शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
3
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यंवशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
4
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
5
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
6
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
7
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
8
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
9
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
10
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
11
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
12
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
13
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
14
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
15
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
16
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
17
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
18
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
19
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
20
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला

एमएचटी-सीईटीच्या तांत्रिक चुकीचा विद्यार्थ्यांना फटका, अनेकांचे वर्ष वाया जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 13:24 IST

यंदा या कक्षाने टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस (टीसीएस) ऐवजी अन्य कंपनीमार्फत ही परीक्षा घेतली जात आहे.

ठळक मुद्देपरीक्षार्थींचा गोंधळ, पूर्वसूचना न देताच केला बदल

- भारत दाढेल

नांदेड : विद्यार्थ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता पेपर पॅटर्न मध्ये केलेल्या तांत्रिक बदलामुळे एमएचटी सीईटी (MHT-CET ) परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना फटका बसला असून त्यामुळे महत्त्वाचे वर्ष वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

सध्या एमएचटी सीईटी परीक्षा सुरू आहे. यंदा या कक्षाने टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस (टीसीएस) ऐवजी अन्य कंपनीमार्फत ही परीक्षा घेतली जात आहे. पीसीएमबी आणि पीसीबी या दोन ग्रुपसाठी स्वतंत्र साॅफ्टवेअर विकसित करण्यात आले. एकूण १८० मिनिटांसाठी ही परीक्षा होत आहे. त्यात दोन भाग असून फिजिक्स , केमिस्ट्री व मॅथ किंवा बायोलॉजी असे दोन भाग करण्यात आले आहे. मात्र, हे स्वतंत्र भाग असले तरी तसे सॉफ्टवेअर मात्र मानत नाही. एखाद्या विद्यार्थ्यांचा मॅथ हा विषय स्कोअरिंग असेल व त्याने तसा तो पेपर सोडविला तर ९० मिनिटे संपल्यानंतर दुसरा पेपर फिजिक्स, केमिस्ट्रीचा उघडत नाही. त्या विद्यार्थ्यांला या पेपरपासून वंचित राहावे लागत आहे. वास्तविक परीक्षा यंत्रणेने याबाबत प्रवेश पत्रावर किंवा एमएचटी सीईटीच्या अधिसूचनेत असा कुठेही उल्लेख केलेला नाही. परीक्षा ऑनलाईन असल्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यापूर्वी सूचना दिल्या जात आहेत. त्याही स्पष्ट नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडत आहे.

सीईटी सेलला जर, फिजिक्स, केमिस्ट्रीचा पेपर पहिल्यांदा सोडविणे अपेक्षित असेल तर, दुसरा पेपर लॉक असायला हवा असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच याबाबतच्या सर्व सूचना निसंदिग्ध असायला हव्या होत्या. विद्यार्थ्यांना पूर्व कल्पना न देता केलेला हा बदल विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळणारा आहे. अनेक विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे. याबाबत सीईटी सेलकडे मेलद्वारे तक्रारी केल्या असता कोणताही प्रतिसाद मिळत नाही. सीईटी सेलच्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला तरी तेथे कोणीही उपलब्ध नसतात. याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाने दखल घेऊन ज्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना दुबार परीक्षेची संधी द्यावी, अशी मागणी होती.

सीईटी सेलने या संदर्भात कोणतीही पूर्वसूचना न देता केलेला बदल हा अन्यायकारक आहे. त्यामुळे आम्ही चॉईसप्रमाणे पेपर सोडवू शकत नाही. मॅथसाठी कच्चे काम करावे लागते. त्यासाठी अधिक वेळ लागतो. त्यामुळे मंडळाने कोणता पेपर आधी सोडवावा, हा चॉईस विद्यार्थ्यांना दिला पाहिजे.-निकेतन उदगीरे, विद्यार्थी, नांदेड

अचानकपणे बदल करणे चुकीचे आहे. मंडळाच्या तांत्रिक अडचणीचा विद्यार्थ्यांना फटका बसू नये, मॅथचा पेपर दुसरा असेल व दोन्ही पेपरचे गुण एकत्रित दिले जात असतील तर, पेपरचा क्रम न सांगता अनिवार्य करण्याचे काय प्रयोजन आहे.- यश लोंढे, विद्यार्थी, नांदेड.

टॅग्स :Studentविद्यार्थीAurangabadऔरंगाबाद