शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

सरकारने राज्यावर पाच लाख कोटींचे कर्ज करून ठेवले : अशोक चव्हाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 17:23 IST

सरकारचा केवळ घोषणांचा सुकाळ

ठळक मुद्देभाजप-शिवसेनेला मते मागण्याचा अधिकारच नाही़ 

नांदेड : सर्व महत्त्वाच्या विषयांवर वेळ मारुन नेण्याचे काम करणाऱ्या सरकारने राज्यावर पाच लाख कोटी रुपयांचे कर्ज करुन ठेवले आहे़ भाजप-सेनेला राज्यही नीट चालविता येत नसल्याचेच यावरुन स्पष्ट झाले आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केली़

भोकर मतदारसंघातील आंबेगाव, बारसगाव, कामठा बु़मालेगाव या ठिकाणी प्रचारसभा घेतल्या़ यावेळी चव्हाण म्हणाले, येथील जनता तोंड पाहून प्रेम न करता ते मतपेटीद्वारे व्यक्त करते़ या भागातील मतदार शंकरराव चव्हाण असोत की, अशोकराव चव्हाण  यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याची नेहमी प्रचिती येते़ आम्हाला बोलू दिले जात नसल्याची खंत तरुणाईने व्यक्त केली होती़ त्यामुळे युवा संवाद कार्यक्रम घेवून तरुणाईला मोकळेपणाने आपल्या समस्या मांडण्याची संधी दिली़ तरुणांनाही हे राज्य, देश सांभाळायचे आहे़ त्यामुळे जुन्या माणसांना सांभाळा, गाव तुम्हालाच सांभाळून घ्यायचे आहे़ आजचे भाजप-सेना सरकार केवळ खोटे बोलून वेळ मारुन नेत आहे़ २०१७ मध्ये कर्जमाफीची घोषणा केली़ परंतु अद्यापही त्याचा मागमूस नाही़ सत्तेत आल्यानंतर मात्र काँग्रेस सर्वप्रथम शेतकऱ्यांना कर्जमुक्त केल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली़

भाजप-शिवसेनेला मते मागण्याचा अधिकारच नाही़ शेतकरी त्रस्त, बेरोजगारीत वाढ, कष्टकऱ्यांच्या हाताला काम नाही, महिलांचे प्रश्न ‘जैसे थे’, रस्त्यांची दुरवस्था असताना सरकारकडून  धादांत खोटा प्रचार केला जात आहे़ तूर खरेदी करणे अन् त्याचे पैसे देण्याचे काम सरकारचे़ त्यात मी जबाबदार कसा? असा प्रश्नही चव्हाण यांनी केला़ परंतु केवळ कलम ३७० च्या नावाने ढोल बडविण्याचे काम सुरु आहे़ ३७० मुळे तुमच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटला का? संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत नाही़ त्या लाभार्थ्यांचे पाप भाजप-सेना सरकारला लागणार आहे, असेही चव्हाण म्हणाले़

यावेळी बालाजी गव्हाणे, संजय लहानकर, पप्पू कोंडेकर, अमोल डोंगरे, श्याम टेकाळे, संतोष गव्हाणे, गोविंद मुसळे, उद्धवराव राजेगोरे, बाळासाहेब मुसळे, गणेश बोंडारे, मदन देशमुख, रणजित मुसळे, उत्तमराव कल्याणकर, विरभद्र नांदेडकर यांनी मनोगत व्यक्त केले़ व्यासपीठावर बाळासाहेब डोंगरे, रमेश नांदेडकर, शिवानंद शिप्परकर यांची उपस्थिती होती़ 

वाढप्या आपला असावा लागतोबाहेरचा म्हणजेच आयात केलेला उमेदवार विकासकामे किती करणार?  त्यासाठी वाढप्या आपला असावा लागतो़ अशोकराव चव्हाण यांनी न मागता आंबेगाव परिसरात विकासकामे केली़ गेल्या पाच वर्षांत सरकारने केवळ थापा मारल्या़ अशोकरावांची नाळ सर्वसामान्य जनतेशी जोडली गेली आहे़ भाजप-सेनेला तोंड दाखविण्यासाठी जागा उरली नाही़ त्यामुळे मूळ प्रश्नांना ते बगल देत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली़  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019bhokar-acभोकरNandedनांदेडAshok Chavanअशोक चव्हाण