शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडयात दुष्काळ, सिंचन सुविधांअभावी सर्वाधिक शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 12:59 IST

मराठवाड्यातील शेती कोरडवाहू असल्याने शेतकऱ्यांची मदार ही पूर्णपणे पावसावर असते.

ठळक मुद्देअलीकडील काळात मराठवाड्याला अतिवृष्टीचा सामनाही सातत्याने करावा लागत आहे.

- विशाल सोनटक्के

परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्राध्यापक आर. डी. अहिरे आणि पी. एस. कापसे यांनी मराठवाड्यातील या ३२० आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील सदस्यांशी संवाद साधला. या संवादानंतर आणि अभ्यासातून त्यांनी शेतकरी आत्महत्या मागील कारणे मांडली आहेत.

सिंचऩ, शेतीपूरक व्यवसायांच्या अभावामुळेच मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या

मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येची विविध कारणे असले तरी सततचा दुष्काळ आणि सिंचन सुविधांचा आभाव ही यामागची प्रमुख कारणे असल्याचे दिसते. याच कारणामुळे मराठवाड्यात तब्बल ८७.१८ टक्के शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे हा अहवाल सांगतो. 

मराठवाड्यातील शेती कोरडवाहू असल्याने शेतकऱ्यांची मदार ही पूर्णपणे पावसावर असते. मात्र, मराठवाड्यात अनेकवेळा सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस पडतो. पर्यायाने अनेकदा पेरण्याच होत नाहीत. मात्र, त्यापूर्वीच शेतकऱ्यांने खते बी-बियाणे खरेदी केलेली असतात. शेती पिकणार नाही, मग वर्ष कसे काढायाचे? या चिंतेतून शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो. याच प्रमुख कारणामुळे मराठवाड्यात तब्बल ८७.१८ टक्के आत्महत्या झाल्याचे दिसून येते. यामध्ये परभणी जिल्ह्यात ८५ टक्के, हिंगोली- ९५ टक्के, नांदेड- ९५ टक्के, बीड- ९२.५०, उस्मानाबाद- ९७.५०, लातूर- ५७.५०, औरंगाबाद- ७५ टक्के तर जालना जिल्ह्यातील सर्व १०० टक्के आत्महत्या या दुष्काळ आणि सिंचनसुविधेच्या अभावामुळे झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.

अलीकडील काळात मराठवाड्याला अतिवृष्टीचा सामनाही सातत्याने करावा लागत आहे. अशा नैसर्गिक आपत्तीमुळे ५.६२ टक्के आत्महत्या झाल्या आहेत. पिकावर पडणाऱ्या रोगराई व  किडीच्या प्रादुर्भावामुळे ०.९३ टक्के आत्महत्या झाल्या. बोगस तसेच निकृष्ट बी-बियाणे, खते शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न होतो. अशा खते व बी-बियाणांमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान होते. अशा नुकसानीमुळे ०.६२ टक्के आत्महत्या झाल्या आहेत.  अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीतून २.८१ टक्के आत्महत्या झाल्या आहेत. कर्ज काढून विहीर खोदली, पण पाणी न लागल्याने ३.१२ टक्के शेतकरी आत्महत्या झाल्याचे या अभ्यासातून पुढे आले आहे.

सामाजिक आणि इतर कारणेसहा आत्महत्या या मुलीच्या विवाहात दिलेल्या हुंड्यामुळे डोक्यावर कर्जाचा बोजा चढल्यामुळे झाल्या. यात औरंगाबाद जिल्ह्यातील चार आणि बीड जिल्ह्यातील दोन आत्महत्यांचा समावेश आहे. सर्वाधिक १७० आत्महत्या या शेतीच्या नापिकीमुळे आर्थिक आणि सामाजिक प्रतिष्ठा घसरल्याने झाल्याचे दिसते. यामध्ये परभणी, हिंगोली आणि बीड प्रत्येकी १८ आत्महत्या, नांदेड- १२, जालना- १६, उस्मानाबाद- २७, लातूर- ३७ आणि औरंगाबाद २४ शेतकरी आत्महत्यांचा समावेश आहे. ९७ शेतकरी आत्महत्या या उपवर मुली तसेच बहिणीच्या विवाहाच्या चिंतेतून झाल्याचेही धक्कादायक वास्तव या अभ्यासातून पुढे आले आहे.

कुटुंबातील सदस्य अथवा कुटुंब प्रमुखाच्या आत्महत्येच्या घटनेमुळे व्यथित होवून ६५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ३१ आत्महत्या या शेजारी अथवा कुटुंबातील अंतर्गत वादाला कंटाळून झाल्या, तर १० आत्महत्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे व्यथित होऊन झाल्या आहेत. १०८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या या कुटुंबातील सदस्यांबरोबरच शेतकऱ्याने स्वत:च्या आजारपणाला कंटाळून केल्या असल्याचेही या अहवालात नमूद आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याFarmerशेतकरीagricultureशेतीVasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeethवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ