शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा हायव्हॉल्टेज ड्रामा; "मला टॉर्चर केले गेले, अन्..."
2
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या नेत्यांची यादीच वाचली; जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला सुनावलं
3
"कंगनाकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य आणि...", योगी आदित्यनाथांनी उधळली स्तुतीसुमने
4
"महात्मा गांधींबाबत माहित नाही, मग त्यांना राज्यघटनेबाबतही…’’, मल्लिकार्जुन खर्गेंचा नरेंद्र मोदींवर संताप
5
"हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही"; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली
6
सरकार स्थापन होताच 25 दिवस खास तरुणांसाठी! अखेरच्या रॅलीत काय-काय बोलले पंतप्रधान मोदी?
7
महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का
8
"नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली...", मनमोहन सिंग यांची पत्रातून टीका
9
दोन मुलांच्या मृत्यूची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल; ब्रिजभूषण यांची उडवाउडवीची उत्तरे
10
जम्मूमध्ये पोलीस ठाण्यावर हल्ला; लष्कराच्या १६ जवानांवर गुन्हा दाखल
11
आरोग्य सांभाळा! 'या' लोकांसाठी AC ठरू शकतो घातक; फुफ्फुसांचं होईल मोठं नुकसान
12
आमचे येथे श्रीकृपेकरून... अनंत अंबानींचं शुभमंगल 'आमची मुंबई'तच; 'असा' आहे तीन दिवसांचा सोहळा 
13
"देशात इंडिया आघाडीची त्सुनामी, वाराणसीत नरेंद्र मोदी पराभूत होणार’’ मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याचा दावा
14
"जितेंद्र आव्हाड मनोविकृत, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा", मंत्री गुलाबराव पाटलांची मागणी
15
OYO ला आर्थिक वर्ष २४ मध्ये १०० कोटींचा निव्वळ नफा; पहिल्यांदाच नफ्यात आली कंपनी
16
"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण...
17
“PM मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान म्हणजे देशाचे दुर्दैव”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका
18
अरे देवा! नवऱ्याने रील बनवण्यास केली मनाई; नाराज झालेली बायको मुलीसह झाली फरार
19
Gautam Gambhir च्या विरोधात 'दादा'? गांगुलीचा BCCI ला सल्ला अन् चाहते बुचकळ्यात!
20
TATA चा 'हा' शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "१३५ पर्यंत येणार..."

मंदिर, मश्जिद पेक्षा शिक्षण निवडणुकीचा मुद्दा व्हावा : मनिष सिसोदीया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 6:08 PM

देशात शिक्षणाचे बजेट वाढविण्याची गरज दिल्लीचे शिक्षणमंत्री मनिष सिसोदीया यांनी व्यक्त केली़

नांदेड : सरकारी शाळाच शिक्षणाचा कणा असायला हवा़ यातूनच सर्वांगिण विकास शक्य असल्याचे सांगत देशात शिक्षणाचे बजेट वाढविण्याची गरज दिल्लीचे शिक्षणमंत्री मनिष सिसोदीया यांनी व्यक्त केली़ सरकारनेच शिक्षणाची जबाबदारी उचलावी़ निवडणुकांमध्येही शिक्षण हा प्रमुख मुद्दा झाला पाहिजे़  मंदिर, मश्जिद उभारल्याने काही फरक पडणार नाही़ मात्र शाळांमुळे देश उभा राहिल असेही ते म्हणाले़ 

एका कार्यक्रमानिमित्त सिसोदीया आज नांदेडात आले होते़ यावेळी ते म्हणाले, दिल्ली सरकारने गेल्या साडे तीन वर्षाच्या काळात शिक्षणाला अधिक महत्व दिले़ सरकारी शाळांचे रुपडे पालटले़ त्यामुळे खाजगी शाळातून प्रवेश काढून पालक आपल्या पाल्याला सरकारी शाळेत टाकत आहेत़ प्रवेशक्षमता संपल्यामुळे सरकारला नव्याने ८६० खोल्यांचे बांधकाम करावे लागले़ मंदिर, मस्जिद उभारल्याने काही फरक पडणार नाही़ त्यामुळे देशाचे नुकसान होणार नाही़ परंतु शाळा जर नसेल तर मात्र देशाचे मोठे नुकसान होणार आहे़ दिल्लीत राबविण्यात आलेले शैक्षणिक मॉडेल अनेक राज्ये आत्मसात करीत आहेत़ याचा आनंद आहे़ सर्वात वाईट असलेल्या शाळांचा दर्जा कसा वाढविता येईल यावर दिल्ली सरकारने प्रयत्न केले़ त्याला शिक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला़ देशाचे शिक्षणावरील बजेट वाढविण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले़ 

कृष्णा यांचा दिल्लीत कार्यक्रम कर्नाटक येथील ख्यातनाम गायक टी़एसक़ृष्णा यांचा दिल्ली येथील कार्यक्रम रद्द करण्यात आला होता़ आता आप ने हा कार्यक्रम आयोजित केला आहे़ त्यावर सिसोदिया म्हणाले, कृष्णा हे मोठे कलाकार आहेत़ एका पक्षाच्या विरोधात बोलल्याने त्यांचा कार्यक्रम रद्द करणे निंदाजनक आहे़ कलाकाराशी तुमचे मतभेद असू शकतात़ पण कलेशी मतभेद नको़ 

टॅग्स :Educationशिक्षणElectionनिवडणूकAAPआपGovernmentसरकार