शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

ऐन निवडणुकीच्या हंगामात आल्या परीक्षा; प्रचारासाठी तरूण कार्यकर्त्यांची होतेय वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 20:06 IST

कॉलनीतील प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्यांची संख्या घटली

ठळक मुद्देविधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत पदवी परीक्षा सुरू आहेत़ उमेदवारांनी तरूण नोकरदारावर लक्ष केंद्रित केले आहे़ 

नांदेड : स्वारातीम विद्यापीठाच्या महाविद्यालयीन हिवाळी सत्राच्या परीक्षा १० आॅक्टोबरपासून सुरू झाल्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या ऐन प्रचारात तरूण कार्यकर्त्यांची वानवा जाणवत आहे़ 

विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत पदवी परीक्षा सुरू आहेत़ विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात  होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांची हिवाळी परीक्षेला सामोरे जाण्यासाठी तयारी सुरू झाली होती़ त्यामुळे   या सर्व धामधुमीपासून विद्यार्थी अलिप्त राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करत आहेत़ महाविद्यालयीनस्तरावर तरूण कार्यकर्त्यांची फौज निवडणुकीच्या मैदानात दिसत नाही़ त्यामुळे शहरात कोणत्याच पक्षाच्या प्रचारात महाविद्यालयीन विद्यार्थी दिसत नसल्याचे चित्र आहे़ 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातंर्गत संलग्नित असलेल्या महाविद्यालयात प्रथम सत्राच्या   पदवी व पदव्युत्तर तसेच इतर अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू आहेत़ नियोजित वेळेनुसार विद्यापीठाने या परीक्षा घेतल्या असल्या तरी विधानसभा निवडणुकीतच या परीक्षा  सुरू आहेत़ त्यामुळे राजकीय पक्षांना या तरूण कार्यकर्त्यांची मदत होत नाही़ 

शहरातील महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे़ परीक्षेच्या निमित्ताने हे विद्यार्थी शहरात राहत आहे़ गावातील राजकारणात सक्रिय असलेल्या या तरूणांना निवडणुकीत मात्र सहभागी होता येत नाही़ विद्यापीठाने निवडणुकीच्या अनुषंगाने परीक्षेच्या वेळापत्रकात काही बदल केले आहेत़ ११, १२ आॅक्टोबर रोजी नियोजित परीक्षेचे पेपर तसेच १९ तारखेला होणारा पेपर पुढे ढकलला आहे़ तर  २१  ते २५ आॅक्टोबरपर्यंतच्या पदवी, पदव्युत्तर परीक्षा पुढे ढकलल्या  आहेत़ असे असले तरी परीक्षेचा अभ्यास सोडून विद्यार्थी प्रचारात उतरण्यास तयार नाहीत. शहरातील कॉलनी, गल्लीत प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या तरूणांची संख्या घटल्यामुळे नेत्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे़ त्यामुळे  उमेदवारांनी तरूण नोकरदारावर लक्ष केंद्रित केले आहे़ 

 यासंदर्भात भारतीय स्टुडंटस  फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष दिलीप कंधारे यांनी, विद्यार्थी हा खऱ्या अर्थाने समाजकारण व राजकारणाची दिशा निश्चित करीत असतो़ त्यामुळे समाजकारण व राजकारणाची दिशा बदलते़ परंतु महाराष्ट्र विधानसभा निवडणुका या  विद्यापीठ परीक्षेच्या कालावधीत आल्यामुळे विद्यार्थ्यांना निवडणुकीत सक्रिय सहभाग घेणे शक्य होत नसल्याचे सांगितले़ 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NandedनांदेडStudentविद्यार्थी