शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

२०२० पर्यंत लेंडी प्रकल्पात अडविण्यात येणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 00:57 IST

मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्प गेल्या ३३ वर्षांपासून रखडला आहे़ आजघडीला हा प्रकल्प अर्धवट असून तो लवकर पूर्ण करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात येणार असून २०२० अखेर प्रकल्पात पाणी अडविण्यात येणार आहे़ अशी माहिती राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा पुनर्स्थापना सनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी दिली़

ठळक मुद्देमाधव भंडारी ३३ वर्षांपासून रखडलेले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न

नांदेड : मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्प गेल्या ३३ वर्षांपासून रखडला आहे़ आजघडीला हा प्रकल्प अर्धवट असून तो लवकर पूर्ण करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात येणार असून २०२० अखेर प्रकल्पात पाणी अडविण्यात येणार आहे़ अशी माहिती राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा पुनर्स्थापना सनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी दिली़जिल्ह्याच्या दृष्टीने लेंडी प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे़ परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून तो या- ना- त्या कारणांनी रखडला आहे़ हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांची काही दिवसांपूर्वीच बैठक झाली. या बैठकीत प्रकल्पाचे काम वेगाने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ लेंडी प्रकल्पाला १९८६ मध्ये मंजुरी मिळाली होती़ यावेळी प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्यांचा विरोध व इतर कारणांमुळे हा प्रकल्प आजपर्यंत पूर्ण होवू शकला नाही़ त्यामुळे ५४ कोटींचा हा प्रकल्प २ हजार कोटीवर पोहोचला आहे़ दरवर्षी प्रकल्पाची रक्कम वाढतच आहे़ प्रकल्पामुळे जवळपास साडेपाच हजार कुटुंब विस्थापित होणार होती़ परंतु, आता त्यामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे़ विस्थापितांसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून काही ठिकाणी गावठाण परिसरांचा विकास करण्यात येणार आहे़ डांबरी रस्त्यांऐवजी सिमेंट रस्ते तयार करण्यासाठी निधीची तरतूद केली आहे़ लेंडी प्रकल्पाबरोबरच जिल्ह्यातील पुनर्वसितांचे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत़ नांदेड विमानतळाच्या विस्तारात संपादित केलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्नही प्रलंबित आहे़ लेंडी प्रकल्पामध्ये येत्या २०२० पर्यंत पाणी अडविण्यात येणार आहे़ त्यासाठी संबंधित विभागांना वेगाने कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही भंडारी म्हणाले़यावेळी आ. तुषार राठोड, आ. राम पाटील रातोळीकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, लेंडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता रा. मा. देशमुख, डॉ. संतुक हंबर्डे, प्रवीण साले उपस्थित होते.विस्थापितांना मिळणार मावेजाची रक्कमलेंडी प्रकल्पांतर्गत ११ गावे बाधित झाली होती. त्यापैकी रावणगाव व गावठाण परिसर पूर्णत: बाधित होणार आहे. उर्वरित गावे काहीअंशी बाधित झाली आहेत.मुक्रमाबाद वगळता अन्य गावांतील विस्थापितांना शासनाने मावेजा दिला आहे. लेंडी प्रकल्पासाठीचे ४९ कोटी रुपये शिल्लक असून यापैकी ५० टक्के रक्कम कामासाठी उर्वरित रक्कम विस्थापितांना देण्यात येणार आहे.त्यामुळे विस्थापितांवर झालेला अन्याय दूर होणार आहे़

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीDamधरण