शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडयात दुष्काळ, सिंचन सुविधांअभावी सर्वाधिक शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 12:59 IST

मराठवाड्यातील शेती कोरडवाहू असल्याने शेतकऱ्यांची मदार ही पूर्णपणे पावसावर असते.

ठळक मुद्देअलीकडील काळात मराठवाड्याला अतिवृष्टीचा सामनाही सातत्याने करावा लागत आहे.

- विशाल सोनटक्के

परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्राध्यापक आर. डी. अहिरे आणि पी. एस. कापसे यांनी मराठवाड्यातील या ३२० आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील सदस्यांशी संवाद साधला. या संवादानंतर आणि अभ्यासातून त्यांनी शेतकरी आत्महत्या मागील कारणे मांडली आहेत.

सिंचऩ, शेतीपूरक व्यवसायांच्या अभावामुळेच मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या

मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येची विविध कारणे असले तरी सततचा दुष्काळ आणि सिंचन सुविधांचा आभाव ही यामागची प्रमुख कारणे असल्याचे दिसते. याच कारणामुळे मराठवाड्यात तब्बल ८७.१८ टक्के शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे हा अहवाल सांगतो. 

मराठवाड्यातील शेती कोरडवाहू असल्याने शेतकऱ्यांची मदार ही पूर्णपणे पावसावर असते. मात्र, मराठवाड्यात अनेकवेळा सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस पडतो. पर्यायाने अनेकदा पेरण्याच होत नाहीत. मात्र, त्यापूर्वीच शेतकऱ्यांने खते बी-बियाणे खरेदी केलेली असतात. शेती पिकणार नाही, मग वर्ष कसे काढायाचे? या चिंतेतून शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो. याच प्रमुख कारणामुळे मराठवाड्यात तब्बल ८७.१८ टक्के आत्महत्या झाल्याचे दिसून येते. यामध्ये परभणी जिल्ह्यात ८५ टक्के, हिंगोली- ९५ टक्के, नांदेड- ९५ टक्के, बीड- ९२.५०, उस्मानाबाद- ९७.५०, लातूर- ५७.५०, औरंगाबाद- ७५ टक्के तर जालना जिल्ह्यातील सर्व १०० टक्के आत्महत्या या दुष्काळ आणि सिंचनसुविधेच्या अभावामुळे झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.

अलीकडील काळात मराठवाड्याला अतिवृष्टीचा सामनाही सातत्याने करावा लागत आहे. अशा नैसर्गिक आपत्तीमुळे ५.६२ टक्के आत्महत्या झाल्या आहेत. पिकावर पडणाऱ्या रोगराई व  किडीच्या प्रादुर्भावामुळे ०.९३ टक्के आत्महत्या झाल्या. बोगस तसेच निकृष्ट बी-बियाणे, खते शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न होतो. अशा खते व बी-बियाणांमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान होते. अशा नुकसानीमुळे ०.६२ टक्के आत्महत्या झाल्या आहेत.  अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीतून २.८१ टक्के आत्महत्या झाल्या आहेत. कर्ज काढून विहीर खोदली, पण पाणी न लागल्याने ३.१२ टक्के शेतकरी आत्महत्या झाल्याचे या अभ्यासातून पुढे आले आहे.

सामाजिक आणि इतर कारणेसहा आत्महत्या या मुलीच्या विवाहात दिलेल्या हुंड्यामुळे डोक्यावर कर्जाचा बोजा चढल्यामुळे झाल्या. यात औरंगाबाद जिल्ह्यातील चार आणि बीड जिल्ह्यातील दोन आत्महत्यांचा समावेश आहे. सर्वाधिक १७० आत्महत्या या शेतीच्या नापिकीमुळे आर्थिक आणि सामाजिक प्रतिष्ठा घसरल्याने झाल्याचे दिसते. यामध्ये परभणी, हिंगोली आणि बीड प्रत्येकी १८ आत्महत्या, नांदेड- १२, जालना- १६, उस्मानाबाद- २७, लातूर- ३७ आणि औरंगाबाद २४ शेतकरी आत्महत्यांचा समावेश आहे. ९७ शेतकरी आत्महत्या या उपवर मुली तसेच बहिणीच्या विवाहाच्या चिंतेतून झाल्याचेही धक्कादायक वास्तव या अभ्यासातून पुढे आले आहे.

कुटुंबातील सदस्य अथवा कुटुंब प्रमुखाच्या आत्महत्येच्या घटनेमुळे व्यथित होवून ६५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ३१ आत्महत्या या शेजारी अथवा कुटुंबातील अंतर्गत वादाला कंटाळून झाल्या, तर १० आत्महत्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे व्यथित होऊन झाल्या आहेत. १०८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या या कुटुंबातील सदस्यांबरोबरच शेतकऱ्याने स्वत:च्या आजारपणाला कंटाळून केल्या असल्याचेही या अहवालात नमूद आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याFarmerशेतकरीagricultureशेतीVasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeethवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ