शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

साहित्यसेवा म्हणजे सत्याची आराधना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 00:43 IST

साहित्य म्हणजे फक्त सत्याची आराधना असते, पण आज या क्षेत्रातही प्रदूषण निर्माण होऊ पाहत आहे. हे संपवण्यासाठी लेखणी हातात धरणाऱ्यांनी साहित्याचं पावित्र्य अबाधित ठेवणं हे त्यांचे कर्तव्यच आहे, असे प्रतिपादन अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

ठळक मुद्देपुरस्कार वितरण सोहळा : श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : साहित्य म्हणजे फक्त सत्याची आराधना असते, पण आज या क्षेत्रातही प्रदूषण निर्माण होऊ पाहत आहे. हे संपवण्यासाठी लेखणी हातात धरणाऱ्यांनी साहित्याचं पावित्र्य अबाधित ठेवणं हे त्यांचे कर्तव्यच आहे, असे प्रतिपादन अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.नांदेडच्या प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणा-या वाङ्मय पुरस्कार सोहळ्यात डॉ. सबनीस प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी पुरस्कारविजेते ज्येष्ठ कवी तथा चित्रकार भ.मा. परसवाळे, प्रदीप पाटील, बाळू दुगडूमवार, प्रसाद बन वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अच्युत बन, पुरस्कार समितीचे समन्वयक तथा लेखक प्राचार्य डॉ. सुरेश सावंत यांची उपस्थिती होती.पुढे बोलताना डॉ. सबनीस म्हणाले, आज शेतक-यांच्या दु:खाचं, त्यांच्या मरणाचं वर्णन साहित्यिक आपल्या साहित्यातून करतात. त्यावर कविता, कादंबºया लिहितात, परंतु, शेतक-यांवर ही वेळ का आणि कोणामुळे आली ? हे आता उजागर करण्यासाठी लेखन झालं पाहिजे. शेतकरीच का मरतो ? याच्या मुळाशी जाऊन लेखकांनी लिहिणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगितले.साहित्यामुळे संस्कृतीचे सर्व पदर शुद्ध झाले पाहिजेत, असे सांगून डॉ. सबनीस म्हणाले, लेखकांनी आपल्या संवेदना जागृत ठेवून लिहिताना विशिष्ट चौकटीत आपली बुद्धी गहाण ठेवता कामा नये. तसं झालं तर साहित्याचे खरं आकलन होणार नाही.दरम्यान, यावेळी बन पुरस्कार विजेते अभिजित हेगशेट्टे, प्रदीप पाटील, बाळू दुगडूमवार हे साहित्याचे आशास्थाने आहेत, असे सांगून डॉ. सबनीस यांनी पुरस्कार विजेत्यांच्या साहित्यकृतींचा गौरवाने उल्लेख केला. कार्यक्रमात प्रसिद्ध चित्रकार व ज्येष्ठ कवी भ. मा. परसवाळे यांना यावेळी ‘मातोश्री पद्मिनीबाई बन’ साधना सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी भ. मा. विचार व्यक्त करताना म्हणाले, कुठलाही चांगला लेखक हा त्याच्या निर्मितीशी, संहितेशी प्रामाणिक असला पाहिजे; पण आज अनेक पुरस्कारांच्या बाबतीत साशंकता निर्माण व्हावी, असे वातावरण आहे. पुरस्काराच्या मागे लागणारा हा खरा लेखक, कवी होऊच शकत नाही, असे सांगून परसवाळे यांनी साहित्य क्षेत्रातल्या वाईट आणि असभ्य प्रथांवर यावेळी ताशेरे ओढले.तसेच पुरस्कारविजेते कादंबरीकार अभिजित हेगशेट्ये म्हणाले, कोकणातल्या उद्ध्वस्त होत असलेल्या भूमिपुत्रांची कथा ‘मी रानवीचा माळ’ या कादंबरीतून पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. आज आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे असे डावपेच आणि षड्यंत्र सुरू आहेत की एखाद्या समूहाची सवयच बदलून टाकून तिथे आपले अधिराज्य निर्माण करण्याचा कापोर्रेट फंडा सुरू झाला आहे. हे कारस्थान हाणून पाडण्याचा सर्वच स्तरावर प्रयत्न झाला पाहिजे.तसेच प्रसाद बन वाङ्यम पुरस्काराचे मानकरी प्रदीप पाटील यावेळी म्हणाले, ‘गावकळा’ मधून मी वस्तुस्थिती समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. खेड्यातला सामान्य माणूसही कसा निधार्राने उभा राहून मोठं काम करू शकतो, याचं चित्रण ‘गावकळा’मधून केलं आहे. आजच्या पुरस्काराने खूप आनंद झाला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अच्युत बन यांनी केले. सूत्रसंचालन प्राचार्य डॉ. सुरेश सावंत तर डॉ. सौ. वर्षा बन यांनी आभार मानले. पुरस्कार वितरण सोहळ्यास साहित्यिक आणि साहित्यप्रेमी रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :Shripal Sabnisश्रीपाल सबनीसliteratureसाहित्यFarmerशेतकरी