शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
4
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
5
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
6
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
7
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
8
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
9
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
10
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
11
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
12
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
13
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
14
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
15
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
16
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
17
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
18
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
19
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी

Maharashtra Election 2019: खोटारडेपणा भाजप-शिवसेना सरकारच्या अंगी ठासून भरलाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 21:10 IST

Maharashtra Election 2019: सरकार तुमचे असताना जबाबदार मी कसा?

नांदेड : तेलंगणाच्या सीमेवरील जनतेने तेलंगणात सामावून घेण्याची मागणी केली आहे़ तुमच्या मनातील तेलंगणात जायचा विचार सोडा अन् भाजप-सेनेला सत्तेतून हटवा़ राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार आणा, मग विकास पहा़ खोटारडेपणा या सरकारच्या अंगी ठासून भरला आहे़ असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले़

भोकर विधानसभा मतदारसंघात थेरबन, हाळदा, भोसी या ठिकाणी प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी चव्हाण बोलत होते़ चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, पाच वर्षांत ५० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली़ म्हणजेच एका शेतकऱ्याला ७ लाख ३० हजार रुपये मिळाले असे होते़ परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच नाही़ किती खोटे बोलावे यालाही काही मर्यादा आहेत की नाही़ परंतु खोटारडेपणा यांच्या अंगात ठासून भरला आहे़ या भागातील रस्ते खराब झाले़ हे रस्ते केंद्र सरकारचे असून त्याचे मंत्री नितीन गडकरी हे आहेत़ मग या रस्त्यांची जबाबदारी भाजपाचीच ना? सरकार तुमचं असताना फाशी आम्हाला का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला़ प्रतिस्पर्धी उमेदवार आमदार झाला, जि़प़अध्यक्ष होता़ त्यांनी कोणतीच विकासकामे केली नाहीत़ याचा काटा काढू, त्याचा काटा काढू असे खासदार जाहीर भाषणात बोलत आहेत़ खासदारांना अशी भाषणा शोभनीय नाही़ परंतु त्यांची तीच संस्कृती अन् प्रवृत्ती आहे़ अशोक चव्हाण अन् गोरठेकरांची तुलना होवू शकते काय? कर्जमाफी नाही, पीक विमा नाही, घरकुल योजना रखडली, संजय गांधी निराधार योजनेचा बट्ट्याबोळ अशा सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची गरज आहे़ जाहीरनाम्यात काँग्रेसने जी आश्वासने दिली ते पूर्ण करण्यात येतील, असेही चव्हाण म्हणाले़ यावेळी आ़अमरनाथ राजूरकर, सुभाष किन्हाळकर, सुभाष कोळगावकर, रामराव देशमुख, सुभाष चटलावार, आनंदराव पाटील मांजरीकर, आंनद गुंडीले, लक्ष्मण डोंगरे, सुभाष सोनकांबळे, नरसय्या रेड्डी, गणेश पोशेट्टी, महेश शेट्टी, सुधाकर शिंदे यांची उपस्थिती होती़ 

भावनेच्या भरात लोकसभेत चूक झाली-किन्हाळकरसुभाष पा़किन्हाळकर म्हणाले, ज्यांनी गोरठेकरला जि़प़अध्यक्ष, आमदार केले़ त्यांनाच गोरठेकर विसरले आहेत़ आपल्याला काम करणारा उमेदवार पाहिजे़ लोकसभेत भावनेच्या भरात चूक झाली़ त्याची पुनरावृत्ती आता कदापि होणार नाही़ गोविंद बाबा गौड म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात अशोकरावांनी विकासकामे केली आहेत़ शंकररावांच्या प्रयत्नांनी या परिसरात हरितक्रांती झाली आहे़ परंतु पीकविमा, रस्ते या मुद्यावरुन अशोकरावांना बदनाम करण्याचे षड्यंत्र सुरु आहे़ सरकार भाजप-शिवसेनेचे असताना जबाबदार अशोकराव कसे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला़ 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019bhokar-acभोकरAshok Chavanअशोक चव्हाण