शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

गरजवंतांच्या शिक्षणासाठी जैन संघटनेचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:56 IST

अखिल भारतीय जैन संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील पाल्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेत त्यांना पुणे येथील वाघोलीच्या प्रकल्पात पाठविण्यात आले होते़ दोन वर्षांपूर्वी पाठविलेली ४५ मुले या ठिकाणी शिक्षण घेत आहेत़ त्यात यंदाही जैन संघटनेच्या वतीने मुले पाठविण्यात येणार असून या मुलांचे ११ जूनपूर्वी या ठिकाणी प्रवेश निश्चित करण्यात येणार आहेत, अशी माहिती माजी आ़ओमप्रकाश पोकर्णा यांनी दिली़

ठळक मुद्देआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना घेतले दत्तक

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : अखिल भारतीय जैन संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील पाल्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेत त्यांना पुणे येथील वाघोलीच्या प्रकल्पात पाठविण्यात आले होते़ दोन वर्षांपूर्वी पाठविलेली ४५ मुले या ठिकाणी शिक्षण घेत आहेत़ त्यात यंदाही जैन संघटनेच्या वतीने मुले पाठविण्यात येणार असून या मुलांचे ११ जूनपूर्वी या ठिकाणी प्रवेश निश्चित करण्यात येणार आहेत, अशी माहिती माजी आ़ओमप्रकाश पोकर्णा यांनी दिली़पोकर्णा म्हणाले, अखिल भारतीय जैन संघटनेच्या वतीने वाघोली येथील प्रकल्पात राज्यभरातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांसाठी मोफत शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे़ या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या सोयीसुविधा दिल्या जातात़ त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून विद्यार्थी पाठविण्यात येतात़ २०१५-१६ मधील जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येची पात्र यादी जिल्हाधिकारी कार्यालयातून घेण्यात आली होती़ त्यानंतर ६० मुलांना शिक्षणासाठी पाठविले होते़ त्यातील १२ वीपर्यंतचे काही मुलांचे शिक्षण पूर्ण झाले असून या ठिकाणी ४५ विद्यार्थी आजघडीला शिक्षण घेत आहेत़ आता २०१६-१७ या वर्षातील शासनाच्या मदतीस पात्र ठरलेल्या १२४ कुटुंबांतील पाल्यांची निवड करण्यात येणार आहे़ ११ जूनपर्यंत वाघोली प्रकल्पात प्रवेश निश्चित करण्यासाठी जैन संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला लागले आहेत़ वाघोली येथे बारावीपर्यंत शिक्षण या मुलांना दिले जाते़ त्यांच्या राहण्याची, प्रवासाची सोयही संघटनेच्या वतीने केली जाते़ आजपर्यंत पाठविलेल्यांपैकी अनेक मुले आता स्वत:च्या पायावर उभी राहिली आहेत़ पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण या ठिकाणी दिले जाते़---सातारा येथील रयत शिक्षण संस्थेसोबत जैन संघटनेची चर्चा सुरु आहे़ या ठिकाणी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील पाल्यांना पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत दिले जाणार आहे़ त्यामुळे या शिक्षण संस्थेतही विद्यार्थी पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती पोकर्णा यांनी दिली़

टॅग्स :Nandedनांदेडfarmer suicideशेतकरी आत्महत्या