शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

अखेर नांदेडकरांसाठी नाथसागरच आला धावून; विष्णूपुरीत दिग्रस बंधाऱ्यातून पाणी पोहोचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 18:44 IST

नांदेडात जायकवाडीचे पाणी आले

ठळक मुद्दे‘जास्तीत जास्त पाणी घेण्याचा प्रयत्न’

नांदेड : अभूतपूर्व पाणीटंचाईने मागील ४ महिन्यांपासून तहानलेल्या नांदेडकरांना जायकवाडीतून आलेल्या पाण्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे़ पालम तालुक्यातील दिग्रस बंधाऱ्यातून सोमवारी सकाळी ६ वाजता सोडलेले पाणी १२ तासांत विष्णूपुरीत  पोहोचले आहे़ या पाण्यामुळे नांदेडकरांची तहान भागली जाणार आहे़

जायकवाडी धरण पहिल्यांदाच ९५ टक्के भरल्याने अतिरिक्त पाण्याचा विसर्ग केला जात आहे़ संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी गोदावरी नदीत असलेले १२ बंधारे जवळपास २५ टक्के भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ या निर्णयामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे़ याच निर्णयामुळे जायकवाडीचे पाणी २६ आॅगस्ट रोजी विष्णूपुरीत पोहोचले आहे़

सोमवारी सकाळी पालम तालुक्यातील दिग्रस बंधाऱ्यातून ३ हजार ५०० क्युसेक्स वेगाने गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात आले़ हे पाणी सायंकाळी ६ वाजता विष्णूपुरी प्रकल्पात पोहोचले आहे़ हे पाणी सुरूच ठेवले जाणार आहे़ विष्णूपुरी प्रकल्पात आजघडीला १७़६६ दलघमी पाणी उपलब्ध आहे़ जवळपास २१़८६ टक्के पाणी होते़ दिग्रस बंधाऱ्यातून उपलब्ध होणाऱ्या पाण्यामुळे विष्णूपुरीचा जलसाठा ५० टक्के होणार आहे़ त्यामुळे उपलब्ध झालेल्या पाण्यातून नांदेड शहराच्या पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करणे हे महापालिका आणि जिल्हा प्रशासनाला करावे लागणार आहे़ यामध्ये इतर विभागांची साथही महत्त्वाची ठरणार आहे़ त्यात महावितरणची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे़ महावितरणला २०१८ मध्ये आॅक्टोबरमध्ये अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी विष्णूपुरी प्रकल्प परिसरातील विद्युतपुरवठा खंडित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते़ मात्र त्याकडे महावितरणने कानाडोळाच केलाच़ याचा फटका शहरवासियांना बसला़ प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात झालेल्या अवैध पाणीउपशामुळे मेअखेर तर विष्णूपुरी मृतसाठ्यात पोहोचला़ सिद्धेश्वर धरणातील पाणी आणून नांदेडकरांची तहान कशीबशी भागविण्यात आली़ आजही शहराला आठ ते दहा दिवसांआड पाणी मिळत आहे.

‘जास्तीत जास्त पाणी घेण्याचा प्रयत्न’नांदेड शहराला मागील सहा महिन्यांपासून टंचाईला तोंड द्यावे लागत आहे़ पावसाळ्याचेही जवळपास ३ महिने उलटले आहेत़ जिल्ह्यात सरासरीच्या ५० टक्केही पाऊस झाला नाही़ त्यामुळे आगामी काळातील नांदेडच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेता जायकवाडीतून जास्तीत पाणी घेण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी सांगितले़ जायकवाडीतील पाणी आल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :NandedनांदेडJayakwadi Damजायकवाडी धरणvishnupuri damविष्णुपुरी धरणWaterपाणी