शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
2
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
3
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
4
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
5
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
6
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
7
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
8
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
9
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
10
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
11
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
12
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
13
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
14
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
15
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
16
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
17
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
18
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
20
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?

सर्व आघाड्यावर मोदी सरकार अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 00:16 IST

परदेश दौ-यामुळे मोजकेच दिवस भारतात असणारे पंतप्रधान मोदी हे देशाचे अर्धवेळ पंतप्रधान व पूर्ण वेळ वास्को द गामा असल्याची खरमरीत टीका करीत, सर्व आघाड्यावर मोदी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप कन्हैय्याकुमार यांनी केला.

ठळक मुद्देकंधारमध्ये कन्हैय्याकुमार यांचा हल्लाबोल

कंधार : सतत परदेश दौऱ्यावर असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारी, व्यापारी, सामान्य जनतेचे प्रश्र सोडवण्यासाठी वेळ देत नाहीत. परदेश दौ-यामुळे मोजकेच दिवस भारतात असणारे पंतप्रधान मोदी हे देशाचे अर्धवेळ पंतप्रधान व पूर्ण वेळ वास्को द गामा असल्याची खरमरीत टीका करीत, सर्व आघाड्यावर मोदी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप कन्हैय्याकुमार यांनी केला.कंधार येथे जि.प.हायस्कूल मैदानावर आयोजित संविधान बचाओ, देश बचाओ! किसान, मजदूर, युवक बचाओ! देश बचाओ! अभियानातंर्गत जाहीर सभेत ते बोलते होते. अध्यक्षस्थानी माजी आ.शंकरअण्णा धोंडगे होते. तर आ.बाबाजानी दुराणी, माजी आ. गुरूनाथराव कुरूडे, कॉ. प्रदीप नागापूरकर, कॉ. राजू पाटील, कॉ. अभय टाकसाळ, माजी नगराध्यक्ष अरविंद नळगे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.देशातील ज्वलंत प्रश्राकडे दुर्लक्ष करून धर्म व जातीभेदावर भाजपाकडून विशेष भर दिला जात आहे. संविधानाची मूल्ये मोडीत काढली जात आहेत. देशाच्या सीबीआय, रिजर्व्ह बँकेसारख्या संस्था दुबळ्या केल्या जात आहेत. लोकशाही व्यवस्था खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगत, देशाचा इतिहास चुकीच्या पद्धतीने पंतप्रधान मोदी मांडत आहेत. मराठा, पटेल, गुर्जर, जाठ, धनगर, मुस्लिम आदीना आरक्षण देण्यासाठी अध्यादेश काढायचे सोडून एकमेकात दूरावा, भांडणे निर्माण कसे होतील. यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. संविधानात धर्मनिरपेक्षता बळकटीकरणावर भर देण्यात आला आहे. मात्र सामाजिक न्याय, समता, बंधुत्व आदी व्यवस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न होत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. व्याख्यानाला नगरसेवक सुधाकर कांबळे, अ.मन्नान चौधरी, बबर महमंद, पंकज चव्हाण, दिलीप धोंडगे, रा.कॉ.चे बाबुराव केंद्रे, शिवदास धमार्पूरीकर, राजकुमार केकाटे, हब्बूभाई, गौतम पवार, सुरेश कल्हाळीकर, डॉ. गफारखान, संजय केकाटे, आदींची उपस्थिती होती. सुत्रसंचालन व आभार डॉ. सुनील धोंडगे यानी मानले.भाजपाकडून केवळ फसव्या घोषणाविकासाचे स्वप्न दाखवून भाजपाने अनेक घोषणा केल्या. मात्र त्यांची अंमलबजावणी करण्याऐवजी भावनात्मक मुद्यावर भर दिल्यानेच भाजपा अडचणीत आली आहे. याचाच प्रत्यय पाच राज्यातील निवडणुकीत आल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Nandedनांदेडkanhaiya kumarकन्हैय्या कुमारNarendra Modiनरेंद्र मोदी