शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

शेतात जाण्यासाठी नदीतून जीवघेणा प्रवास, पुलाअभावी शेकडो हेक्टर जमीन पेरणी अभावी पडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 07:38 IST

पर्यायी पुलासाठी अनेकवेळा शासनाला साकडे घालूनही हा प्रश्न सुटलेला नाही.

- शेख शब्बीर देगलूर (जि. नांदेड) : मन्याड नदीच्या एका बाजूला गाव अन् एका बाजूला शेत असल्याने शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. जवळपास बारमाही वाहणाऱ्या मन्याड नदीला पावसाळ्यात कायम पूरसदृश स्थिती असते. त्यामुळे शेकडो हेक्टर जमीन पेरणीअभावी पडीत राहते. पर्यायी पुलासाठी अनेकवेळा शासनाला साकडे घालूनही हा प्रश्न सुटलेला नाही.

दोन तालुक्यांतील ५०० एकर शेतजमीन मन्याड नदीच्या दोन्ही बाजूला बिलोली तालुक्यातील गळेगाव व देगलूर तालुक्यातील वझरगा, तुपशेळगाव, आलूर, शहापूर, लिंबा या गावातील शेतकऱ्यांची जवळपास ५०० एकर शेतजमीन आहे. मात्र, या शेतकऱ्यांना रस्ता नसल्याने नदीपात्रातूनच जीव मुठीत धरून ये-जा करावी लागते.    

अनेकांना पेरणीच करता आली नाही मागील वर्षी मन्याड नदीचे खोलीकरण व रुंदीकरण केल्याने पाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे यंदा जवळपास ३५ ते ४० टक्के शेतकऱ्यांनाच पेरणी करता आली आहे.  शासनाने या मन्याड नदीवर एक लहानसा पूल तयार करून द्यावा, जेणेकरून शेतकऱ्यांना सुरक्षित शेतात जाऊन शेताची मशागत, पेरणी करता येईल, असे निवेदन वझरगा येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. 

पुरामुळे शेतात अडकतात शेतकरीज्या-ज्या वेळेस मन्याड नदीला पूर येतो, त्यावेळी नदीकाठावरील शेतकऱ्यांना दोन-दोन दिवस शेतातच अडकून राहावे लागते. त्यावेळी शासनाकडून मोठी कसरत करीत त्या शेतकऱ्यांना बोटीद्वारे सुखरूप बाहेर आणले जाते. अशा घटना दर पावसाळ्यात घडतात. त्यामुळे नदीवर पूल बांधण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. 

शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी नदीतूनच जावे लागते. यंदा पुरामुळे शेतकरी पेरणीपासून वंचित राहिले. त्यामुळे शासनाने तत्काळ पूल बांधून द्यावा.  मष्णाजी औरादे, सरपंच वझरगा.

टॅग्स :Nandedनांदेड