शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

सर्व आघाड्यावर मोदी सरकार अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 00:16 IST

परदेश दौ-यामुळे मोजकेच दिवस भारतात असणारे पंतप्रधान मोदी हे देशाचे अर्धवेळ पंतप्रधान व पूर्ण वेळ वास्को द गामा असल्याची खरमरीत टीका करीत, सर्व आघाड्यावर मोदी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप कन्हैय्याकुमार यांनी केला.

ठळक मुद्देकंधारमध्ये कन्हैय्याकुमार यांचा हल्लाबोल

कंधार : सतत परदेश दौऱ्यावर असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारी, व्यापारी, सामान्य जनतेचे प्रश्र सोडवण्यासाठी वेळ देत नाहीत. परदेश दौ-यामुळे मोजकेच दिवस भारतात असणारे पंतप्रधान मोदी हे देशाचे अर्धवेळ पंतप्रधान व पूर्ण वेळ वास्को द गामा असल्याची खरमरीत टीका करीत, सर्व आघाड्यावर मोदी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप कन्हैय्याकुमार यांनी केला.कंधार येथे जि.प.हायस्कूल मैदानावर आयोजित संविधान बचाओ, देश बचाओ! किसान, मजदूर, युवक बचाओ! देश बचाओ! अभियानातंर्गत जाहीर सभेत ते बोलते होते. अध्यक्षस्थानी माजी आ.शंकरअण्णा धोंडगे होते. तर आ.बाबाजानी दुराणी, माजी आ. गुरूनाथराव कुरूडे, कॉ. प्रदीप नागापूरकर, कॉ. राजू पाटील, कॉ. अभय टाकसाळ, माजी नगराध्यक्ष अरविंद नळगे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.देशातील ज्वलंत प्रश्राकडे दुर्लक्ष करून धर्म व जातीभेदावर भाजपाकडून विशेष भर दिला जात आहे. संविधानाची मूल्ये मोडीत काढली जात आहेत. देशाच्या सीबीआय, रिजर्व्ह बँकेसारख्या संस्था दुबळ्या केल्या जात आहेत. लोकशाही व्यवस्था खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगत, देशाचा इतिहास चुकीच्या पद्धतीने पंतप्रधान मोदी मांडत आहेत. मराठा, पटेल, गुर्जर, जाठ, धनगर, मुस्लिम आदीना आरक्षण देण्यासाठी अध्यादेश काढायचे सोडून एकमेकात दूरावा, भांडणे निर्माण कसे होतील. यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. संविधानात धर्मनिरपेक्षता बळकटीकरणावर भर देण्यात आला आहे. मात्र सामाजिक न्याय, समता, बंधुत्व आदी व्यवस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न होत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. व्याख्यानाला नगरसेवक सुधाकर कांबळे, अ.मन्नान चौधरी, बबर महमंद, पंकज चव्हाण, दिलीप धोंडगे, रा.कॉ.चे बाबुराव केंद्रे, शिवदास धमार्पूरीकर, राजकुमार केकाटे, हब्बूभाई, गौतम पवार, सुरेश कल्हाळीकर, डॉ. गफारखान, संजय केकाटे, आदींची उपस्थिती होती. सुत्रसंचालन व आभार डॉ. सुनील धोंडगे यानी मानले.भाजपाकडून केवळ फसव्या घोषणाविकासाचे स्वप्न दाखवून भाजपाने अनेक घोषणा केल्या. मात्र त्यांची अंमलबजावणी करण्याऐवजी भावनात्मक मुद्यावर भर दिल्यानेच भाजपा अडचणीत आली आहे. याचाच प्रत्यय पाच राज्यातील निवडणुकीत आल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Nandedनांदेडkanhaiya kumarकन्हैय्या कुमारNarendra Modiनरेंद्र मोदी