शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर

By श्रीनिवास भोसले | Updated: September 28, 2024 05:05 IST

नेरली येथील घटना : मध्यरात्रीपासून आरोग्य यंत्रणा गावात तळ ठोकून

नांदेड : तालुक्यातील नेरली कुष्ठधाम येथे पिण्याच्या पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा झाली असून त्यातील सहा जणांची प्रकृती गंभीर आहे.  ही धक्कादायक घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. उलट्यासह चक्कर येणे आणि डोकेदुखी होऊ लागल्याने शुक्रवारी मध्यरात्रीपासून शेकडो रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यात येत आहे. ही विषबाधा सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या टाकीतील पाणी प्यायल्यामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

नांदेडपासून जवळच असलेल्या नेरली कुष्ठधाम येथे शुक्रवारी मध्यरात्री गावातील काही महिला आणि पुरुषांना उलटी जुलाब होणे, डोके दुखणे, चक्कर येणे असा प्रकार होत असल्याने शुक्रवार २७ सप्टेंबर रोजी रात्री साडेबारा वाजल्‍यापासून रुग्णांना  नांदेड शहरातील खासगी आणि शासकीय रुग्णालयात केले जात आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख यांनी डॉक्टरांच्या टीमसह नेरली कुष्ठधाम येथे धाव घेतली. रात्रीपासून आरोग्य पथक गावात तळ ठोकून असून गावातील अस्वस्थ रुग्णांची तपासणी करून त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले जात आहे. शनिवार पहाटे चार वाजेपर्यंत जवळपास पावणे दोनशे रुग्णांना नांदेडच्या शासकीय आणि खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. यामध्ये पंधराहून अधिक लहान मुलांचा समावेश आहे.

सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पावडे यांना हा प्रकार माहिती झाल्यानंतर त्यांनी तात्काळ गावात धाव घेत आरोग्य यंत्रणा तसेच प्रशासनाशी संपर्क साधून ही माहिती दिली. प्रारंभी पावडे यांच्याच गाडीतून दहा ते बारा रुग्णांना नांदेडच्या रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांनी तात्काळ दोन खाजगी रुग्णवाहिका बोलविल्या. तद्नंतर गावात दाखल झालेल्या आरोग्य पथकासोबतच्या रुग्णवाहिकांतून गावातील रुग्णांना नांदेड येथे हलविण्यात येत आहे. सात रुग्णवाहिका आणि मिळेल त्या वाहनांनी रुग्णांना नांदेड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान हा प्रकार माहित झाल्यानंतर भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेंडगे आणि त्यांच्या टीमने देखील गावात धाव घेतली आहे. 

सहा जणांची प्रकृती गंभीर

पाण्यातून विषबाधा झाल्याचा संशय आहे. उलटी जुलाब आणि डोकेदुखी चक्कर येणे अशी लक्षणे आढळून येत असलेल्या रुग्णात वाढ होत आहे. त्यात सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. त्यांच्यावर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जिल्हाधिकारी राऊत लक्ष ठेवून 

नेरली कुष्ठधाम येथे विषबाधा झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ आरोग्य यंत्रणेला सूचना दिल्या. मध्यरात्री एक वाजेपासून जिल्हाधिकारी राऊत स्वतः आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून गावातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.  

नई आबादीतील रुग्ण सर्वाधिक

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख आणि त्यांच्या टीमकडून गावातच आरोग्य केंद्रात रुग्णांची तपासणी केली जात आहे.  200 हून अधिक रुग्णांना नांदेड येथे पाठवण्यात आले. यामध्ये सर्वाधिक रुग्णही निर्णय येथील नई आबादी भागातील असल्याचे समजते. या भागात पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीतून विषबाधा झाली असावी असा अंदाज देखील वर्तविला जात आहे.

टॅग्स :NandedनांदेडAccidentअपघातWaterपाणी