शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

साहित्यसेवा म्हणजे सत्याची आराधना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 00:43 IST

साहित्य म्हणजे फक्त सत्याची आराधना असते, पण आज या क्षेत्रातही प्रदूषण निर्माण होऊ पाहत आहे. हे संपवण्यासाठी लेखणी हातात धरणाऱ्यांनी साहित्याचं पावित्र्य अबाधित ठेवणं हे त्यांचे कर्तव्यच आहे, असे प्रतिपादन अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

ठळक मुद्देपुरस्कार वितरण सोहळा : श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : साहित्य म्हणजे फक्त सत्याची आराधना असते, पण आज या क्षेत्रातही प्रदूषण निर्माण होऊ पाहत आहे. हे संपवण्यासाठी लेखणी हातात धरणाऱ्यांनी साहित्याचं पावित्र्य अबाधित ठेवणं हे त्यांचे कर्तव्यच आहे, असे प्रतिपादन अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.नांदेडच्या प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणा-या वाङ्मय पुरस्कार सोहळ्यात डॉ. सबनीस प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी पुरस्कारविजेते ज्येष्ठ कवी तथा चित्रकार भ.मा. परसवाळे, प्रदीप पाटील, बाळू दुगडूमवार, प्रसाद बन वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अच्युत बन, पुरस्कार समितीचे समन्वयक तथा लेखक प्राचार्य डॉ. सुरेश सावंत यांची उपस्थिती होती.पुढे बोलताना डॉ. सबनीस म्हणाले, आज शेतक-यांच्या दु:खाचं, त्यांच्या मरणाचं वर्णन साहित्यिक आपल्या साहित्यातून करतात. त्यावर कविता, कादंबºया लिहितात, परंतु, शेतक-यांवर ही वेळ का आणि कोणामुळे आली ? हे आता उजागर करण्यासाठी लेखन झालं पाहिजे. शेतकरीच का मरतो ? याच्या मुळाशी जाऊन लेखकांनी लिहिणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगितले.साहित्यामुळे संस्कृतीचे सर्व पदर शुद्ध झाले पाहिजेत, असे सांगून डॉ. सबनीस म्हणाले, लेखकांनी आपल्या संवेदना जागृत ठेवून लिहिताना विशिष्ट चौकटीत आपली बुद्धी गहाण ठेवता कामा नये. तसं झालं तर साहित्याचे खरं आकलन होणार नाही.दरम्यान, यावेळी बन पुरस्कार विजेते अभिजित हेगशेट्टे, प्रदीप पाटील, बाळू दुगडूमवार हे साहित्याचे आशास्थाने आहेत, असे सांगून डॉ. सबनीस यांनी पुरस्कार विजेत्यांच्या साहित्यकृतींचा गौरवाने उल्लेख केला. कार्यक्रमात प्रसिद्ध चित्रकार व ज्येष्ठ कवी भ. मा. परसवाळे यांना यावेळी ‘मातोश्री पद्मिनीबाई बन’ साधना सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी भ. मा. विचार व्यक्त करताना म्हणाले, कुठलाही चांगला लेखक हा त्याच्या निर्मितीशी, संहितेशी प्रामाणिक असला पाहिजे; पण आज अनेक पुरस्कारांच्या बाबतीत साशंकता निर्माण व्हावी, असे वातावरण आहे. पुरस्काराच्या मागे लागणारा हा खरा लेखक, कवी होऊच शकत नाही, असे सांगून परसवाळे यांनी साहित्य क्षेत्रातल्या वाईट आणि असभ्य प्रथांवर यावेळी ताशेरे ओढले.तसेच पुरस्कारविजेते कादंबरीकार अभिजित हेगशेट्ये म्हणाले, कोकणातल्या उद्ध्वस्त होत असलेल्या भूमिपुत्रांची कथा ‘मी रानवीचा माळ’ या कादंबरीतून पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. आज आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे असे डावपेच आणि षड्यंत्र सुरू आहेत की एखाद्या समूहाची सवयच बदलून टाकून तिथे आपले अधिराज्य निर्माण करण्याचा कापोर्रेट फंडा सुरू झाला आहे. हे कारस्थान हाणून पाडण्याचा सर्वच स्तरावर प्रयत्न झाला पाहिजे.तसेच प्रसाद बन वाङ्यम पुरस्काराचे मानकरी प्रदीप पाटील यावेळी म्हणाले, ‘गावकळा’ मधून मी वस्तुस्थिती समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. खेड्यातला सामान्य माणूसही कसा निधार्राने उभा राहून मोठं काम करू शकतो, याचं चित्रण ‘गावकळा’मधून केलं आहे. आजच्या पुरस्काराने खूप आनंद झाला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अच्युत बन यांनी केले. सूत्रसंचालन प्राचार्य डॉ. सुरेश सावंत तर डॉ. सौ. वर्षा बन यांनी आभार मानले. पुरस्कार वितरण सोहळ्यास साहित्यिक आणि साहित्यप्रेमी रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :Shripal Sabnisश्रीपाल सबनीसliteratureसाहित्यFarmerशेतकरी