शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

जलयुक्त शिवार अभियानामध्ये कंधार तालुका औरंगाबाद विभागात प्रथम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2017 13:31 IST

जलयुक्त शिवार अभियानात नेत्रदीपक कामगिरी करीत कंधार तालुक्याने नवा इतिहास रचत औरंगाबाद विभागात प्रथम क्रमांक पटकाविला.

ठळक मुद्दे निवडलेल्या २३ गावांत १९९१ कामे पूर्ण झाली असून त्यामुळे विहिरीच्या पाणीपातळीत २ मीटरने वाढ झाली. लोकसहभाग व शासकीय योजनेतून २२०९९७४ घनमीटर गाळ काढण्यात आला़ यासाठी ३ कोटी २० लाखांचा खर्च झाला़ लोकसहभाग व यांत्रिकीकरण विभागांतर्गत नाला खोलीकरण व रुंदीकरणाचे २१ कि़मी़चे काम झाले़

कंधार ( नांदेड ) :  मन्याड खो-याने सन २०१५-१६ मध्ये जलयुक्त शिवार अभियानात नेत्रदीपक कामगिरी करीत तालुक्याने नवा इतिहास रचत औरंगाबाद विभागात प्रथम क्रमांक पटकाविला. १० लाखांचे बक्षीस, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र मिळाले. निवडलेल्या २३ गावांत १९९१ कामे पूर्ण झाली असून त्यामुळे विहिरीच्या पाणीपातळीत २ मीटरने वाढ झाली. एक संरक्षक सिंचन दिल्यास ५२३ हेक्टर आणि दोन संरक्षक सिंचन दिल्यास २६४ हेक्टरला फायदा झाला.

राज्य शासनाने कोरडवाहू शेतीत शाश्वत पाणीसाठा निर्माण करणे, गावातील पाणीटंचाई दूर करणे, पिकांना संरक्षित पाण्याची सोय उपलब्ध करणे आदींसाठी जलयुक्त शिवार अभियान राबविले़ त्यात कंधार तालुक्यातील २३ गावे २०१५-१६ मध्ये निवडण्यात आली होती़ त्यात झालेला लोकसहभाग व शासकीय योजनेतून २२०९९७४ घनमीटर गाळ काढण्यात आला़ यासाठी ३ कोटी २० लाखांचा खर्च झाला़ लोकसहभाग व यांत्रिकीकरण विभागांतर्गत नाला खोलीकरण व रुंदीकरणाचे २१ कि़मी़चे काम झाले़ कृषी विभागामार्फत ढाळीचे बांध ४८४५ हेक्टर झाले़ शेततळी २६, सिमेंट नालाबांध-४, विहीर पुनर्भरण- १८६ आणि ठिबक सिंचन ४४१ हेक्टरचे काम करण्यात आले़ लघूसिंचन व जलसंधारण विभागाकडून साखळी सिमेंट काँक्रिट बंधारे ४४ बांधण्यात आले़ 

लघूसिंचन पाणीपुरवठा विभागाकडून रिचार्ज सॉक्ट-८ व एका पाझर तलावाची  दुरुस्ती करण्यात आली़ सामाजिक वनीकरण विभागाकडून आठ ठिकाणी वृक्षलागवड करण्यात आली़ नाला खोलीकरण हे यांत्रिकी विभाग व लोकसहभाग यांच्या सहाय्याने २१ कि़मी़चे काम वनखात्याकडून खोल सलग समतलचर ६६० हेक्टर, वनतळी ५ पूर्ण करण्यात आली़ ग्रामपंचायत विभागाकडून १ कि़मी़ शोषखड्डा करण्यात आला़ ५९९ शोषखड्डे करण्यात आले़ विविध विभागांमार्फत केलेल्या कामामुळे नियोजित पाणीसाठा २५५६ टीसीएमने वाढविण्याचे काम केले़ प्रत्यक्ष पाणीसाठा २०४८ टीसीएम निर्माण झाला़ विहिरीची पाणीपातळी २ मीटरने वाढली़ २३ गावे टँकरमुक्त झाली़ ही किमया जलयुक्त शिवार अभियानाने साधली़

अभियानाला अनेकांचे सहकार्यजलयुक्त शिवार अभियान तत्कालीन जिल्हाधिकारी धीरजकुमार, सुरेश काकाणी तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ़तुकाराम मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले़ तत्कालीन उपविभागीय अधिकारी अश्विनी पाटील, तहसीलदार अरुणा संगेवार, तालुका कृषी अधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अभियंता कुलकर्णी, एंबडवार, वनविभागाचे पाटील, गीते, यांत्रिकीकरण उपअभियंता सावंत, सामाजिक वनीकरणाचे शेख आदी अधिकारी, लोकसहभाग, विविध सामाजिक संस्था यांनी अभियानाला गती दिल्याने विभागीय पातळीवर कंधारने आपल्या कामाचा ठसा उमटविला़ त्यामुळे प्रथम क्रमांक मिळाला़ तालुका जलयुक्त शिवार समितीचे अध्यक्ष आ़.प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रत्यक्ष गावपातळीवर कामाचे अवलोकन करत कामे गतिमान होण्यासाठी प्रयत्न केले़ 

तालुक्यातील गऊळ गावात झालेल्या कामामुळे गाव पाणीदार झाले़ १९९१-९२ मध्ये गावाला सुरु केलेले टँकर बंद झाले़ एकात्मिक पाणलोट व्यवस्थापनाच्या दुसºया बॅचमधून गावात ढाळीचे बांध ३९८ हेक्टर, सलग समतल चर ५८ हेक्टर मातीनाला बांध ३, खोल सलग समतल चर १० हेक्टर काम करण्यात आले़ ५१८ हेक्टरची बांध बंधिस्ती, एक कि़मी़चे नाला खोलीकरण व रुंदीकरण व २७० टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला़ गाव अभियानात जिल्ह्यात तिसरे आले़ ५० हजारांचे बक्षीस, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्राचे गाव मानकरी ठरले़  कंधार तालुका विभागातून पहिला आला़ जिल्ह्यातून उस्माननगर दुसरे व गऊळ तिसरे आले़ एकूणच तालुक्याला ११ लाख २५ हजारांचे बक्षीस मिळाले़ लोहा तालुका जिल्ह्यात दुसरा आला. ३ लाखांचे बक्षीस मिळाले़ 

सर्वांची साथ मिळाली जलयुक्त शिवार अभियान राबविण्यासाठी वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी यांचे मार्गदर्शान मोलाचे ठरले़ लोकांचा सहभाग, विविध सामाजिक संघटना आदींची साथ मिळाली़ त्यातून झालेल्या कामामुळे जलसाठा निर्माण झाला़ पाणीटंचाई गावातून दूर झाली़ नाम फाऊंडेशन, शिर्डी संस्थान, लोकसहभाग, विविध शासकीय यंत्रणांचा योग्य समन्वय साधून कामे पूर्ण करण्यात आली़ शासनाचे अभियान यशस्वीपणे राबविले -  संजय गायकवाड, तालुका कृषी अधिकारी, कंधाऱ 

टॅग्स :Nandedनांदेड