शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याचे दुर्दैव ! धरणे भरूनही पूर्ण क्षमतेने पाणी मिळण्याची शाश्वती नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 19:16 IST

यंदा मराठवाड्यातील धरणे तुडूंब आहेत़ सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात ८४़१७ टक्के पाणीसाठा आहे.

ठळक मुद्देनिर्मित क्षमतेच्या २३. ८७ टक्के क्षेत्रालाच मिळाले पाणी

- विशाल सोनटक्के

नांदेड : मराठवाड्यातील प्रमुख धरणांत यंदा समाधानकारक पाणीसाठा आहे़ मागील वर्षीही परतीच्या पावसामुळे मराठवाड्यातील धरणे तुडुंब झाली होती़ मात्र, बिगर सिंचनासाठी झालेला पाण्याचा वापर, बाष्पीभवन आणि वहन व्यवस्थेत वाया गेलेले पाणी यामुळे मराठवाड्यात निर्मित सिंचन क्षमतेच्या २३़८७ टक्के क्षेत्रालाच पाणी मिळाले आहे़. 

यंदा मराठवाड्यातील धरणे तुडूंब आहेत़ सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात ८४़१७ टक्के तर माजलगाव प्रकल्पात ७३़२७ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून उर्ध्व पैनगंगा ९०़३९ टक्के भरले असून पूर्णा येलदरी प्रकल्प गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत १०० टक्के भरलेला आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत़ मात्र मागील वर्षीच्या मराठवाड्यातील सिंचनाचा मागोवा घेतला असता निर्मित सिंचन क्षमतेपेक्षा २३़८७ टक्के क्षेत्रालाच शेतीसाठी पाणी मिळाल्याचे दिसून येते़.

- मागील वर्षीपर्यंतची औरंगाबादची निर्मित सिंचन क्षमता १३५़७४२ हजार हेक्टर एवढी होती़ मात्र ५६़३३१ हजार हेक्टर क्षेत्रालाच म्हणजे निर्मित सिंचन क्षमतेच्या १६़८२ टक्के क्षेत्राला पाणी मिळाले़

- जालना जिल्ह्याची निर्मित सिंचन क्षमता ९७़७७४ हजार हेक्टर होती़ त्यातपैकी ३७़०१० हजार हेक्टर सिंचित क्षेत्र झाले़ म्हणजेच निर्मित सिंचन क्षमतेच्या १३़६७ टक्के क्षेत्रालाच पाणी मिळाले़

- बीड जिल्ह्याची निर्मित सिंचन क्षमता १८४़३९६ हजार हेक्टर असताना २३़६६९ हजार हेक्टर (१९़३१ टक्के) क्षेत्र सिंचित झाले़

- लातूर जिल्ह्याची निर्मित सिंचन क्षमता ११३़५३१ हजार हेक्टर असताना ९़९७१ हजार हेक्टर (१७़४७ टक्के) क्षेत्राला पाणी मिळाले़ 

- उस्मानाबाद जिल्ह्याची निर्मित सिंचन क्षमता १४०़६८७ हजार हेक्टर असताना १०़४०९ हजार हेक्टर (२०़१६ टक्के) क्षेत्रासाठीच पाणी उपलब्ध झाले़

- नांदेड जिल्ह्याची निर्मित सिंचन क्षमता २१०़४४४ हजार हेक्टर असताना १०६़०९६ म्हणजेच निर्मित सिंचन क्षमतेच्या २५़३५ टक्के क्षेत्राला पाणी मिळाले़

- परभणी जिल्ह्याची निर्मित सिंचन क्षमता २१२़४४७ हजार हेक्टर असताना ६२़४१८ हेक्टर म्हणजेच निर्मित सिंचन क्षमतेच्या ३७ टक्के क्षेत्रासाठी पाणी उपलब्ध झाले़

- अशीच परिस्थिती हिंगोली जिल्ह्याचीही आहे़ जून २०१८ अखेर जिल्ह्याची एकूण निर्मित सिंचन क्षमता ५६़०१८ हजार हेक्टर एवढी असताना २०१८-१९ या वर्षात २९़२५० हेक्टर क्षेत्र सिंचित झाले़ म्हणजेच निर्मित सिंंचन क्षमतेच्या तुलनेत १४़०७ टक्के क्षेत्रालाच पाणी मिळाले़ 

बाष्पीभवन, वहन व्ययाचा सिंचनावर परिणाम प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा मोठा असला तरीही शेतीला त्या तुलनेत पाणी मिळत नाही. राज्याचा विचार करता सन १८-१९ या वर्षात उपलब्ध पाण्याच्या ९़७८ टक्के पाणी बाष्पीभवनामध्ये गेले. नदीतील वहन व्ययामुळे ४़७६ टक्के पाण्याचा अपव्यय झाला़ त्यातच १७़३६ टक्के पाणी बिगर सिंचनासाठी वापरल्याने ३७़०९ टक्के पाणी शेतीसाठी उपलब्ध झाले़ मराठवाड्यातील मोठा भाग गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत येतो़ या भागात एकूण पाण्याच्या तुलनेत ९़०३ टक्के पाण्याचे बाष्पीभवन झाले़ ४़३१ टक्के पाणी नदीतील वहन व्ययामध्ये गेले़ १४़६२ टक्के पाणी बिगर सिंचनाकरिता गेल्याने सिंचनासाठी केवळ २७़७९ टक्के पाण्याचा वापर झाला़ 

मराठवाड्यात वाढली सिंचन क्षमताजलसंपदा विभागाच्या अहवालानुसार ३० जून २०१७ च्या तुलनेत ३० जून २०१८ या कालावधीत मराठवाड्यात अवघी ०़०६ लाख हेक्टर सिंचन क्षमता वाढली. महाराष्ट्राचा विचार करता याच कालावधीत महाराष्ट्रात ०़८६ लाख हेक्टर क्षमता वाढलेली आहे़

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणvishnupuri damविष्णुपुरी धरणMarathwadaमराठवाडा