शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

रोज तीन लाख नागरिक होताहेत बेरोजगार; 'शॉटगन' शत्रुघ्न सिन्हाचा भाजपावर निशाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 21:07 IST

आर्थिक स्थिरतेबरोबरच समाजात समन्वयाच्या वातावरणासाठी काँग्रेस हवी

नांदेड : युवक, महिला, मजूर, नोकरदार, व्यापारी सर्वजण आज त्रस्त असून आर्थिक मंदीमुळे दररोज तीन लाख लोक बेरोजगार होत आहेत़ राज्याची आर्थिक स्थिरता टिकविण्यासाठी आणि समाजात समन्वयाचे वातावरण ठेवण्यासाठी काँग्रेसला साथ द्यावी, असे आवाहन सिनेअभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी केले़ 

तरोडा भागातील कॅनॉल रस्त्यावर काँग्रेस आघाडीचे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डी़ पी़ सावंत यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते़ यावेळी मंचावर माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, उमेदवार डी़ पी़ सावंत, माजी मंत्री कमलकिशोर कदम उपस्थित होते़ ज्येष्ठ अभिनेता शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, काँग्रेसने नेहमीच राष्ट्रहित जोपासण्याचे काम केले आहे़ त्यामुळे यापुढे देशाच्या विकासासाठी प्रगतीसाठी आणि सामाजिक सलोखा  टिकविण्यासाठी काँग्रेसला साथ देणे गरजेचे आहे़ आज विकासाच्या नावावर सर्वत्र खड्डेच खड्डे दिसत आहेत़ मागील पाच वर्षांत सरकारने नोटाबंदी, जीएसटीसारख्या निर्णयातून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचे काम केले आहे़ 

आ़ डी़ पी़ सावंत म्हणाले, लोकसभेला जे झालं ती चूक पुन्हा करू नका, जातीजातीमध्ये  मतांचे विभाजन करून स्वत:ची पोळी भाजण्याचे काम केले़ तुमच्या सुख- दु:खात सहभागी होण्यासाठी काँग्रेस पदाधिकारी सदैव तत्पर आहे़ उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले़ सूत्रसंचालन महेश देशमुख तरोडेकर यांनी केले़ दरम्यान, भोकर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अशोकराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ अर्धापूर येथे तर नांदेड दक्षिणचे उमेदवार मोहन हंबर्डे यांच्या प्रचारार्थ सिडको येथे अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांची प्रचारसभा पार पडली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाcongressकाँग्रेसnanded-north-acनांदेड उत्तर