शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

अखेर नांदेडकरांसाठी नाथसागरच आला धावून; विष्णूपुरीत दिग्रस बंधाऱ्यातून पाणी पोहोचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 18:44 IST

नांदेडात जायकवाडीचे पाणी आले

ठळक मुद्दे‘जास्तीत जास्त पाणी घेण्याचा प्रयत्न’

नांदेड : अभूतपूर्व पाणीटंचाईने मागील ४ महिन्यांपासून तहानलेल्या नांदेडकरांना जायकवाडीतून आलेल्या पाण्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे़ पालम तालुक्यातील दिग्रस बंधाऱ्यातून सोमवारी सकाळी ६ वाजता सोडलेले पाणी १२ तासांत विष्णूपुरीत  पोहोचले आहे़ या पाण्यामुळे नांदेडकरांची तहान भागली जाणार आहे़

जायकवाडी धरण पहिल्यांदाच ९५ टक्के भरल्याने अतिरिक्त पाण्याचा विसर्ग केला जात आहे़ संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी गोदावरी नदीत असलेले १२ बंधारे जवळपास २५ टक्के भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ या निर्णयामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे़ याच निर्णयामुळे जायकवाडीचे पाणी २६ आॅगस्ट रोजी विष्णूपुरीत पोहोचले आहे़

सोमवारी सकाळी पालम तालुक्यातील दिग्रस बंधाऱ्यातून ३ हजार ५०० क्युसेक्स वेगाने गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात आले़ हे पाणी सायंकाळी ६ वाजता विष्णूपुरी प्रकल्पात पोहोचले आहे़ हे पाणी सुरूच ठेवले जाणार आहे़ विष्णूपुरी प्रकल्पात आजघडीला १७़६६ दलघमी पाणी उपलब्ध आहे़ जवळपास २१़८६ टक्के पाणी होते़ दिग्रस बंधाऱ्यातून उपलब्ध होणाऱ्या पाण्यामुळे विष्णूपुरीचा जलसाठा ५० टक्के होणार आहे़ त्यामुळे उपलब्ध झालेल्या पाण्यातून नांदेड शहराच्या पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करणे हे महापालिका आणि जिल्हा प्रशासनाला करावे लागणार आहे़ यामध्ये इतर विभागांची साथही महत्त्वाची ठरणार आहे़ त्यात महावितरणची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे़ महावितरणला २०१८ मध्ये आॅक्टोबरमध्ये अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी विष्णूपुरी प्रकल्प परिसरातील विद्युतपुरवठा खंडित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते़ मात्र त्याकडे महावितरणने कानाडोळाच केलाच़ याचा फटका शहरवासियांना बसला़ प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात झालेल्या अवैध पाणीउपशामुळे मेअखेर तर विष्णूपुरी मृतसाठ्यात पोहोचला़ सिद्धेश्वर धरणातील पाणी आणून नांदेडकरांची तहान कशीबशी भागविण्यात आली़ आजही शहराला आठ ते दहा दिवसांआड पाणी मिळत आहे.

‘जास्तीत जास्त पाणी घेण्याचा प्रयत्न’नांदेड शहराला मागील सहा महिन्यांपासून टंचाईला तोंड द्यावे लागत आहे़ पावसाळ्याचेही जवळपास ३ महिने उलटले आहेत़ जिल्ह्यात सरासरीच्या ५० टक्केही पाऊस झाला नाही़ त्यामुळे आगामी काळातील नांदेडच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेता जायकवाडीतून जास्तीत पाणी घेण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी सांगितले़ जायकवाडीतील पाणी आल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :NandedनांदेडJayakwadi Damजायकवाडी धरणvishnupuri damविष्णुपुरी धरणWaterपाणी