शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पुढाऱ्यांना प्रचाराची तर शेतकऱ्यांना मशागतीची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 00:57 IST

तालुका दुष्काळाने होरपळून निघाला. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेतकरी शेती मशागतीला मनोभावे सुरूवात करतो. परंतु, निवडणूक हंगामात पुढाऱ्यांना प्रचाराची व शेतक-यांना शेती मशागतीची चिंता सतावत आहे.

ठळक मुद्देपुढारी कार्यकर्ते तर शेतकरी सालगड्याच्या शोधात राजकारण व शेतीकारण मनधरणीत अडकले

कंधार : तालुका दुष्काळाने होरपळून निघाला. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेतकरी शेती मशागतीला मनोभावे सुरूवात करतो. परंतु, निवडणूक हंगामात पुढाऱ्यांना प्रचाराची व शेतक-यांना शेती मशागतीची चिंता सतावत आहे. पुढारी प्रचारासाठी कार्यकर्ते अन् शेतकरी सालगड्याचा शोध घेण्यात गुंतला असल्याचे चित्र आहे. राजकारण व शेतीकारण मनधरणीत अडकले असल्याचे मानले जात आहे.तालुक्यातील अनेक गावांतील नागरिकांनी दुष्काळामुळे वीटकाम, बांधकामासाठी हंगामी स्थलांतर केले आहे. निवडणूक मतदान तारीख जवळ येत आहे. परंतु, पक्ष कार्यकर्ते झपाटून प्रचारात उतरले नाहीत. त्यामुळे उमेदवार व पक्षनेत्यांना मोठी चिंता सतावत असल्याचे चित्र आहे. उपलब्ध कार्यकर्ते वाढत्या तापमानाने बाहेर पडण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे पुढा-यांना कार्यकर्त्यांची मनधरणी करावी लागत आहे.तालुक्यातील ४७ ग्रामपंचायती अतंर्गत असलेले ७७ मतदान केंदे्र मुखेड विधानसभेला जोडली आहेत. हा मतदारसंघ नांदेड लोकसभेत आहे. तसेच ६९ ग्रामपंचायतीअंतर्गत असलेली १३४ मतदान केंदे्र लोहा विधानसभेला जोडली आहेत. लोहा विधानसभा मतदारसंघ लातूर लोकसभेला जोडला आहे. त्यामुळे कार्यकर्ते जुळवताना पुढाºयांना कसरत करावी लागत आहे.गत काही वर्षांपासून शेतकºयांना सतत दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. सिंचन शेतीचे प्रमाण अत्यल्प असल्याने कोरडवाहू शेती आणि निसर्गपावसावर शेतीचे भवितव्य अवलंबून आहे. दुष्काळाने शेतीला पूरक असलेला दुग्ध व्यवसाय हा चारा, पाणी यामुळे अडचणीत अडकला आणि सालगड्याचे भाव वाढल्याने आर्थिक खर्च पेलवत नाही. अशा नानाविध समस्यांनी शेतकरी चिंतीत आहे. शेती अनेक समस्यांनी कितीही अडचणीत आली तरीही बळीराजा काळ्या आईवर कुटुंबाचा प्रपंच चालविण्यासाठी अवलंबून असतात. दुष्काळ, शेती मशागत, लागवड खर्च, पाऊस, उत्पादन, उतारा, शेतमाल भाव, मजुरांचे वाढते भाव आदींचा ताळमेळ लागत नाही. अल्प व अत्यल्पभूधारक शेतकºयांना सालगडी लागत नाही. परंतु, २ हेक्टरवरील शेतकºयांना सालगडी मिळत नाही.सालगड्याचे भाव ८० हजार ते १ लाख असे आहेत. त्यात पुन्हा सिंचन शेती व जास्त शेती असेल तर लाखाच्या वर भाव असतात. अनेक शेतमजूर सालगडी म्हणून काम करण्यापेक्षा ऊसतोडणी, वीटकाम, बांधकाम आदींकडे कल वाढला आहे. त्यामुळे शेतक-यांना मनधरणी करावी लागते. शेतकरी गुढीपाडव्याच्या दिवशी पेरणीपूर्व मशागत कामाला सुरूवात करतात. परंतु, सालगडी शोधताना दमछाक होत असल्याचे चित्र आहे. तसेच त्यांची मनधरणी करावी लागत आहे.तालुक्यात ६० हजारांपेक्षा अधिक खातेदाराची संख्या आहे. अल्प, अत्यल्पभूधारक खातेदार वगळता २ हेक्टरपेक्षा अधिक खातेदारसंख्या साडेसहा हजारांपेक्षा जास्त आहे, अशा बहुतांश शेतक-यांना सालगडी शोधताना व मनधरणी करताना कसरत करावी लागत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडFarmerशेतकरी