शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

विष्णुपूरीतील पाण्याच्या नियोजनासाठी हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 19:24 IST

वेळापत्रकाचे योग्य नियोजन गरजेचे

ठळक मुद्देआजपासून सोनखेड, बाभुळगाव तलावात पाणी

नांदेड : गतवर्षी विष्णुपुरीतील पाण्याचे योग्य नियोजन न झाल्याने  नांदेडकरांना १० ते १५ दिवसाआड पाणी मिळाले़ त्यातही डिग्रस बंधाऱ्यातून पाणी घ्यावे लागले़ त्यामुळे यंदा विष्णुपुरीच्या पाण्याच्या योग्य नियोजनासाठी जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली हालचालींना वेग आला आहे़ गोदावरीतील पाण्याचा येवा सध्या बंद झाल्याने विष्णुपूरीचा एकही दरवाजा उघडलेला नाही़ उपलब्ध पाणी इतर बंधाऱ्यात लिफ्ट करून वरील भागातून येणारे पाणी विष्णुपूरीतच रोखले जाणार आहे़ 

नांदेड शहराची तहान भागवणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे विष्णुपूरी प्रकल्प तुडूंब भरला आहे़ त्याबरोबरच गोदावरी नदीवरील दिग्रस उच्च पातळी बंधारा आणि अंतेश्वर बंधाऱ्यातील जलसाठ्यातही लक्षणीय वाढ झाली असून या दोन्ही बंधाऱ्यावरील गेट सध्या बंद केल्याने विष्णुपूरीकडे येणाऱ्या पाण्याचा येवा बंद झाला आहे़ परंतु, सदर बंधारे भरल्यानंतर पुन्हा येवा सुरू होईल़ त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन करणे गरजेचे आहे़ गतवर्षी शहरात पाणी सोडणे, सिंचनासाठी पाणीपाळ्या आणि पाण्याची गळती रोखण्यासाठी योग्य उपाययोजना न केल्यामुळे नांदेडकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला़ गोदावरील डिग्रस उच्च पातळी बंधाऱ्यातून पाणी सोडल्यामुळे नांदेडकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला़ त्यातही नांदेड शहरात दहा ते पंधरा दिवसाला एकवेळ पाणी सोडले गेले़ काही भागात वीस वीस दिवस पाणी आले नाही़ परिणामी हजारो कुटुंबाना टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागले़ शहरवासियांचे कोट्यवधी रूपये पाण्यावर खर्च झाले़ सद्यस्थितीत  पाण्याचे वेळापत्रक बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत़

आजपासून सोनखेड, बाभुळगाव तलावात पाणीसद्यस्थितीत नांदेड विभागातील जायकवाडी प्रकल्पात ८५़६७ टक्के, मांजलगाव प्रकल्पात शुन्य टक्के, ढालेगाव बंधारा-४४़८९ टक्के, येलदरी - निरंक, सिद्धेश्वर प्रकल्प-निरंक, मुडगळ बंधारा- ४३१९ टक्के, मुळी बंधारा- ९़४४ टक्के, दिग्रस - ६७़०३ टक्के, अंतेश्वर- ८१़७६ टक्के, शंकर चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प- १०० टक्के, अप्पर मानार प्रकल्प-१४़११ टक्के,  लोअर मानार-५१़२७ टक्के,  इसापूर प्रकल्प - १५़४३ टक्के,  आमदुरा-६६़०८ टक्के, बळेगाव -७९़०८ टक्के,  बाभळी- निरंक, निजामसागर-३़८५ टक्के, पोचमपाड - २५़७६ टक्के जलसाठा आहे़ विष्णुपूरी प्रकल्पातून आंध्रप्रदेशात वाहून जाणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करून सदर पाणी लिफ्ट करून सोनखेड, डेरला, बाभुळगाव, किवळा, पांगरी येथील तलाव भरण्याच्या सूचना खा़हेमंत पाटील यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना केल्या होत्या़ त्यानूसार ४ सप्टेंबरपासून पंपद्वारे पाणी लिफ्ट करून सोनखेड, बाभुळगाव आदी तलावात सोडले जाणार आहे़ 

टॅग्स :Nandedनांदेडvishnupuri damविष्णुपुरी धरणWaterपाणीNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका