शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

कंधार : राष्ट्रकुटकालीन ऐतिहासिक जगतुंग समुद्र घाणीच्या गराड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 00:43 IST

राष्ट्रकुटकालीन ऐतिहासिक जगतुंग समुद्रात शहराचे अर्धे सांडपाणी येते़ काटेरी झाडे-झुडुपे आदीने घाणीच्या गराड्यात अडकल्याने जगतुंग समुद्र नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्देजलव्यवस्थापनेचा उत्तम नमुना नामशेष होण्याच्या मार्गावर, गाळाने भर घातल्याने खोली झाली कमी

लोकमत न्यूज नेटवर्ककंधार : राष्ट्रकुटकालीन ऐतिहासिक जगतुंग समुद्रात शहराचे अर्धे सांडपाणी येते़ काटेरी झाडे-झुडुपे आदीने घाणीच्या गराड्यात अडकल्याने जगतुंग समुद्र नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.राष्ट्रकुटकालीन ऐतिहासिक जगतुंग समुद्राची बांधणी राजा कृष्ण (पहिला) यांनी केली़ तर पुनर्बांधणी कृष्ण (तिसरा) यांनी केली़ समुद्राचे भौगोलिक स्थान १८ बाय १० इंच अंतर अक्षांश आणि १० अंश दक्षिण रेखांश असे आहे़ बांध ९०० मीटर लांबीचा तर रुंदी ६ मीटरची आहे़ या समुद्राला कोणतीही उपनदी मिळत नाही़ तरी लहानसे नाले, माळरानावरचे पावसाळ्यातील येणारे पाणी यामुळे जलसाठा मुबलक असायचा़ यामुळे सुमारे ४० हेक्टर जमीन सिंचनाखाली यायची़ कंधार, नवरंगपुरा, मानसपुरी, बहाद्दरपुरा, कोटबाजार आदी गावांची पाणीपातळी वाढण्यास मदत होते़ गावाला पाणीपुरवठा करण्यास उपयुक्त ठरणारा हा जगतुंग समुद्र आहे़उत्तम जलव्यवस्थापनाचा हा समुद्र आजही चांगल्या स्थितीत आहे़ कुंड, घाट, जलकुंडातील मोठ्या श्रृंखला, पाणी नियंत्रण करणारे कौशल्यपूर्ण तंत्र वापरून समुद्राची उपयुक्तता सिद्ध करण्यात आली़ परंतु आजघडीला अत्यल्प पर्जन्यमानाने हा जगतुंग समुद्र भरत नाही़ शहरातील अर्ध्या भागाचे गटारांचे पाणी यात येते़ शौचालय, धुणे आदींसाठी याचा वापर केला जातो आहे़ रासायनिक व भौतिक घटकाने पाणी प्रदूषित होत आहे़ त्यात बेशरमी वनस्पती, काटेरी झुडुपे वाढली आहेत़ त्यात भर म्हणजे पाणी वाहत नाही़ त्यामुळे जगतुंग समुद्राला डबक्याचे स्वरूप आले आहे़पर्यटन विकासासाठी निधीजगतुंग समुद्रकाठावर पर्यटन विकासासाठी निधी मंजूर झाला़ त्यातून अनेक कामे झाली़ अनेक कामे पूर्ण होणे शिल्लक आहे़ पर्यटनाचा उद्देश सफल होण्यासाठी अप्पर मानार प्रकल्पाचा एक कालवा नवघरवाडीपासून गेला आहे़ तेथून उपकालव्याने जगतुंग समुद्रात पाणी सोडल्यास बारमाही समुद्र भरलेला राहील़याकडे शासनाचे लक्ष असणे महत्त्वाचे आहे़ माजी खा़भाई डॉ़ केशवराव धोंडगे, अ‍ॅड़ मुक्तेश्वर धोंडगे, माजी जि़प़ सदस्य प्रा़डॉ़ पुरुषोत्तम धोंडगे यांनी मागणी केली़ परिसरातील सरपंच, ग्रामस्थांनी पाठिंबा दिला़ निवेदने, सत्याग्रह झाले, परंतु अद्याप उपकालवा जोडण्यास मुहूर्त लागला नाही़ पर्यटनाचा उद्देश मग कसा सफल होणार? हा प्रश्न आहे़ व्यापक हित डोळ्यासमोर ठेवून तयार केलेला जगतुंग समुद्र हा पाण्याअभावी डबके, घाणीचे केंद्र बनण्याचा धोका आहे़बारमाही पाण्यासाठी उपकालव्याचे पाणी सोडाजगतुंग समुद्रकाठावर पर्यटन विकासासाठी निधी मंजूर झाला़ त्यातून अनेक कामे झाली़ अजून काही होणे शिल्लक आहे़ पर्यटनाचा उद्देश सफल होण्यासाठी अप्पर मानार प्रकल्पाचा एक कालवा नवघरवाडीपासून गेला आहे़ तेथून उपकालव्याने जगतुंग समुद्रात पाणी सोडल्यास बारमाही समुद्र भरलेला राहील, परंतु याकडे शासनाचे लक्ष असणे महत्त्वाचे आहे़माजी खा़भाई डॉ़ केशवराव धोंडगे, अ‍ॅड़ मुक्तेश्वर धोंडगे, माजी जि़प़ सदस्य प्रा़डॉ़ पुरुषोत्तम धोंडगे यांनी मागणी केली़ परिसरातील सरपंच, ग्रामस्थांनी पाठिंबा दिला़ निवेदने, सत्याग्रह झाले, परंतु अद्याप उपकालवा जोडण्यास मुहूर्त लागला नाही़ पर्यटनाचा उद्देश मग कसा सफल होणाऱ हा प्रश्न आहे़ व्यापक हीत डोळ्यासमोर ठेवून तयार केलेला जगतुंग समुद्र हा पाण्याअभावी डबके, घाणीचे केंद्र बनण्याचा धोका आहे़

टॅग्स :historyइतिहासDamधरण