शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
2
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
3
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
4
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
5
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
6
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
7
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
8
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
9
Video: "मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
10
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
11
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
12
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
13
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
14
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
15
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
16
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!
17
Navratri 2025: नवरात्रीत मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीला पारिजाताची फुलं वाहिल्याने होणारे लाभ 
18
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
19
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
20
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 

कागदावरील निधीवरूनच लोणीकरांची आगपाखड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 00:41 IST

पाणीपुरवठा योजनांसाठी निधी देवूनही तो खर्च केला जात नसल्याचे सांगत शुक्रवारी पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली़ यावेळी त्यांनी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांवरही निष्क्रियतेचा ठपका ठेवत आरोपांच्या फैरी झाडल्या़ प्रत्यक्षात लोणीकर म्हणतात तेवढा निधीच प्राप्त झालेला नाही़ पाणीपुरवठा योजनांसाठीचा १३५ कोटींचा आराखडा मंजूर आहे़ केवळ या मंजुरीवरुनच लोणीकरांनी आगपाखड केल्याचे आता पुढे आहे़

ठळक मुद्देपदाधिकारी म्हणतात, पैसे मिळालेच नाहीत

विशाल सोनटक्के ।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : पाणीपुरवठा योजनांसाठी निधी देवूनही तो खर्च केला जात नसल्याचे सांगत शुक्रवारी पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली़ यावेळी त्यांनी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांवरही निष्क्रियतेचा ठपका ठेवत आरोपांच्या फैरी झाडल्या़ प्रत्यक्षात लोणीकर म्हणतात तेवढा निधीच प्राप्त झालेला नाही़ पाणीपुरवठा योजनांसाठीचा १३५ कोटींचा आराखडा मंजूर आहे़ केवळ या मंजुरीवरुनच लोणीकरांनी आगपाखड केल्याचे आता पुढे आहे़महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनामध्ये शुक्रवारी ४१ कोटी १७ लक्ष रुपये किमतीच्या १० पाणीपुरवठा योजनांचे ई-भूमिपूजन पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते झाले़ या कार्यक्रमाला आ़ प्रतापराव पाटील चिखलीकर, आ़ राम पाटील रातोळीकर यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई जवळगावकर आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती़ कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनाबाबतचा आढावा मंत्री महोदयांसमोर सादर केला़ त्यानंतर लोणीकर यांनी कार्यक्रमाची सूत्रे आपल्या हातात घेतली़लग्न झाल्यानंतर वर्षभरात मूल होते, येथे दोन वर्षे उलटूनही पाणी पुरवठ्याची कामे पूर्ण होत नसल्याचे सांगत अशा निष्क्रिय अधिकारी, कर्मचाऱ्यांना म्हशीचे इंजेक्शन द्यावे लागेल, असे वादग्रस्त विधान करीत पाणीपुरवठा योजनांसाठी कोट्यवधीचा निधी दिला आहे़ मात्र त्यातील अनेक योजना अर्धवट असून काही योजनांनातर सुरुवातही झाली नसल्याचे ते म्हणाले़ सदर कामे रखडल्याप्रकरणी संबंधिताविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देशही पाणी पुरवठामंत्र्यांनी या कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले़दरम्यान, यासंबंधी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव म्हणाले की, पाणीपुरवठामंत्री लोणीकर यांनी शुक्रवारी धादांत खोडे विधान केले़ सहा महिन्यांपूर्वी मी स्वत: जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांना गती मिळावी, या योजनांसाठी निधी मिळावा यासाठी मुंबईला मंत्रालयात जावून लोणीकर यांची भेट घेतली होती़ त्यावेळी योजनांसाठी निधी देण्याचे माझी तयारी आहे़ परंतु शासनाच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे सांगत त्यांनी यासाठी राज्याच्या अर्थ विभागाला जबाबदार धरले होते़ लोणीकर सांगतात त्याप्रमाणे पाणी पुरवठा योजनांसाठीचा कुठलाही निधी दोन वर्षांपासून पडून नाही़दरम्यान, यासंबंधी वरिष्ठ अधिका-यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता बहुतांश अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास असमर्थता व्यक्त केली़ या वादात आम्हाला ओढू नका असेच या अधिका-यांचे म्हणणे होते़ जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाला सद्य:स्थितीत मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतून ४ कोटी ९९ लाखाचा निधी प्राप्त झालेला आहे़ तर केंद्राच्या राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजनासाठी ११ कोटी मिळालेले आहेत़ आणि ही सर्व कामे मार्च २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे़ पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री लोणीकर यांनी ज्या १३५ कोटींच्या निधीचा उल्लेख शुक्रवारच्या कार्यक्रमात केला तो निधी प्रत्यक्षात मिळालेला नसून १३५ कोटींच्या प्रकल्प आराखड्यास केवळ मंजुरी मिळालेली आहे़ ही परिस्थिती पाहता लोणीकर यांनी केवळ कागदावरील आराखड्यावरुनच आगपाखड केली की प्रत्यक्षात निधीही दिलेला आहे़ याचे उत्तरही तूर्ततरी पाणीपुरवठा विभागाकडील बंद संचिकामध्येच आहे़

जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांसाठी राज्य शासनाने किती निधी दिला आणि त्यातील किती निधी वापरला याची माहिती घेत आहोत़ मात्र काल पाणीपुरवठा मंत्री लोणीकर ज्या भाषेत आणि ज्याप्रकारे बोलले ती पद्धत निषेधार्ह आहे़ पाणीपुरवठामंत्र्यानी मंचावर महिला पदाधिकारी बसलेल्या आहेत़ किमान याचेतरी भान राखायला हवे होते़ अधिकाऱ्यांना अत्यंत खालच्या पातळीवर जावून ते बोलले़ या वाचाळवीरांना पक्षश्रेष्ठींनी थांबविले पाहिजे की यांना पक्षाचेही समर्थ आहे ?- आ़डी़पी़सावंत

शुक्रवारचा भूमिपूजन सोहळा हा जाहीर कार्यक्रम होता़ आणि पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर जे बोलले ते सर्वांच्या समोर बोलले़ जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांसाठी राज्य शासनाने निधी दिलेला आहे़ मात्र त्याचा विनीयोग होत नसेल तर संताप येणारच़ निधी न देता लोणीकर बोलले असे म्हणण्यात काहीही अर्थ नाही़ तसे असेल तर कार्यक्रमात मंचावर असलेल्या जिल्हा परिषदेच्या एकाही पदाधिकाºयांनी ते खोटे बोलत असल्याचे तेथेच का सांगितले नाही ?-आ़राम पाटील रातोळीकर

भाजपा सरकार आणि पदाधिकाऱ्यांची अवस्था ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी झाली आहे़ पाणीपुरवठा योजनांसाठी निधी द्या म्हणून, मी स्वत: पाठपुरावा केलेला आहे़ मात्र दोन वर्षांत निधी मिळालेला नाही़ केवळ योजनांची नावे बदलण्यात हे सरकार मश्गुल आहे़ शुक्रवारच्या कार्यक्रमात मंत्रीमहोदयांनी जे बेताल वक्तव्य केले़ ते लाजीरवाणे आहे़ ही भाषा मंत्र्यांना शोभणारी नाही़ कालच्या वक्तव्यावरुन हा पक्ष किती बेजबाबदार आहे हे दिसून येते़- समाधान जाधव, जि़प़उपाध्यक्ष

टॅग्स :NandedनांदेडNanded zpनांदेड जिल्हा परिषदBabanrao Looneykarबबनराव लोणीकरEmployeeकर्मचारीD.P. Sawantडी. पी. सावंत