शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

शेतकरी संघटनेच्या वतीने हदगाव येथे महाचर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:54 IST

या चर्चासत्रात शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट, स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस गुणवंत पाटील हंगरगेकर, माजी कुलगुरू डॉ. ...

या चर्चासत्रात शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट, स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस गुणवंत पाटील हंगरगेकर, माजी कुलगुरू डॉ. चारुदत्त माई, प्रसिद्ध साहित्यिक इंद्रजित भालेराव, प्रदेश अध्यक्ष ॲड. दिनेश शर्मा, माजी आ. ॲड. वामनराव चटप, खा. प्रताप पाटील चिखलीकर, खा. हेमंत पाटील, आ. राम पाटील रातोळीकर, शेतकरी संघटनेचे मराठवाडा विभागप्रमुख सुधीर बिंदू, बीटी बियाणे तंत्रज्ञान प्रणेते ललित बहाळे, उद्योजक विजय नेवल, महिला नेत्या सीमाताई नरोडे, हवामान अभ्यासक पंजाबराव पाटील डख, स्वभाप जिल्हाध्यक्ष ॲड. धोंडीबा पवार आदी मार्गदर्शन करून चर्चेत सहभागी होणार आहेत.

भाजप सरकारने केंद्रातील नवीन शेतीविषयक तीन कायदे संसदेत व राज्यसभेत पारित केले. कायदा लागू करू नये, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते, असे सर्व विरोधी पक्षांना वाटते. परंतु केंद्र सरकारने हे कायदे रद्द करता येणार नाहीत. शक्य तर शेतकऱ्यांशी चर्चा करून बदल करता येतील. काही सुधारणा करता येतील अशी भूमिका घेतलेली असताना संपूर्ण देशात सरकारच्या या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. कधी नव्हे तो शहरी व नोकरदारवर्ग शेतकऱ्यांच्या बाजूने उभा टाकल्याचे दिसून येत आहे. परंतु हे कायदे नेमके काय म्हणतात? कायद्यात काय तरतुदी आहेत, त्याचा शेतकऱ्यांच्या व्यवसायावर व जीवनावर काय परिणाम होईल? विरोधकांनी आरोप केल्याप्रमाणे खरेच उद्योगपती शेतकऱ्यांना लुटतील का? याविषयी सर्वच नागरिकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले आहे. त्यासाठी या कायद्याविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शन व चर्चा घडवून यावी म्हणून हदगांव तालुका शेतकरी संघटनेने या चर्चासत्राचे आयोजन केले आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांनी दिली.