शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पावसात रद्द झाल्यास काय? २००२ मध्ये भारतासोबत काय झालेले...
2
भारतीय वंशाच्या उद्योजकाने अमेरिकेत चुना लावला अन् पसार झाला; ४,००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप
3
बँक, आधार ते GST पर्यंत..., आजपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; तुमच्या खिशावर अन् जीवनावर थेट परिणाम होणार!
4
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
5
LPG Cylinder Price Cut:आजपासून गॅस सिलिंडरची किंमत झाली कमी, पाहा तुमच्या शहरात काय आहेत नवे दर?
6
“कार्तिकी एकादशीच्या महापूजेपूर्वीच विठुरायाने ठाण्यात अवतरून मला दर्शन दिले”: एकनाथ शिंदे
7
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
8
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
9
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
10
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
11
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
12
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
13
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
14
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
15
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
16
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
17
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
18
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
19
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
20
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम

मराठवाड्याचे दुर्दैव ! धरणे भरूनही पूर्ण क्षमतेने पाणी मिळण्याची शाश्वती नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 19:16 IST

यंदा मराठवाड्यातील धरणे तुडूंब आहेत़ सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात ८४़१७ टक्के पाणीसाठा आहे.

ठळक मुद्देनिर्मित क्षमतेच्या २३. ८७ टक्के क्षेत्रालाच मिळाले पाणी

- विशाल सोनटक्के

नांदेड : मराठवाड्यातील प्रमुख धरणांत यंदा समाधानकारक पाणीसाठा आहे़ मागील वर्षीही परतीच्या पावसामुळे मराठवाड्यातील धरणे तुडुंब झाली होती़ मात्र, बिगर सिंचनासाठी झालेला पाण्याचा वापर, बाष्पीभवन आणि वहन व्यवस्थेत वाया गेलेले पाणी यामुळे मराठवाड्यात निर्मित सिंचन क्षमतेच्या २३़८७ टक्के क्षेत्रालाच पाणी मिळाले आहे़. 

यंदा मराठवाड्यातील धरणे तुडूंब आहेत़ सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात ८४़१७ टक्के तर माजलगाव प्रकल्पात ७३़२७ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून उर्ध्व पैनगंगा ९०़३९ टक्के भरले असून पूर्णा येलदरी प्रकल्प गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत १०० टक्के भरलेला आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत़ मात्र मागील वर्षीच्या मराठवाड्यातील सिंचनाचा मागोवा घेतला असता निर्मित सिंचन क्षमतेपेक्षा २३़८७ टक्के क्षेत्रालाच शेतीसाठी पाणी मिळाल्याचे दिसून येते़.

- मागील वर्षीपर्यंतची औरंगाबादची निर्मित सिंचन क्षमता १३५़७४२ हजार हेक्टर एवढी होती़ मात्र ५६़३३१ हजार हेक्टर क्षेत्रालाच म्हणजे निर्मित सिंचन क्षमतेच्या १६़८२ टक्के क्षेत्राला पाणी मिळाले़

- जालना जिल्ह्याची निर्मित सिंचन क्षमता ९७़७७४ हजार हेक्टर होती़ त्यातपैकी ३७़०१० हजार हेक्टर सिंचित क्षेत्र झाले़ म्हणजेच निर्मित सिंचन क्षमतेच्या १३़६७ टक्के क्षेत्रालाच पाणी मिळाले़

- बीड जिल्ह्याची निर्मित सिंचन क्षमता १८४़३९६ हजार हेक्टर असताना २३़६६९ हजार हेक्टर (१९़३१ टक्के) क्षेत्र सिंचित झाले़

- लातूर जिल्ह्याची निर्मित सिंचन क्षमता ११३़५३१ हजार हेक्टर असताना ९़९७१ हजार हेक्टर (१७़४७ टक्के) क्षेत्राला पाणी मिळाले़ 

- उस्मानाबाद जिल्ह्याची निर्मित सिंचन क्षमता १४०़६८७ हजार हेक्टर असताना १०़४०९ हजार हेक्टर (२०़१६ टक्के) क्षेत्रासाठीच पाणी उपलब्ध झाले़

- नांदेड जिल्ह्याची निर्मित सिंचन क्षमता २१०़४४४ हजार हेक्टर असताना १०६़०९६ म्हणजेच निर्मित सिंचन क्षमतेच्या २५़३५ टक्के क्षेत्राला पाणी मिळाले़

- परभणी जिल्ह्याची निर्मित सिंचन क्षमता २१२़४४७ हजार हेक्टर असताना ६२़४१८ हेक्टर म्हणजेच निर्मित सिंचन क्षमतेच्या ३७ टक्के क्षेत्रासाठी पाणी उपलब्ध झाले़

- अशीच परिस्थिती हिंगोली जिल्ह्याचीही आहे़ जून २०१८ अखेर जिल्ह्याची एकूण निर्मित सिंचन क्षमता ५६़०१८ हजार हेक्टर एवढी असताना २०१८-१९ या वर्षात २९़२५० हेक्टर क्षेत्र सिंचित झाले़ म्हणजेच निर्मित सिंंचन क्षमतेच्या तुलनेत १४़०७ टक्के क्षेत्रालाच पाणी मिळाले़ 

बाष्पीभवन, वहन व्ययाचा सिंचनावर परिणाम प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा मोठा असला तरीही शेतीला त्या तुलनेत पाणी मिळत नाही. राज्याचा विचार करता सन १८-१९ या वर्षात उपलब्ध पाण्याच्या ९़७८ टक्के पाणी बाष्पीभवनामध्ये गेले. नदीतील वहन व्ययामुळे ४़७६ टक्के पाण्याचा अपव्यय झाला़ त्यातच १७़३६ टक्के पाणी बिगर सिंचनासाठी वापरल्याने ३७़०९ टक्के पाणी शेतीसाठी उपलब्ध झाले़ मराठवाड्यातील मोठा भाग गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत येतो़ या भागात एकूण पाण्याच्या तुलनेत ९़०३ टक्के पाण्याचे बाष्पीभवन झाले़ ४़३१ टक्के पाणी नदीतील वहन व्ययामध्ये गेले़ १४़६२ टक्के पाणी बिगर सिंचनाकरिता गेल्याने सिंचनासाठी केवळ २७़७९ टक्के पाण्याचा वापर झाला़ 

मराठवाड्यात वाढली सिंचन क्षमताजलसंपदा विभागाच्या अहवालानुसार ३० जून २०१७ च्या तुलनेत ३० जून २०१८ या कालावधीत मराठवाड्यात अवघी ०़०६ लाख हेक्टर सिंचन क्षमता वाढली. महाराष्ट्राचा विचार करता याच कालावधीत महाराष्ट्रात ०़८६ लाख हेक्टर क्षमता वाढलेली आहे़

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणvishnupuri damविष्णुपुरी धरणMarathwadaमराठवाडा