शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Video: 'शेतकऱ्यांनो आता तुम्हीच आमदार-खासदार व्हा'; KCR यांची महाराष्ट्राच्या राजकारणात एंट्री...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 16:51 IST

तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR यांनी दिला 'अब की बार किसान सरकार'चा नारा.

नांदेड : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव(KCR) यांनी महाराष्ट्राच्याराजकारणात एंट्री घेतली आहे. आज केसीआर यांची नांदेडमध्ये भव्य सभा झाली. यावेळी त्यांनी 'अब कि बार किसान सरकार'चा नारा दिला. त्यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना अधोरेखित केले. यावेळी त्यांनी तेलंगणात केलेल्या विकास कामांची माहिती दिली.

या वर्षी तेलंगणात विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी भाजपही जोरदार तयारी करत आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून केसीआर भाजप सरकारवर टीका करताना दिसत आहेत. यातच काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षाचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती असे केले. या नामकरणापासून त्यांनी राष्ट्रीय राजकारणात एंट्री घेतली. यानंतर आता त्यांनी महाराष्ट्रात जाहीर सभा घेऊन महाराष्ट्रातील राजकारणातही एंट्री घेतली आहे.

नांदेड येथील सभेत केसीआर यांनी शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवले. यावेळी ते म्हणाले की, गेल्या 75 वर्षात कोणत्याच सरकारने शेतकऱ्यांच्या हिताची कामे केली नाहीत. अनेकजण आमदार-खासदार झाले, पण शेतकऱ्यांसाठी पुढे आले नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांनाच राजकारणात यावे लागेल. शेतकऱ्यांनो उठा आणि तुम्हीच आमदार-खासदार व्हा. जोपर्यंत शेतकऱ्यांचे सरकार येणार नाही, तोपर्यंत तुमचे म्हणने कुणीच ऐकणार नाही. आतापर्यंत कोणत्याच सरकारने असा नारा दिला नाही, अब कि बार किसान सरकार...अशी गर्जना केसीआर यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही देशातील अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठीही पाणी उपलब्ध नाही. शेतकरी आत्महत्येमध्ये महाराष्ट्रात सर्वात पुढे आहे, ही खेदाची बाब आहे. पण येणाऱ्या काळात शेतकऱ्यांचे सरकार आल्यावर या सर्व समस्या नाहीशा होतील. तेलंगणामध्ये लोकांनी शेतकऱ्यांचे सरकार निवडून दिले, तुम्हीचे तशाच प्रकारचे काम करा.

चंद्रशेखर राव पुढे म्हणाले, देशाला अन्नधान्य देणारा अन्नदाता, दिवसभर कष्ट करून कशाला धान्य देणारा शेतकरी आत्महत्या का करतो याचे कारण काय? यावर विचार करण्याची गरज आहे. नेते मोठे भाषण देतात. मात्र, शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं पीक थांबायला तयार नाही. त्यामुळे आता आम्ही नारा देतोय अबकी बार किसान सरकार! देशात शेतकऱ्यांची संख्या 42 टक्के पेक्षा जास्त आहे. शेतकरी आणि कामगार मिळून 50 टक्के पेक्षा जास्त होतात. हे दोघे एक झाले तर सरकार बनवायला अवघड नाही.

आम्ही आज नांदेडमध्ये सभा घेतली, यापुढे महाराष्ट्रातील प्रत्येत शहरात जाऊ. बीआरएस पक्ष प्रत्येत शहरात आपला प्रचार-प्रसार करणार. आमचे नेते तुमच्यासाठी नेहमी उपस्थित असतील. कोणाला काहीही अडचण आल्यावर तुम्ही आमच्यापर्यंत या, आम्ही तुम्हाला मदत करू. लवकरच छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरीवर जाऊन शपथ घेऊन पक्षविस्ताराला सुरुवात करणार आहोत, अशी माहितीही केसीआर यांनी दिली.

टॅग्स :K Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावNandedनांदेडMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण