शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 12:38 IST

पुलवामा प्रमाणेच पहेलगामच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी गंभीर नाहीत असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

नांदेड - पाकिस्तानचे पाणी बंद केले हा सरकारचा दावा पूर्णपणे खोटा आहे, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली. 

भारत सरकारने 1960 इंडस पाणी करार थांबवला असे पत्र पाकिस्तानला लिहिले आहे, असे सांगताना आंबेडकर यांनी ते पत्र वाचून दाखवले. या पत्रात आम्ही पाणी थांबवले असा कुठेही स्पष्ट उल्लेख नाही. अबेयन्स असा शब्द पत्रात असून त्याचा अर्थ एकप्रकारे न्यायालयात स्टेटस्को असा होतो, त्यामुळे पाणी थांबवले, पाकिस्तानला पाण्याच्या एका एका थेंबासाठी तरसावे लागेल असे म्हणणे पूर्णपणे खोटे आहे असे आंबेडकर म्हणाले. 

पुलवामा प्रमाणेच पहेलगामच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी गंभीर नाहीत असेही आंबेडकर म्हणाले. पहेलगाम घटनेनंतर कारवाई करण्यासाठी सैन्य तयार आहे पण राजकीय इच्छाशक्ती नाही, त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी येत्या दोन तारखेला हुतात्मा स्मारकासमोर बसणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. तिजोरी खाली असेल तर डोनेट करण्यासाठीही आम्ही तयार आहोत, आमचा कारवाईसाठी पाठींबा आहे हे सांगण्यासाठी हुतात्मा स्मारकासमोर बसणार असल्याचे आंबेडकर म्हणाले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाprime ministerपंतप्रधान