शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
4
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
5
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
7
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
8
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
9
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
10
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
11
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
12
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
13
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
14
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
15
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
16
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
17
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
18
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
19
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
20
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?

बाजार समितीत हळदीची आवक वाढली, ८ हजार रुपयांपर्यंत मिळाला भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:17 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा बंद आहेत. त्याचबरोबर वाहतूक व्यवस्था बंद असल्याने भीतीपोटी गावातून वाहनधारक कृषीमालही घेऊन येण्यास घाबरत आहेत; परंतु ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा बंद आहेत. त्याचबरोबर वाहतूक व्यवस्था बंद असल्याने भीतीपोटी गावातून वाहनधारक कृषीमालही घेऊन येण्यास घाबरत आहेत; परंतु शेतीमाल अथवा भाजीपाला घेऊन येणाऱ्या वाहनांना कोणीही अडविणार नाही, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी घेऊन यायचा आहे, ते घेऊन येऊ शकतात.

दरम्यान, नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजर समितीमध्ये सर्व व्यवहार सुरळीत सुरू असून गुरुवारी हळदीचे बीट पार पडले. खरेदीदारही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पावसाने हळदीचे नुकसान

नांदेड जिल्ह्यातील बहुतांश गावामध्ये अवकाळी पाऊस झाला. बऱ्याच शेतकऱ्यांनी हळद शिजवून वाळत घातली आहे. अचानक पावसाने हजेरी लावल्याने हळद झाकून ठेवणे अथवा एकत्र करून ठेवणे शक्य न झाल्याने शेकडो शेतकऱ्यांची हळद भिजून नुकसान झाले आहे. भिजलेली हळद कडक होऊन तिला कमी भाव मिळतो. त्यात शेतकऱ्यांचेच आर्थिक नुकसान होते.

बियाण्यायोग्य हळद निघेना

गतवर्षी झालेल्या परतीच्या अतिपावसामुळे हदळीच्या उत्पन्नात घट झाली आहे, तर काही शेतकऱ्यांचा अजिबातच माल निघत नाही. अतिपाणी झाल्याने चिभाडीच्या जमिनीतील हळद पूर्णत: नासून गेली आहे. त्यात ज्या शेतकऱ्यांचा माल निघत आहे तोही दर्जेदार निघत नाही. त्यामुळे पुढील वर्षासाठी दुसऱ्या जिल्ह्यांतून अथवा ज्या शेतकऱ्याचा चांगला माल झाला आहे त्याच्याकडून बियाणे घेऊन ठेवावे लागत आहेत. हळदीचे बियाणे मुबलक प्रमाणात आणि दर्जेदार उपलब्ध होत नसल्याने पुढील वर्षात हळदीची लागवड घटण्याची शक्यता नाकारता येत नाही.