शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Video: 'शेतकऱ्यांनो आता तुम्हीच आमदार-खासदार व्हा'; KCR यांची महाराष्ट्राच्या राजकारणात एंट्री...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 16:51 IST

तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR यांनी दिला 'अब की बार किसान सरकार'चा नारा.

नांदेड : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव(KCR) यांनी महाराष्ट्राच्याराजकारणात एंट्री घेतली आहे. आज केसीआर यांची नांदेडमध्ये भव्य सभा झाली. यावेळी त्यांनी 'अब कि बार किसान सरकार'चा नारा दिला. त्यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना अधोरेखित केले. यावेळी त्यांनी तेलंगणात केलेल्या विकास कामांची माहिती दिली.

या वर्षी तेलंगणात विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी भाजपही जोरदार तयारी करत आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून केसीआर भाजप सरकारवर टीका करताना दिसत आहेत. यातच काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षाचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती असे केले. या नामकरणापासून त्यांनी राष्ट्रीय राजकारणात एंट्री घेतली. यानंतर आता त्यांनी महाराष्ट्रात जाहीर सभा घेऊन महाराष्ट्रातील राजकारणातही एंट्री घेतली आहे.

नांदेड येथील सभेत केसीआर यांनी शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवले. यावेळी ते म्हणाले की, गेल्या 75 वर्षात कोणत्याच सरकारने शेतकऱ्यांच्या हिताची कामे केली नाहीत. अनेकजण आमदार-खासदार झाले, पण शेतकऱ्यांसाठी पुढे आले नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांनाच राजकारणात यावे लागेल. शेतकऱ्यांनो उठा आणि तुम्हीच आमदार-खासदार व्हा. जोपर्यंत शेतकऱ्यांचे सरकार येणार नाही, तोपर्यंत तुमचे म्हणने कुणीच ऐकणार नाही. आतापर्यंत कोणत्याच सरकारने असा नारा दिला नाही, अब कि बार किसान सरकार...अशी गर्जना केसीआर यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही देशातील अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठीही पाणी उपलब्ध नाही. शेतकरी आत्महत्येमध्ये महाराष्ट्रात सर्वात पुढे आहे, ही खेदाची बाब आहे. पण येणाऱ्या काळात शेतकऱ्यांचे सरकार आल्यावर या सर्व समस्या नाहीशा होतील. तेलंगणामध्ये लोकांनी शेतकऱ्यांचे सरकार निवडून दिले, तुम्हीचे तशाच प्रकारचे काम करा.

चंद्रशेखर राव पुढे म्हणाले, देशाला अन्नधान्य देणारा अन्नदाता, दिवसभर कष्ट करून कशाला धान्य देणारा शेतकरी आत्महत्या का करतो याचे कारण काय? यावर विचार करण्याची गरज आहे. नेते मोठे भाषण देतात. मात्र, शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं पीक थांबायला तयार नाही. त्यामुळे आता आम्ही नारा देतोय अबकी बार किसान सरकार! देशात शेतकऱ्यांची संख्या 42 टक्के पेक्षा जास्त आहे. शेतकरी आणि कामगार मिळून 50 टक्के पेक्षा जास्त होतात. हे दोघे एक झाले तर सरकार बनवायला अवघड नाही.

आम्ही आज नांदेडमध्ये सभा घेतली, यापुढे महाराष्ट्रातील प्रत्येत शहरात जाऊ. बीआरएस पक्ष प्रत्येत शहरात आपला प्रचार-प्रसार करणार. आमचे नेते तुमच्यासाठी नेहमी उपस्थित असतील. कोणाला काहीही अडचण आल्यावर तुम्ही आमच्यापर्यंत या, आम्ही तुम्हाला मदत करू. लवकरच छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरीवर जाऊन शपथ घेऊन पक्षविस्ताराला सुरुवात करणार आहोत, अशी माहितीही केसीआर यांनी दिली.

टॅग्स :K Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावNandedनांदेडMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण