लक्षणीय वाढ झाली असून या दोन्ही बंधाऱ्यावरील गेट सध्या बंद केल्याने विष्णुपूरीकडे येणाऱ्या पाण्याचा येवा बंद झाला आहे़ परंतु, सदर बंधारे भरल्यानंतर पुन्हा येवा सुरू होईल़ त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन करणे गरजेचे आहे़ गतवर्षी शहरात पाणी सोडणे, सिंचनासाठी पाणीपाळ्या आणि पाण्याची गळती रोखण्यासाठी योग्य उपाययोजना न केल्यामुळे नांदेडकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला़ गोदावरील डिग्रस उच्च पातळी बंधाऱ्यातून पाणी सोडल्यामुळे नांदेडकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला़ त्यातही नांदेड शहरात दहा ते पंधरा दिवसाला एकवेळ पाणी सोडले गेले़ काही भागात वीस वीस दिवस पाणी आले नाही़ परिणामी हजारो कुटुंबाना टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागले़ शहरवासियांचे कोट्यवधी रूपये पाण्यावर खर्च झाले़ सद्यस्थितीत  पाण्याचे वेळापत्रक बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत़

आजपासून सोनखेड, बाभुळगाव तलावात पाणीसद्यस्थितीत नांदेड विभागातील जायकवाडी प्रकल्पात ८५़६७ टक्के, मांजलगाव प्रकल्पात शुन्य टक्के, ढालेगाव बंधारा-४४़८९ टक्के, येलदरी - निरंक, सिद्धेश्वर प्रकल्प-निरंक, मुडगळ बंधारा- ४३१९ टक्के, मुळी बंधारा- ९़४४ टक्के, दिग्रस - ६७़०३ टक्के, अंतेश्वर- ८१़७६ टक्के, शंकर चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प- १०० टक्के, अप्पर मानार प्रकल्प-१४़११ टक्के,  लोअर मानार-५१़२७ टक्के,  इसापूर प्रकल्प - १५़४३ टक्के,  आमदुरा-६६़०८ टक्के, बळेगाव -७९़०८ टक्के,  बाभळी- निरंक, निजामसागर-३़८५ टक्के, पोचमपाड - २५़७६ टक्के जलसाठा आहे़ विष्णुपूरी प्रकल्पातून आंध्रप्रदेशात वाहून जाणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करून सदर पाणी लिफ्ट करून सोनखेड, डेरला, बाभुळगाव, किवळा, पांगरी येथील तलाव भरण्याच्या सूचना खा़हेमंत पाटील यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना केल्या होत्या़ त्यानूसार ४ सप्टेंबरपासून पंपद्वारे पाणी लिफ्ट करून सोनखेड, बाभुळगाव आदी तलावात सोडले जाणार आहे़ 

टॅग्स :Nandedनांदेडvishnupuri damविष्णुपुरी धरणWaterपाणीNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका