शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडयात दुष्काळ, सिंचन सुविधांअभावी सर्वाधिक शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 12:59 IST

मराठवाड्यातील शेती कोरडवाहू असल्याने शेतकऱ्यांची मदार ही पूर्णपणे पावसावर असते.

ठळक मुद्देअलीकडील काळात मराठवाड्याला अतिवृष्टीचा सामनाही सातत्याने करावा लागत आहे.

- विशाल सोनटक्के

परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्राध्यापक आर. डी. अहिरे आणि पी. एस. कापसे यांनी मराठवाड्यातील या ३२० आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील सदस्यांशी संवाद साधला. या संवादानंतर आणि अभ्यासातून त्यांनी शेतकरी आत्महत्या मागील कारणे मांडली आहेत.

सिंचऩ, शेतीपूरक व्यवसायांच्या अभावामुळेच मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या

मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येची विविध कारणे असले तरी सततचा दुष्काळ आणि सिंचन सुविधांचा आभाव ही यामागची प्रमुख कारणे असल्याचे दिसते. याच कारणामुळे मराठवाड्यात तब्बल ८७.१८ टक्के शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे हा अहवाल सांगतो. 

मराठवाड्यातील शेती कोरडवाहू असल्याने शेतकऱ्यांची मदार ही पूर्णपणे पावसावर असते. मात्र, मराठवाड्यात अनेकवेळा सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस पडतो. पर्यायाने अनेकदा पेरण्याच होत नाहीत. मात्र, त्यापूर्वीच शेतकऱ्यांने खते बी-बियाणे खरेदी केलेली असतात. शेती पिकणार नाही, मग वर्ष कसे काढायाचे? या चिंतेतून शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो. याच प्रमुख कारणामुळे मराठवाड्यात तब्बल ८७.१८ टक्के आत्महत्या झाल्याचे दिसून येते. यामध्ये परभणी जिल्ह्यात ८५ टक्के, हिंगोली- ९५ टक्के, नांदेड- ९५ टक्के, बीड- ९२.५०, उस्मानाबाद- ९७.५०, लातूर- ५७.५०, औरंगाबाद- ७५ टक्के तर जालना जिल्ह्यातील सर्व १०० टक्के आत्महत्या या दुष्काळ आणि सिंचनसुविधेच्या अभावामुळे झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.

अलीकडील काळात मराठवाड्याला अतिवृष्टीचा सामनाही सातत्याने करावा लागत आहे. अशा नैसर्गिक आपत्तीमुळे ५.६२ टक्के आत्महत्या झाल्या आहेत. पिकावर पडणाऱ्या रोगराई व  किडीच्या प्रादुर्भावामुळे ०.९३ टक्के आत्महत्या झाल्या. बोगस तसेच निकृष्ट बी-बियाणे, खते शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न होतो. अशा खते व बी-बियाणांमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान होते. अशा नुकसानीमुळे ०.६२ टक्के आत्महत्या झाल्या आहेत.  अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीतून २.८१ टक्के आत्महत्या झाल्या आहेत. कर्ज काढून विहीर खोदली, पण पाणी न लागल्याने ३.१२ टक्के शेतकरी आत्महत्या झाल्याचे या अभ्यासातून पुढे आले आहे.

सामाजिक आणि इतर कारणेसहा आत्महत्या या मुलीच्या विवाहात दिलेल्या हुंड्यामुळे डोक्यावर कर्जाचा बोजा चढल्यामुळे झाल्या. यात औरंगाबाद जिल्ह्यातील चार आणि बीड जिल्ह्यातील दोन आत्महत्यांचा समावेश आहे. सर्वाधिक १७० आत्महत्या या शेतीच्या नापिकीमुळे आर्थिक आणि सामाजिक प्रतिष्ठा घसरल्याने झाल्याचे दिसते. यामध्ये परभणी, हिंगोली आणि बीड प्रत्येकी १८ आत्महत्या, नांदेड- १२, जालना- १६, उस्मानाबाद- २७, लातूर- ३७ आणि औरंगाबाद २४ शेतकरी आत्महत्यांचा समावेश आहे. ९७ शेतकरी आत्महत्या या उपवर मुली तसेच बहिणीच्या विवाहाच्या चिंतेतून झाल्याचेही धक्कादायक वास्तव या अभ्यासातून पुढे आले आहे.

कुटुंबातील सदस्य अथवा कुटुंब प्रमुखाच्या आत्महत्येच्या घटनेमुळे व्यथित होवून ६५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ३१ आत्महत्या या शेजारी अथवा कुटुंबातील अंतर्गत वादाला कंटाळून झाल्या, तर १० आत्महत्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे व्यथित होऊन झाल्या आहेत. १०८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या या कुटुंबातील सदस्यांबरोबरच शेतकऱ्याने स्वत:च्या आजारपणाला कंटाळून केल्या असल्याचेही या अहवालात नमूद आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याFarmerशेतकरीagricultureशेतीVasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeethवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ