शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
8
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
9
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
10
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
11
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
12
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
13
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
14
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
17
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
18
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
19
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
20
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत डावा विचार प्रभावी राहणार : प्रदीप आपटे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 17:59 IST

आमुलाग्र बदल करण्याचा आग्रह धरणाऱ्या विचारांमधील प्रमुख प्रवाह म्हणजे मार्क्सवाद होय़

ठळक मुद्दे डाव्यांनी व्यवहार्य पर्याय देण्याची आवश्यकता

नांदेड : डाव्या विचारसरणीचा जगावर मोठा प्रभाव होता़ मात्र व्यवहार्य पर्याय न देता आल्यामुळे त्यांची पिछेहाट झाल्याचे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा़डॉ़ प्रदीप आपटे यांनी व्यक्त केले़ जोपर्यंत समाजाचे नियमन करणारी व्यवस्था ही त्यातील अन्यायाकडे पुरेसे लक्ष न देता मूळ प्रश्न सोडविण्याची इच्छाशक्ती दाखवित नाही, तोपर्यंत जगात डावा विचार प्रभावी राहील, असेही डॉ़आपटे यांनी स्पष्ट केले़ 

साहित्य संमेलन व्याख्यानमालेतर्फे आयोजित जगात डाव्या विचारांची पिछेहाट का? या विषयावर ते बोलत होते़ कोणतीही व्यवस्था चालत रहावी, यासाठी तिला एक प्रकारचे स्थैर्य लागते़ मात्र या स्थिरतेमुळे अनेकवेळा वैगुण्य निर्माण होतात आणि जनतेत असंतोष पसरतो़ या असंतोषाच्या कारणाचे निराकरण न झाल्यास लोक आमूलाग्र बदलाची मागणी करतात़ अशा बदलाची मागणी करणाऱ्यांना डाव्या विचारांचे मानले जाते़ मात्र हा विचार व्यवहार्य पर्याय देऊ शकला नसल्याचे मत डॉ़आपटे यांनी मांडले़ या चळवळीकडून केल्या जाणाऱ्या मागण्या अवास्तव असतात, अशी पुष्टीही जोडत डाव्या चळवळीमधील अभ्यासाची परंपरा संपली असल्याची टीका त्यांनी केली़ 

आमुलाग्र बदल करण्याचा आग्रह धरणाऱ्या विचारांमधील प्रमुख प्रवाह म्हणजे मार्क्सवाद होय़ जगभरातील डाव्या म्हणविणाऱ्यांनी मार्क्सच्या परिभाषेचा वापर केला़ मार्क्सने तत्कालीन बाजारपेठेवर आधारित समाज व्यवस्थेची उत्तम चिकित्सा केली़ मात्र क्रांतीद्वारे घडवून आणण्यात येणाऱ्या या आमुलाग्रह बदलाचे प्रारूप काय असेल, याची मांडणी मार्क्सकडून झाली नसल्याचे ते म्हणाले़ मार्क्सने जे क्रांतीनंतरच्या समाजाच्या चित्र रंगविले, तेही मनोराज्यवादीच आहे, अशी टीकाही आपटे यांनी केली़ मार्क्सवाद्यांनी बाजारपेठेची जागा केंद्रीयकृत नियोजन घेईल, अशी अपेक्षा केली होती़ परंतु बाजारपेठेमधून वस्तूंची देवाणघेवाण जितक्या कार्यक्षम पद्धतीने होते, तितकी ती केंद्रीयकृत नियोजन व्यवस्थेत होत नाही असे सांगत रशियन राज्यक्रांतीनंतर खुद्द लेनीन यांच्या लक्षात ही बाब आली होती़ म्हणूनच त्यांनी काही काळ सोवीयत रशियामध्ये बाजारपेठेच्या व्यवहारांना वाव दिल्याचे त्यांनी सांगितले़ स्वत:स साम्यवादी म्हणविणाऱ्या चीनने देखील मागील दोन दशकात बाजारपेठेवर आधारित व्यवस्था स्वीकारल्याचेही डॉ़आपटे यांनी उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिले़ 

व्याख्यानमालेचे प्रास्ताविक डॉ़विश्वाधार देशमुख, तर डॉ़दत्ताहरी होनराव यांनी आभार मानले़ कार्यक्रमास माजी खा़डॉ़व्यंकटेश काब्दे, प्रा़श्यामल पत्की, दीपनाथ पत्की, डॉ़प्रभाकर देव, प्रा़मधुकर राहेगावकर, शंतनू डोईफोडे, लक्ष्मण संगेवार आदींसह नागरिकांची उपस्थिती होती़ 

टॅग्स :NandedनांदेडSocialसामाजिकsocial workerसमाजसेवक