शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

खून प्रकरणात तिघांना सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 12:41 AM

शहरातील जयभीमनगर भागात सुरु असलेले भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या एका तरुणाचा खंजीरने भोसकून खून करण्यात आला होता़

नांदेड : शहरातील जयभीमनगर भागात सुरु असलेले भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या एका तरुणाचा खंजीरने भोसकून खून करण्यात आला होता़ या प्रकरणात न्यायालयाने तिन्ही आरोपींना दहा वर्षे सक्तमजुरी आणि २ हजार रुपयांचा दंड ठोठावला़९ मार्च २०१७ रोजी जयभीमनगर भागात रात्री दहा वाजेच्या सुमारास आतिष ऊर्फ अक्षय गौतम वाघमारे (रा़ आंबेडकर नगर), अनिकेत ऊर्फ चिकू संदीप कांबळे व निहाल ऊर्फ शेट्टी विनायक पाईकराव हे तिघेजण मारोती जोंधळे या तरुणाला बेदम मारहाण करीत होते़ त्याचवेळी बुद्धभूषण कांबळे व अजय चित्ते हे दोघे जण भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करीत होते़ यावेळी आरोपी निहाल पाईकराव याने आमचे भांडण सोडविण्यास तू का मध्ये पडला असे म्हणून खंजीरने अजय चित्ते याच्यावर वार केला़ अजयने हा वार चुकविला़ त्यानंतर अनिकेत कांबळे याने अजयला पकडून ठेवले तर अक्षय वाघमारे व निहाल पाईकराव या दोघांनी अजयवर खंजीरने वार केले़ या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अजयला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ या ठिकाणी अजयचा मृत्यू झाला़ याप्रकरणी बुद्धभूषण कांबळे यांच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता़ या प्रकरणात न्या़ एस़एसख़रात यांनी ११ साक्षीदार तपासल्यानंतर अक्षय वाघमारे, अनिकेत कांबळे व निहाल पाईकराव या तिघांना दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली़ सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड़ यदूपत अर्धापूरकर यांनी बाजू मांडली़

टॅग्स :NandedनांदेडCourtन्यायालयLife Imprisonmentजन्मठेप