शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रह्मोस एरोस्पेसच्या CEO ची नियुक्ती रद्द! 'कॅट'चा ऐतिहासिक निकाल; डॉ. जयतीर्थ जोशींना पदावरून हटवण्याचे आदेश
2
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
3
मृत्यूशय्येवर होत्या, तरीही कालच दाखल केला उमेदवारी अर्ज! खालिदा झियांच्या मृत्यूने बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मनसुबे धुळीस मिळाले
4
ATM कमी झाले, बँकेच्या शाखा वाढल्या; बचत खात्यांमध्ये मोठी वाढ, जमा रक्कम ३.३ लाख कोटींच्या पार
5
Video : मुंबईतील बस अपघाताचा व्हिडीओ आला समोर; भांडुपमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना बसने चिरडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
7
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
8
"मला तो सीन करायचा नव्हता पण, रणवीरने...", 'धुरंधर'मधल्या 'त्या' कामुक सीनबाबत अभिनेत्याचा मोठा खुलासा
9
९०% लोकांना माहीतच नाही iPhoneची 'ही' जादू! स्क्रीनला हात न लावता सेकंदात करता येते काम
10
Stock Market Today: मंथली एक्सपायरीवर निराशाजनक सुरुवात; Sensex १२० अंकांनी घसरला, Nifty मध्ये ४० अंकांची घसरण
11
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
12
पोर्टफोलिओमध्ये करा 'हे' ५ बदल! संरक्षण आणि आयटी शेअर्समध्ये मोठी संधी; पाहा नवीन टार्गेट प्राईस
13
'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
14
Silver Price: २०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
15
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
16
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
17
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
18
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
19
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
20
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
Daily Top 2Weekly Top 5

अखेर नांदेडकरांसाठी नाथसागरच आला धावून; विष्णूपुरीत दिग्रस बंधाऱ्यातून पाणी पोहोचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 18:44 IST

नांदेडात जायकवाडीचे पाणी आले

ठळक मुद्दे‘जास्तीत जास्त पाणी घेण्याचा प्रयत्न’

नांदेड : अभूतपूर्व पाणीटंचाईने मागील ४ महिन्यांपासून तहानलेल्या नांदेडकरांना जायकवाडीतून आलेल्या पाण्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे़ पालम तालुक्यातील दिग्रस बंधाऱ्यातून सोमवारी सकाळी ६ वाजता सोडलेले पाणी १२ तासांत विष्णूपुरीत  पोहोचले आहे़ या पाण्यामुळे नांदेडकरांची तहान भागली जाणार आहे़

जायकवाडी धरण पहिल्यांदाच ९५ टक्के भरल्याने अतिरिक्त पाण्याचा विसर्ग केला जात आहे़ संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी गोदावरी नदीत असलेले १२ बंधारे जवळपास २५ टक्के भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ या निर्णयामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे़ याच निर्णयामुळे जायकवाडीचे पाणी २६ आॅगस्ट रोजी विष्णूपुरीत पोहोचले आहे़

सोमवारी सकाळी पालम तालुक्यातील दिग्रस बंधाऱ्यातून ३ हजार ५०० क्युसेक्स वेगाने गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात आले़ हे पाणी सायंकाळी ६ वाजता विष्णूपुरी प्रकल्पात पोहोचले आहे़ हे पाणी सुरूच ठेवले जाणार आहे़ विष्णूपुरी प्रकल्पात आजघडीला १७़६६ दलघमी पाणी उपलब्ध आहे़ जवळपास २१़८६ टक्के पाणी होते़ दिग्रस बंधाऱ्यातून उपलब्ध होणाऱ्या पाण्यामुळे विष्णूपुरीचा जलसाठा ५० टक्के होणार आहे़ त्यामुळे उपलब्ध झालेल्या पाण्यातून नांदेड शहराच्या पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करणे हे महापालिका आणि जिल्हा प्रशासनाला करावे लागणार आहे़ यामध्ये इतर विभागांची साथही महत्त्वाची ठरणार आहे़ त्यात महावितरणची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे़ महावितरणला २०१८ मध्ये आॅक्टोबरमध्ये अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी विष्णूपुरी प्रकल्प परिसरातील विद्युतपुरवठा खंडित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते़ मात्र त्याकडे महावितरणने कानाडोळाच केलाच़ याचा फटका शहरवासियांना बसला़ प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात झालेल्या अवैध पाणीउपशामुळे मेअखेर तर विष्णूपुरी मृतसाठ्यात पोहोचला़ सिद्धेश्वर धरणातील पाणी आणून नांदेडकरांची तहान कशीबशी भागविण्यात आली़ आजही शहराला आठ ते दहा दिवसांआड पाणी मिळत आहे.

‘जास्तीत जास्त पाणी घेण्याचा प्रयत्न’नांदेड शहराला मागील सहा महिन्यांपासून टंचाईला तोंड द्यावे लागत आहे़ पावसाळ्याचेही जवळपास ३ महिने उलटले आहेत़ जिल्ह्यात सरासरीच्या ५० टक्केही पाऊस झाला नाही़ त्यामुळे आगामी काळातील नांदेडच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेता जायकवाडीतून जास्तीत पाणी घेण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी सांगितले़ जायकवाडीतील पाणी आल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :NandedनांदेडJayakwadi Damजायकवाडी धरणvishnupuri damविष्णुपुरी धरणWaterपाणी