शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

२०२० पर्यंत लेंडी प्रकल्पात अडविण्यात येणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 00:57 IST

मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्प गेल्या ३३ वर्षांपासून रखडला आहे़ आजघडीला हा प्रकल्प अर्धवट असून तो लवकर पूर्ण करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात येणार असून २०२० अखेर प्रकल्पात पाणी अडविण्यात येणार आहे़ अशी माहिती राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा पुनर्स्थापना सनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी दिली़

ठळक मुद्देमाधव भंडारी ३३ वर्षांपासून रखडलेले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न

नांदेड : मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्प गेल्या ३३ वर्षांपासून रखडला आहे़ आजघडीला हा प्रकल्प अर्धवट असून तो लवकर पूर्ण करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात येणार असून २०२० अखेर प्रकल्पात पाणी अडविण्यात येणार आहे़ अशी माहिती राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा पुनर्स्थापना सनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी दिली़जिल्ह्याच्या दृष्टीने लेंडी प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे़ परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून तो या- ना- त्या कारणांनी रखडला आहे़ हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांची काही दिवसांपूर्वीच बैठक झाली. या बैठकीत प्रकल्पाचे काम वेगाने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ लेंडी प्रकल्पाला १९८६ मध्ये मंजुरी मिळाली होती़ यावेळी प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्यांचा विरोध व इतर कारणांमुळे हा प्रकल्प आजपर्यंत पूर्ण होवू शकला नाही़ त्यामुळे ५४ कोटींचा हा प्रकल्प २ हजार कोटीवर पोहोचला आहे़ दरवर्षी प्रकल्पाची रक्कम वाढतच आहे़ प्रकल्पामुळे जवळपास साडेपाच हजार कुटुंब विस्थापित होणार होती़ परंतु, आता त्यामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे़ विस्थापितांसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून काही ठिकाणी गावठाण परिसरांचा विकास करण्यात येणार आहे़ डांबरी रस्त्यांऐवजी सिमेंट रस्ते तयार करण्यासाठी निधीची तरतूद केली आहे़ लेंडी प्रकल्पाबरोबरच जिल्ह्यातील पुनर्वसितांचे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत़ नांदेड विमानतळाच्या विस्तारात संपादित केलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्नही प्रलंबित आहे़ लेंडी प्रकल्पामध्ये येत्या २०२० पर्यंत पाणी अडविण्यात येणार आहे़ त्यासाठी संबंधित विभागांना वेगाने कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही भंडारी म्हणाले़यावेळी आ. तुषार राठोड, आ. राम पाटील रातोळीकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, लेंडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता रा. मा. देशमुख, डॉ. संतुक हंबर्डे, प्रवीण साले उपस्थित होते.विस्थापितांना मिळणार मावेजाची रक्कमलेंडी प्रकल्पांतर्गत ११ गावे बाधित झाली होती. त्यापैकी रावणगाव व गावठाण परिसर पूर्णत: बाधित होणार आहे. उर्वरित गावे काहीअंशी बाधित झाली आहेत.मुक्रमाबाद वगळता अन्य गावांतील विस्थापितांना शासनाने मावेजा दिला आहे. लेंडी प्रकल्पासाठीचे ४९ कोटी रुपये शिल्लक असून यापैकी ५० टक्के रक्कम कामासाठी उर्वरित रक्कम विस्थापितांना देण्यात येणार आहे.त्यामुळे विस्थापितांवर झालेला अन्याय दूर होणार आहे़

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीDamधरण