शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

नांदेड जिल्ह्यात २३ हजार शेतकºयांना कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:54 IST

नांदेड : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत केलेल्या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील ३ लाख १२ हजार ७१२ शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज केले आहेत़ आजपर्यंत जिल्ह्यातील १२४७ गावांतील २३ हजार १७९ शेतकºयांच्या कर्जमाफीला ग्रीन सिग्नल मिळाला आहे़ चार बँकांतील ८ हजार ९७० शेतकºयांचे कर्जमाफीचे ६१ कोटी २४ लाख रूपये मंजूूर झाले आहेत.

ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना : ग्रीन लीस्टमध्ये नाव येण्याची शेतकयांना प्रतीक्षा

श्रीनिवास भोसले।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत केलेल्या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील ३ लाख १२ हजार ७१२ शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज केले आहेत़ आजपर्यंत जिल्ह्यातील १२४७ गावांतील २३ हजार १७९ शेतकºयांच्या कर्जमाफीला ग्रीन सिग्नल मिळाला आहे़ चार बँकांतील ८ हजार ९७० शेतकºयांचे कर्जमाफीचे ६१ कोटी २४ लाख रूपये मंजूूर झाले आहेत.शासनाने मोठा गाजावाजा करीत शेतकºयांची कर्जमाफी केली़ परंतु, या निर्णयाला पाच महिने उलटले तरी अद्याप प्रत्यक्षात किती शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ झाला हे कोणालाही सांगता येत नाही़ आजपर्यंत पात्र शेतकºयांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत़ दरम्यान, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे प्राप्त आकडेवारीवरून पंधरा तालुक्यांतील १२४७ गावांतील २३ हजार १७९ शेतकरी पात्र ठरले आहेत़ ही यादी कर्जमाफीच्या संकेतस्थळावर ग्रीन लिस्टमध्ये आहे़ तर जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांची कर्जमाफी त्रुटी आणि तांत्रिक प्रक्रियेमध्ये अडकली आहे़ग्रीन लिस्टप्रमाणे जिल्ह्यातील कर्जमाफी लाभार्थीसंख्या पुढीलप्रमाणे- नांदेड तालुक्यातील ६५ गावांतील १७८२, कंधार ११९ गावांतील १३६०, लोहा तालुक्यातील ९६ गांवातील १३८५, मुखेड १२७ गावांतील ५९४६, देगलूर-९१ गावांतील ७२४, बिलोली- ७५ गावांतील १ हजार ८६ शेतकरी, नायगाव तालुक्यात ८१ गावांतील १ हजार ९५, हदगाव तालुक्यातील ११५ गावांतील ३ हजार ५६२, अर्धापूर तालुक्यात ४० गावांतील ८९३, मुदखेड - ५३ गावांचे ३९९, भोकर ७२ गावांतील १०६५, उमरी- ६० गावांतील ५९, किनवट - १३३ गावांतील ८४९, माहूर ६४ गावांतील ८९९ तर हिमायतनगर तालुक्यातील ५६ गावांतील २ हजार ७५ असे एकूण २३ हजार १७९ शेतकरी पहिल्या यादीत पात्र ठरले तर धर्माबाद तालुक्याची माहिती उपलब्ध झाली नाही़चार बँकांचे ६१ कोटी २४ लाख रूपये मंजूरस्टेट बँक आॅफ इंडियाच्या ४ हजार ६७२ शेतकरी खातेदारांचे ३३ कोटी ३० लाख रूपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या ४ हजार २८२ खातेदारांचे २७ कोटी ७४ लाख, आंध्र बँकेच्या ४ खातेदारांचे ७ लाख तर पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँकेच्या १२ खातेदारांचे १३ लाख असे एकूण ६१ कोटी २४ लाख रूपये मंजूर झाल्याचे लीड बँकेचे व्यवस्थापक विजय उशीर यांनी सांगितले़ यात बहुतांश शेतकºयांची कर्जमाफीची रक्कम त्यांच्या खात्यावर वर्ग झाली आहे़ उर्वरित शेतकºयांचीदेखील लवकरच होईल, असे त्यांनी सांगितले़४सरसकट कर्जमाफी निर्णयानंतर शासनाने आठ ते नऊ जीआर काढले़ यातून शासनाला कमीत कमी शेतकºयांना लाभ द्यायचा हे स्पष्ट होते़ नवीन कर्ज बंद पडले, त्यामुळे पेरणी, उत्पन्न घटणार, यातून आर्थिक कोंडी होवून पुन्हा शेतकरी अडचणीत सापडणार आहे़ कर्जमाफीची रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा होण्यास जेवढा विलंब लागेल, तेवढा परिणाम सरकारला भोगावा लागेल़ - शंकर अण्णा धोंडगे, शेतकरी नेते़