शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

एमएचटी-सीईटीच्या तांत्रिक चुकीचा विद्यार्थ्यांना फटका, अनेकांचे वर्ष वाया जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 13:24 IST

यंदा या कक्षाने टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस (टीसीएस) ऐवजी अन्य कंपनीमार्फत ही परीक्षा घेतली जात आहे.

ठळक मुद्देपरीक्षार्थींचा गोंधळ, पूर्वसूचना न देताच केला बदल

- भारत दाढेल

नांदेड : विद्यार्थ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता पेपर पॅटर्न मध्ये केलेल्या तांत्रिक बदलामुळे एमएचटी सीईटी (MHT-CET ) परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना फटका बसला असून त्यामुळे महत्त्वाचे वर्ष वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

सध्या एमएचटी सीईटी परीक्षा सुरू आहे. यंदा या कक्षाने टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस (टीसीएस) ऐवजी अन्य कंपनीमार्फत ही परीक्षा घेतली जात आहे. पीसीएमबी आणि पीसीबी या दोन ग्रुपसाठी स्वतंत्र साॅफ्टवेअर विकसित करण्यात आले. एकूण १८० मिनिटांसाठी ही परीक्षा होत आहे. त्यात दोन भाग असून फिजिक्स , केमिस्ट्री व मॅथ किंवा बायोलॉजी असे दोन भाग करण्यात आले आहे. मात्र, हे स्वतंत्र भाग असले तरी तसे सॉफ्टवेअर मात्र मानत नाही. एखाद्या विद्यार्थ्यांचा मॅथ हा विषय स्कोअरिंग असेल व त्याने तसा तो पेपर सोडविला तर ९० मिनिटे संपल्यानंतर दुसरा पेपर फिजिक्स, केमिस्ट्रीचा उघडत नाही. त्या विद्यार्थ्यांला या पेपरपासून वंचित राहावे लागत आहे. वास्तविक परीक्षा यंत्रणेने याबाबत प्रवेश पत्रावर किंवा एमएचटी सीईटीच्या अधिसूचनेत असा कुठेही उल्लेख केलेला नाही. परीक्षा ऑनलाईन असल्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यापूर्वी सूचना दिल्या जात आहेत. त्याही स्पष्ट नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडत आहे.

सीईटी सेलला जर, फिजिक्स, केमिस्ट्रीचा पेपर पहिल्यांदा सोडविणे अपेक्षित असेल तर, दुसरा पेपर लॉक असायला हवा असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच याबाबतच्या सर्व सूचना निसंदिग्ध असायला हव्या होत्या. विद्यार्थ्यांना पूर्व कल्पना न देता केलेला हा बदल विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळणारा आहे. अनेक विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे. याबाबत सीईटी सेलकडे मेलद्वारे तक्रारी केल्या असता कोणताही प्रतिसाद मिळत नाही. सीईटी सेलच्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला तरी तेथे कोणीही उपलब्ध नसतात. याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाने दखल घेऊन ज्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना दुबार परीक्षेची संधी द्यावी, अशी मागणी होती.

सीईटी सेलने या संदर्भात कोणतीही पूर्वसूचना न देता केलेला बदल हा अन्यायकारक आहे. त्यामुळे आम्ही चॉईसप्रमाणे पेपर सोडवू शकत नाही. मॅथसाठी कच्चे काम करावे लागते. त्यासाठी अधिक वेळ लागतो. त्यामुळे मंडळाने कोणता पेपर आधी सोडवावा, हा चॉईस विद्यार्थ्यांना दिला पाहिजे.-निकेतन उदगीरे, विद्यार्थी, नांदेड

अचानकपणे बदल करणे चुकीचे आहे. मंडळाच्या तांत्रिक अडचणीचा विद्यार्थ्यांना फटका बसू नये, मॅथचा पेपर दुसरा असेल व दोन्ही पेपरचे गुण एकत्रित दिले जात असतील तर, पेपरचा क्रम न सांगता अनिवार्य करण्याचे काय प्रयोजन आहे.- यश लोंढे, विद्यार्थी, नांदेड.

टॅग्स :Studentविद्यार्थीAurangabadऔरंगाबाद