शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

पुढाऱ्यांना प्रचाराची तर शेतकऱ्यांना मशागतीची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 00:57 IST

तालुका दुष्काळाने होरपळून निघाला. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेतकरी शेती मशागतीला मनोभावे सुरूवात करतो. परंतु, निवडणूक हंगामात पुढाऱ्यांना प्रचाराची व शेतक-यांना शेती मशागतीची चिंता सतावत आहे.

ठळक मुद्देपुढारी कार्यकर्ते तर शेतकरी सालगड्याच्या शोधात राजकारण व शेतीकारण मनधरणीत अडकले

कंधार : तालुका दुष्काळाने होरपळून निघाला. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेतकरी शेती मशागतीला मनोभावे सुरूवात करतो. परंतु, निवडणूक हंगामात पुढाऱ्यांना प्रचाराची व शेतक-यांना शेती मशागतीची चिंता सतावत आहे. पुढारी प्रचारासाठी कार्यकर्ते अन् शेतकरी सालगड्याचा शोध घेण्यात गुंतला असल्याचे चित्र आहे. राजकारण व शेतीकारण मनधरणीत अडकले असल्याचे मानले जात आहे.तालुक्यातील अनेक गावांतील नागरिकांनी दुष्काळामुळे वीटकाम, बांधकामासाठी हंगामी स्थलांतर केले आहे. निवडणूक मतदान तारीख जवळ येत आहे. परंतु, पक्ष कार्यकर्ते झपाटून प्रचारात उतरले नाहीत. त्यामुळे उमेदवार व पक्षनेत्यांना मोठी चिंता सतावत असल्याचे चित्र आहे. उपलब्ध कार्यकर्ते वाढत्या तापमानाने बाहेर पडण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे पुढा-यांना कार्यकर्त्यांची मनधरणी करावी लागत आहे.तालुक्यातील ४७ ग्रामपंचायती अतंर्गत असलेले ७७ मतदान केंदे्र मुखेड विधानसभेला जोडली आहेत. हा मतदारसंघ नांदेड लोकसभेत आहे. तसेच ६९ ग्रामपंचायतीअंतर्गत असलेली १३४ मतदान केंदे्र लोहा विधानसभेला जोडली आहेत. लोहा विधानसभा मतदारसंघ लातूर लोकसभेला जोडला आहे. त्यामुळे कार्यकर्ते जुळवताना पुढाºयांना कसरत करावी लागत आहे.गत काही वर्षांपासून शेतकºयांना सतत दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. सिंचन शेतीचे प्रमाण अत्यल्प असल्याने कोरडवाहू शेती आणि निसर्गपावसावर शेतीचे भवितव्य अवलंबून आहे. दुष्काळाने शेतीला पूरक असलेला दुग्ध व्यवसाय हा चारा, पाणी यामुळे अडचणीत अडकला आणि सालगड्याचे भाव वाढल्याने आर्थिक खर्च पेलवत नाही. अशा नानाविध समस्यांनी शेतकरी चिंतीत आहे. शेती अनेक समस्यांनी कितीही अडचणीत आली तरीही बळीराजा काळ्या आईवर कुटुंबाचा प्रपंच चालविण्यासाठी अवलंबून असतात. दुष्काळ, शेती मशागत, लागवड खर्च, पाऊस, उत्पादन, उतारा, शेतमाल भाव, मजुरांचे वाढते भाव आदींचा ताळमेळ लागत नाही. अल्प व अत्यल्पभूधारक शेतकºयांना सालगडी लागत नाही. परंतु, २ हेक्टरवरील शेतकºयांना सालगडी मिळत नाही.सालगड्याचे भाव ८० हजार ते १ लाख असे आहेत. त्यात पुन्हा सिंचन शेती व जास्त शेती असेल तर लाखाच्या वर भाव असतात. अनेक शेतमजूर सालगडी म्हणून काम करण्यापेक्षा ऊसतोडणी, वीटकाम, बांधकाम आदींकडे कल वाढला आहे. त्यामुळे शेतक-यांना मनधरणी करावी लागते. शेतकरी गुढीपाडव्याच्या दिवशी पेरणीपूर्व मशागत कामाला सुरूवात करतात. परंतु, सालगडी शोधताना दमछाक होत असल्याचे चित्र आहे. तसेच त्यांची मनधरणी करावी लागत आहे.तालुक्यात ६० हजारांपेक्षा अधिक खातेदाराची संख्या आहे. अल्प, अत्यल्पभूधारक खातेदार वगळता २ हेक्टरपेक्षा अधिक खातेदारसंख्या साडेसहा हजारांपेक्षा जास्त आहे, अशा बहुतांश शेतक-यांना सालगडी शोधताना व मनधरणी करताना कसरत करावी लागत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडFarmerशेतकरी