शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

कंधार : राष्ट्रकुटकालीन ऐतिहासिक जगतुंग समुद्र घाणीच्या गराड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 00:43 IST

राष्ट्रकुटकालीन ऐतिहासिक जगतुंग समुद्रात शहराचे अर्धे सांडपाणी येते़ काटेरी झाडे-झुडुपे आदीने घाणीच्या गराड्यात अडकल्याने जगतुंग समुद्र नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्देजलव्यवस्थापनेचा उत्तम नमुना नामशेष होण्याच्या मार्गावर, गाळाने भर घातल्याने खोली झाली कमी

लोकमत न्यूज नेटवर्ककंधार : राष्ट्रकुटकालीन ऐतिहासिक जगतुंग समुद्रात शहराचे अर्धे सांडपाणी येते़ काटेरी झाडे-झुडुपे आदीने घाणीच्या गराड्यात अडकल्याने जगतुंग समुद्र नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.राष्ट्रकुटकालीन ऐतिहासिक जगतुंग समुद्राची बांधणी राजा कृष्ण (पहिला) यांनी केली़ तर पुनर्बांधणी कृष्ण (तिसरा) यांनी केली़ समुद्राचे भौगोलिक स्थान १८ बाय १० इंच अंतर अक्षांश आणि १० अंश दक्षिण रेखांश असे आहे़ बांध ९०० मीटर लांबीचा तर रुंदी ६ मीटरची आहे़ या समुद्राला कोणतीही उपनदी मिळत नाही़ तरी लहानसे नाले, माळरानावरचे पावसाळ्यातील येणारे पाणी यामुळे जलसाठा मुबलक असायचा़ यामुळे सुमारे ४० हेक्टर जमीन सिंचनाखाली यायची़ कंधार, नवरंगपुरा, मानसपुरी, बहाद्दरपुरा, कोटबाजार आदी गावांची पाणीपातळी वाढण्यास मदत होते़ गावाला पाणीपुरवठा करण्यास उपयुक्त ठरणारा हा जगतुंग समुद्र आहे़उत्तम जलव्यवस्थापनाचा हा समुद्र आजही चांगल्या स्थितीत आहे़ कुंड, घाट, जलकुंडातील मोठ्या श्रृंखला, पाणी नियंत्रण करणारे कौशल्यपूर्ण तंत्र वापरून समुद्राची उपयुक्तता सिद्ध करण्यात आली़ परंतु आजघडीला अत्यल्प पर्जन्यमानाने हा जगतुंग समुद्र भरत नाही़ शहरातील अर्ध्या भागाचे गटारांचे पाणी यात येते़ शौचालय, धुणे आदींसाठी याचा वापर केला जातो आहे़ रासायनिक व भौतिक घटकाने पाणी प्रदूषित होत आहे़ त्यात बेशरमी वनस्पती, काटेरी झुडुपे वाढली आहेत़ त्यात भर म्हणजे पाणी वाहत नाही़ त्यामुळे जगतुंग समुद्राला डबक्याचे स्वरूप आले आहे़पर्यटन विकासासाठी निधीजगतुंग समुद्रकाठावर पर्यटन विकासासाठी निधी मंजूर झाला़ त्यातून अनेक कामे झाली़ अनेक कामे पूर्ण होणे शिल्लक आहे़ पर्यटनाचा उद्देश सफल होण्यासाठी अप्पर मानार प्रकल्पाचा एक कालवा नवघरवाडीपासून गेला आहे़ तेथून उपकालव्याने जगतुंग समुद्रात पाणी सोडल्यास बारमाही समुद्र भरलेला राहील़याकडे शासनाचे लक्ष असणे महत्त्वाचे आहे़ माजी खा़भाई डॉ़ केशवराव धोंडगे, अ‍ॅड़ मुक्तेश्वर धोंडगे, माजी जि़प़ सदस्य प्रा़डॉ़ पुरुषोत्तम धोंडगे यांनी मागणी केली़ परिसरातील सरपंच, ग्रामस्थांनी पाठिंबा दिला़ निवेदने, सत्याग्रह झाले, परंतु अद्याप उपकालवा जोडण्यास मुहूर्त लागला नाही़ पर्यटनाचा उद्देश मग कसा सफल होणार? हा प्रश्न आहे़ व्यापक हित डोळ्यासमोर ठेवून तयार केलेला जगतुंग समुद्र हा पाण्याअभावी डबके, घाणीचे केंद्र बनण्याचा धोका आहे़बारमाही पाण्यासाठी उपकालव्याचे पाणी सोडाजगतुंग समुद्रकाठावर पर्यटन विकासासाठी निधी मंजूर झाला़ त्यातून अनेक कामे झाली़ अजून काही होणे शिल्लक आहे़ पर्यटनाचा उद्देश सफल होण्यासाठी अप्पर मानार प्रकल्पाचा एक कालवा नवघरवाडीपासून गेला आहे़ तेथून उपकालव्याने जगतुंग समुद्रात पाणी सोडल्यास बारमाही समुद्र भरलेला राहील, परंतु याकडे शासनाचे लक्ष असणे महत्त्वाचे आहे़माजी खा़भाई डॉ़ केशवराव धोंडगे, अ‍ॅड़ मुक्तेश्वर धोंडगे, माजी जि़प़ सदस्य प्रा़डॉ़ पुरुषोत्तम धोंडगे यांनी मागणी केली़ परिसरातील सरपंच, ग्रामस्थांनी पाठिंबा दिला़ निवेदने, सत्याग्रह झाले, परंतु अद्याप उपकालवा जोडण्यास मुहूर्त लागला नाही़ पर्यटनाचा उद्देश मग कसा सफल होणाऱ हा प्रश्न आहे़ व्यापक हीत डोळ्यासमोर ठेवून तयार केलेला जगतुंग समुद्र हा पाण्याअभावी डबके, घाणीचे केंद्र बनण्याचा धोका आहे़

टॅग्स :historyइतिहासDamधरण