शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

गरजवंतांच्या शिक्षणासाठी जैन संघटनेचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:56 IST

अखिल भारतीय जैन संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील पाल्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेत त्यांना पुणे येथील वाघोलीच्या प्रकल्पात पाठविण्यात आले होते़ दोन वर्षांपूर्वी पाठविलेली ४५ मुले या ठिकाणी शिक्षण घेत आहेत़ त्यात यंदाही जैन संघटनेच्या वतीने मुले पाठविण्यात येणार असून या मुलांचे ११ जूनपूर्वी या ठिकाणी प्रवेश निश्चित करण्यात येणार आहेत, अशी माहिती माजी आ़ओमप्रकाश पोकर्णा यांनी दिली़

ठळक मुद्देआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना घेतले दत्तक

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : अखिल भारतीय जैन संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील पाल्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेत त्यांना पुणे येथील वाघोलीच्या प्रकल्पात पाठविण्यात आले होते़ दोन वर्षांपूर्वी पाठविलेली ४५ मुले या ठिकाणी शिक्षण घेत आहेत़ त्यात यंदाही जैन संघटनेच्या वतीने मुले पाठविण्यात येणार असून या मुलांचे ११ जूनपूर्वी या ठिकाणी प्रवेश निश्चित करण्यात येणार आहेत, अशी माहिती माजी आ़ओमप्रकाश पोकर्णा यांनी दिली़पोकर्णा म्हणाले, अखिल भारतीय जैन संघटनेच्या वतीने वाघोली येथील प्रकल्पात राज्यभरातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांसाठी मोफत शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे़ या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या सोयीसुविधा दिल्या जातात़ त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून विद्यार्थी पाठविण्यात येतात़ २०१५-१६ मधील जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येची पात्र यादी जिल्हाधिकारी कार्यालयातून घेण्यात आली होती़ त्यानंतर ६० मुलांना शिक्षणासाठी पाठविले होते़ त्यातील १२ वीपर्यंतचे काही मुलांचे शिक्षण पूर्ण झाले असून या ठिकाणी ४५ विद्यार्थी आजघडीला शिक्षण घेत आहेत़ आता २०१६-१७ या वर्षातील शासनाच्या मदतीस पात्र ठरलेल्या १२४ कुटुंबांतील पाल्यांची निवड करण्यात येणार आहे़ ११ जूनपर्यंत वाघोली प्रकल्पात प्रवेश निश्चित करण्यासाठी जैन संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला लागले आहेत़ वाघोली येथे बारावीपर्यंत शिक्षण या मुलांना दिले जाते़ त्यांच्या राहण्याची, प्रवासाची सोयही संघटनेच्या वतीने केली जाते़ आजपर्यंत पाठविलेल्यांपैकी अनेक मुले आता स्वत:च्या पायावर उभी राहिली आहेत़ पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण या ठिकाणी दिले जाते़---सातारा येथील रयत शिक्षण संस्थेसोबत जैन संघटनेची चर्चा सुरु आहे़ या ठिकाणी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील पाल्यांना पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत दिले जाणार आहे़ त्यामुळे या शिक्षण संस्थेतही विद्यार्थी पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती पोकर्णा यांनी दिली़

टॅग्स :Nandedनांदेडfarmer suicideशेतकरी आत्महत्या