शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

शेतात जाण्यासाठी नदीतून जीवघेणा प्रवास, पुलाअभावी शेकडो हेक्टर जमीन पेरणी अभावी पडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 07:38 IST

पर्यायी पुलासाठी अनेकवेळा शासनाला साकडे घालूनही हा प्रश्न सुटलेला नाही.

- शेख शब्बीर देगलूर (जि. नांदेड) : मन्याड नदीच्या एका बाजूला गाव अन् एका बाजूला शेत असल्याने शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. जवळपास बारमाही वाहणाऱ्या मन्याड नदीला पावसाळ्यात कायम पूरसदृश स्थिती असते. त्यामुळे शेकडो हेक्टर जमीन पेरणीअभावी पडीत राहते. पर्यायी पुलासाठी अनेकवेळा शासनाला साकडे घालूनही हा प्रश्न सुटलेला नाही.

दोन तालुक्यांतील ५०० एकर शेतजमीन मन्याड नदीच्या दोन्ही बाजूला बिलोली तालुक्यातील गळेगाव व देगलूर तालुक्यातील वझरगा, तुपशेळगाव, आलूर, शहापूर, लिंबा या गावातील शेतकऱ्यांची जवळपास ५०० एकर शेतजमीन आहे. मात्र, या शेतकऱ्यांना रस्ता नसल्याने नदीपात्रातूनच जीव मुठीत धरून ये-जा करावी लागते.    

अनेकांना पेरणीच करता आली नाही मागील वर्षी मन्याड नदीचे खोलीकरण व रुंदीकरण केल्याने पाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे यंदा जवळपास ३५ ते ४० टक्के शेतकऱ्यांनाच पेरणी करता आली आहे.  शासनाने या मन्याड नदीवर एक लहानसा पूल तयार करून द्यावा, जेणेकरून शेतकऱ्यांना सुरक्षित शेतात जाऊन शेताची मशागत, पेरणी करता येईल, असे निवेदन वझरगा येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. 

पुरामुळे शेतात अडकतात शेतकरीज्या-ज्या वेळेस मन्याड नदीला पूर येतो, त्यावेळी नदीकाठावरील शेतकऱ्यांना दोन-दोन दिवस शेतातच अडकून राहावे लागते. त्यावेळी शासनाकडून मोठी कसरत करीत त्या शेतकऱ्यांना बोटीद्वारे सुखरूप बाहेर आणले जाते. अशा घटना दर पावसाळ्यात घडतात. त्यामुळे नदीवर पूल बांधण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. 

शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी नदीतूनच जावे लागते. यंदा पुरामुळे शेतकरी पेरणीपासून वंचित राहिले. त्यामुळे शासनाने तत्काळ पूल बांधून द्यावा.  मष्णाजी औरादे, सरपंच वझरगा.

टॅग्स :Nandedनांदेड