शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सावळीची पाणीयोजना अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:56 IST

तालुक्यापासून तीन कि़मी़ अंतरावर असलेल्या सावळीत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले. गोदावरी नदी पात्रातून मुख्य पाईपलाईनचे काम सुरू झाले आहे़ केंद्र सरकारने सावळीच्या या पाणीपुरवठा योजनेसाठी सन २०१५ मध्ये पावणेदोन कोटी खर्चाला मान्यता दिली होती़ दरम्यान सिद्धेश्वर देवस्थानच्या पंचक्रोशीत वसलेल्या सावळी गावाची तहान सप्टेंबर अखेर भागणार आहे़ जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून युद्ध पातळीवर काम सुरू आहे़

ठळक मुद्दे१ कोटी ६२ लाखांची योजना, सप्टेंबरअखेर होणार पाणीपुरवठा

राजेश गंगमवार।लोकमत न्यूज नेटवर्कबिलोली : तालुक्यापासून तीन कि़मी़ अंतरावर असलेल्या सावळीत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले. गोदावरी नदी पात्रातून मुख्य पाईपलाईनचे काम सुरू झाले आहे़ केंद्र सरकारने सावळीच्या या पाणीपुरवठा योजनेसाठी सन २०१५ मध्ये पावणेदोन कोटी खर्चाला मान्यता दिली होती़ दरम्यान सिद्धेश्वर देवस्थानच्या पंचक्रोशीत वसलेल्या सावळी गावाची तहान सप्टेंबर अखेर भागणार आहे़ जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून युद्ध पातळीवर काम सुरू आहे़दुष्काळजन्य परिस्थितीत येथे टँकरनेही पाणीपुरवठा करण्याची वेळ येत होती़ गावच्या लोकसंख्येच्या तुलनेत अपुरा पाणीपुरवठा होत होता़ गावाची कायम टंचाई दूर करण्यासाठी गाव पातळीवर पाणीपुरवठा समिती करण्यात आली़ गावकऱ्यांनी नागनाथ पाटील नागराळे यांची समितीच्या अध्यक्षपदी निवड केली़ सन २०१५ च्या काळात तत्कालीन सरपंच सविता पाटील यांच्या उपस्थितीत ठराव घेऊन नवीन अद्ययावत पाणीपुरवठा योजनेसाठी प्रयत्न सुरू झाले़ जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सर्व अंदाजपत्रक तयार होऊन गोदावरी पात्रातून पाणीपुरवठ्यासाठी सर्वेक्षण झाले़सात किलोमीटर मुख्य पाईपलाईनसावळी गावासाठी गुजरी स्थित गोदावरी नदी पात्रातून सात किलोमीटर मुख्य पाईपलाईन टाकण्यात येत आहे़ गावात एक लाख ७५ हजार लिटर क्षमतेचे जलकुंभ उभारण्यात आले़ गोदा पात्रात भूमिगत विहीर खोदण्यात आली असून मोठ्या प्रमाणात पाणी लागले आहे़ १०० टक्के अनुदान असलेल्या या योजनेतून गावात लहान पाईपलाईन करण्यात येणार आहे़ सध्या शेतीची कामे नसल्यामुळे मुख्य मोठी पाईपलाईनचे काम गुजरी ते सावळी करण्यात येत आहे़ इलेक्ट्रिक मोटार, पंप हाऊस, वॉचमन, विद्युत रोहित्र आदींचे या योजनेत प्रावधान आहे़ जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्याच्या देखरेखखाली काम जोरात सुरू आहेग़्रामपंचायत व पाणीपुरवठा समितीच्या पाठपुराव्यामुळे तत्कालीन सरपंच सुनीता आरसे यांच्या काळात केंद्राकडून प्रशासकीय मान्यता मिळाली व अनुदान मंजूर झाले़ गाव पातळीवरची मूलभूत पाणीपुरवठा समस्या असल्याने गावकºयांनी अंतर्गत राजकारण बाजूला ठेवून योजनेसाठी प्रयत्न चालवले़ केंद्र सरकारकडून प्रभावी पाणीपुरवठा योजना मंजूर होण्याची ही पहिलीच वेळ होय़केंद्राच्या प्रभावी योजनेमुळे पाणीटंचाई संपुष्टात येईल -नागनाथ पाटील सावळीकर, सरपंच, सावळी़सावळी ग्रा.पं.नेपाणीपुरवठा समिती स्थापन करून ही मुलभूत समस्या दूर केली- आबाराव संगनोड, अध्यक्ष, सिद्धेश्वर देवस्थान समिती, सावळी़योजनेसाठी सतत पाठपुरावा केला़ योजनेची व्याप्ती मोठी असल्याने गावात पाणी समस्या राहणार नाही -गंगाधर आरसे, माजी सरपंचकामाची प्रगती पाहता दिवाळीपूर्वी गावकºयांना पाणी मिळेल अशी अपेक्षा आहे़ केंद्राकडे राज्य शासनाच्या माध्यमातून केलेले प्रयत्न कामी आले - शेख जानेमियाँ, माजी उपसरपंच, सावळी़

टॅग्स :water transportजलवाहतूकwater scarcityपाणी टंचाईfundsनिधी