शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

Maharashtra Election 2019: सेनेचे ८६ तर भाजपचे ८३ बंडखोर रिंगणात, मग सत्ता येणार कशी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 21:18 IST

शरद पवार हे प्रचारासाठी बाहेर पडले तेव्हा भाजपवाल्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली़

ठळक मुद्दे जनतेने निवडणुकीत मोदी, शहा यांना त्यांची जागा दाखवून द्यावी.

लोहा : सेनेचे ८६ तर भाजपचे ८३ बंडखोर उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत़ मग सरकार कसे येणार? असा सवाल करीत, सत्ताधाऱ्यांवर विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे यांनी टीकास्त्र सोडले़

लोहा शहरातील बैलबाजार मैदानावर शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादीचे दिलीप धोंडगे यांच्या प्रचारानिमित्त सभा घेण्यात आली़  मुंडे म्हणाले, विधानसभेची होत असलेली निवडणूक ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार हे धनदांडगे आहेत. ते तुम्हाला पैसे देऊन मत विकत घेतील, दिलेल्या पैशात ते तुम्हाला पाच वर्षे राबवतील. मात्र या निवडणुकीत धनशक्तीची मस्ती उतरवा़ भाजपची मंडळी रोज उठून शरद पवारांबद्दल बोलतात, मी शरद पवार यांना सांगितले, माझ्या मतदारसंघात मोदी, शहा यांना प्रचारसभा घ्यायला लावतो. माझ्या निवडणुकीचे बघायचे काम नाही, आपण साधे नाहीत. शरद पवार हे प्रचारासाठी बाहेर पडले तेव्हा भाजपवाल्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली़ त्यांच्यामागे ईडी लावली, ईडीची भीती दाखवत त्यांची चौकशी लावली. जनतेने निवडणुकीत मोदी, शहा यांना त्यांची जागा दाखवून द्यावी. राज्यात परिवर्तन अटळ आहे. सेना-भाजपने कितीही प्रयत्न केलातरी त्यांचे सरकार येणार नाही. 

पवार काय कळणार ?भाजपच्या विरोधकांना ईडीची भीती मोदी आणि शहा दाखवत आहेत. ५५ वर्षे राजकारणात काम केलेले पवार भल्या-भल्यानं कळले नाहीत तुम्ही काय? गुजरातचे मोदी, शहा आपल्या राज्यात येऊन आपल्याला ईडीची भीती दाखविता़ आपण जर गुजरातेत जाऊन मोदी, शहा यांच्या विरोधात बोललो, तर सगळा गुजरात एकवटतो.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019loha-acलोहाNandedनांदेड