शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

शेतकरी संघटनेच्या वतीने हदगाव येथे महाचर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:54 IST

या चर्चासत्रात शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट, स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस गुणवंत पाटील हंगरगेकर, माजी कुलगुरू डॉ. ...

या चर्चासत्रात शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट, स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस गुणवंत पाटील हंगरगेकर, माजी कुलगुरू डॉ. चारुदत्त माई, प्रसिद्ध साहित्यिक इंद्रजित भालेराव, प्रदेश अध्यक्ष ॲड. दिनेश शर्मा, माजी आ. ॲड. वामनराव चटप, खा. प्रताप पाटील चिखलीकर, खा. हेमंत पाटील, आ. राम पाटील रातोळीकर, शेतकरी संघटनेचे मराठवाडा विभागप्रमुख सुधीर बिंदू, बीटी बियाणे तंत्रज्ञान प्रणेते ललित बहाळे, उद्योजक विजय नेवल, महिला नेत्या सीमाताई नरोडे, हवामान अभ्यासक पंजाबराव पाटील डख, स्वभाप जिल्हाध्यक्ष ॲड. धोंडीबा पवार आदी मार्गदर्शन करून चर्चेत सहभागी होणार आहेत.

भाजप सरकारने केंद्रातील नवीन शेतीविषयक तीन कायदे संसदेत व राज्यसभेत पारित केले. कायदा लागू करू नये, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते, असे सर्व विरोधी पक्षांना वाटते. परंतु केंद्र सरकारने हे कायदे रद्द करता येणार नाहीत. शक्य तर शेतकऱ्यांशी चर्चा करून बदल करता येतील. काही सुधारणा करता येतील अशी भूमिका घेतलेली असताना संपूर्ण देशात सरकारच्या या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. कधी नव्हे तो शहरी व नोकरदारवर्ग शेतकऱ्यांच्या बाजूने उभा टाकल्याचे दिसून येत आहे. परंतु हे कायदे नेमके काय म्हणतात? कायद्यात काय तरतुदी आहेत, त्याचा शेतकऱ्यांच्या व्यवसायावर व जीवनावर काय परिणाम होईल? विरोधकांनी आरोप केल्याप्रमाणे खरेच उद्योगपती शेतकऱ्यांना लुटतील का? याविषयी सर्वच नागरिकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले आहे. त्यासाठी या कायद्याविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शन व चर्चा घडवून यावी म्हणून हदगांव तालुका शेतकरी संघटनेने या चर्चासत्राचे आयोजन केले आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांनी दिली.