शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

नांदेड जिल्ह्यात २३ हजार शेतकºयांना कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:54 IST

नांदेड : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत केलेल्या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील ३ लाख १२ हजार ७१२ शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज केले आहेत़ आजपर्यंत जिल्ह्यातील १२४७ गावांतील २३ हजार १७९ शेतकºयांच्या कर्जमाफीला ग्रीन सिग्नल मिळाला आहे़ चार बँकांतील ८ हजार ९७० शेतकºयांचे कर्जमाफीचे ६१ कोटी २४ लाख रूपये मंजूूर झाले आहेत.

ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना : ग्रीन लीस्टमध्ये नाव येण्याची शेतकयांना प्रतीक्षा

श्रीनिवास भोसले।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत केलेल्या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील ३ लाख १२ हजार ७१२ शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज केले आहेत़ आजपर्यंत जिल्ह्यातील १२४७ गावांतील २३ हजार १७९ शेतकºयांच्या कर्जमाफीला ग्रीन सिग्नल मिळाला आहे़ चार बँकांतील ८ हजार ९७० शेतकºयांचे कर्जमाफीचे ६१ कोटी २४ लाख रूपये मंजूूर झाले आहेत.शासनाने मोठा गाजावाजा करीत शेतकºयांची कर्जमाफी केली़ परंतु, या निर्णयाला पाच महिने उलटले तरी अद्याप प्रत्यक्षात किती शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ झाला हे कोणालाही सांगता येत नाही़ आजपर्यंत पात्र शेतकºयांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत़ दरम्यान, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे प्राप्त आकडेवारीवरून पंधरा तालुक्यांतील १२४७ गावांतील २३ हजार १७९ शेतकरी पात्र ठरले आहेत़ ही यादी कर्जमाफीच्या संकेतस्थळावर ग्रीन लिस्टमध्ये आहे़ तर जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांची कर्जमाफी त्रुटी आणि तांत्रिक प्रक्रियेमध्ये अडकली आहे़ग्रीन लिस्टप्रमाणे जिल्ह्यातील कर्जमाफी लाभार्थीसंख्या पुढीलप्रमाणे- नांदेड तालुक्यातील ६५ गावांतील १७८२, कंधार ११९ गावांतील १३६०, लोहा तालुक्यातील ९६ गांवातील १३८५, मुखेड १२७ गावांतील ५९४६, देगलूर-९१ गावांतील ७२४, बिलोली- ७५ गावांतील १ हजार ८६ शेतकरी, नायगाव तालुक्यात ८१ गावांतील १ हजार ९५, हदगाव तालुक्यातील ११५ गावांतील ३ हजार ५६२, अर्धापूर तालुक्यात ४० गावांतील ८९३, मुदखेड - ५३ गावांचे ३९९, भोकर ७२ गावांतील १०६५, उमरी- ६० गावांतील ५९, किनवट - १३३ गावांतील ८४९, माहूर ६४ गावांतील ८९९ तर हिमायतनगर तालुक्यातील ५६ गावांतील २ हजार ७५ असे एकूण २३ हजार १७९ शेतकरी पहिल्या यादीत पात्र ठरले तर धर्माबाद तालुक्याची माहिती उपलब्ध झाली नाही़चार बँकांचे ६१ कोटी २४ लाख रूपये मंजूरस्टेट बँक आॅफ इंडियाच्या ४ हजार ६७२ शेतकरी खातेदारांचे ३३ कोटी ३० लाख रूपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या ४ हजार २८२ खातेदारांचे २७ कोटी ७४ लाख, आंध्र बँकेच्या ४ खातेदारांचे ७ लाख तर पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँकेच्या १२ खातेदारांचे १३ लाख असे एकूण ६१ कोटी २४ लाख रूपये मंजूर झाल्याचे लीड बँकेचे व्यवस्थापक विजय उशीर यांनी सांगितले़ यात बहुतांश शेतकºयांची कर्जमाफीची रक्कम त्यांच्या खात्यावर वर्ग झाली आहे़ उर्वरित शेतकºयांचीदेखील लवकरच होईल, असे त्यांनी सांगितले़४सरसकट कर्जमाफी निर्णयानंतर शासनाने आठ ते नऊ जीआर काढले़ यातून शासनाला कमीत कमी शेतकºयांना लाभ द्यायचा हे स्पष्ट होते़ नवीन कर्ज बंद पडले, त्यामुळे पेरणी, उत्पन्न घटणार, यातून आर्थिक कोंडी होवून पुन्हा शेतकरी अडचणीत सापडणार आहे़ कर्जमाफीची रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा होण्यास जेवढा विलंब लागेल, तेवढा परिणाम सरकारला भोगावा लागेल़ - शंकर अण्णा धोंडगे, शेतकरी नेते़