शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

तलाठ्यांच्या चुका शेतकरी वेठीस; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी अर्धा निधीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 18:31 IST

काही तलाठ्यांनी बँकेला शेतकऱ्यांच्या याद्या देताना शेतकऱ्यांचा खाते क्रमांक फक्त चार अंकीच टाकली

ठळक मुद्देआठ गावांच्या याद्याच नाहीत  शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता

देगलूर (जि. नांदेड) : तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी लागणारी अर्धीच रक्कम शासनाकडून वितरित केल्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप करावे की, दुसऱ्या टप्प्यातील रकमेची प्रतीक्षा करावी, याबाबत नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखाधिकारी द्विधा मन:स्थितीत आहेत. काही तलाठ्यांनी बँकेला शेतकऱ्यांच्या याद्या देताना शेतकऱ्यांचा खाते क्रमांक फक्त चार अंकीच टाकल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर त्यांची रक्कम वर्ग करण्यास अडचण निर्माण झाली. 

देगलूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन सोयाबीन, कापूस, तूर या पिकांचे मोठे नुकसान झाले. शासनाने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपयांप्रमाणे अनुदान जाहीर करीत अनुदानाची रक्कमसुद्धा तहसील कार्यालयाला वर्ग केली; परंतु अनुदानाची रक्कम दोन टप्प्यांत देण्याचे धोरण निश्चित केले आहे. तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी पहिल्या टप्प्यात २२ कोटी ४१ लाख ४४ हजार ९३२ रुपये देण्यात आले. त्यापैकी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेला १६ कोटी ५० लाख ६७ हजार ४०२ रुपये वर्ग करण्यात आले आहेत.  बँक ऑफ महाराष्ट्र, मराठवाडा ग्रामीण बँक, आयडीबीआय, स्टेट बँक ऑफ इंडिया, आदी शाखांत ही अनुदानाची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. 

नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेत असलेल्या कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने परिणामी वाटपास विलंब होत आहे. पहिल्या टप्प्यातील रक्कम वाटपास प्रारंभ झाला, तर तालुक्यातील शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील रक्कम मिळण्यास दीड वर्षाचा कालावधी लागू शकतो. शासनाकडून पहिल्या टप्प्याची रक्कम प्राप्त झाली.  मात्र, दुसऱ्या टप्प्यातील रक्कम लवकर आल्यास शेतकऱ्यांना एकरकमी पैसा मिळेल, असा आशावाद व्यवस्थापक सुभाष कऱ्हाडे यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम वाटप करावी की नाही, याबाबत तहसीलदारांना विचारून निर्णय घेऊ असे त्यांनी स्पष्ट केले. 

आठ गावांच्या याद्याच नाहीत  तालुक्यातील करडखेड, सांगवी करडखेड, कावळगाव, बोरगाव, चाकूर, ढोसणी, कारेगाव, क्यादरकुंठा या आठ गावांच्या याद्या संबंधित तलाठ्यांकडून तहसील कार्यालयालाच देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे हे शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीfundsनिधीNandedनांदेड