शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

इसापूरचे पाणी आसनात पोहोचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:18 IST

शहरवासियांची तहान भागविण्यासाठी इसापूर प्रकल्पातून अडीच दलघमी पाणी घेण्यात आले असून प्रत्यक्षात १ दलघमी पाणी आसनेच्या पात्रात उपलब्ध होणार आहे. यातून शहरवासियांची जवळपास २५ ते ३० दिवसांची तहान भागणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी दिली.

ठळक मुद्देमहापालिका : पर्यायी पाणीपुरवठा योजनाही सुरू होणार, २५ दिवस नांदेडची तहान भागणार

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहरवासियांची तहान भागविण्यासाठी इसापूर प्रकल्पातून अडीच दलघमी पाणी घेण्यात आले असून प्रत्यक्षात १ दलघमी पाणी आसनेच्या पात्रात उपलब्ध होणार आहे. यातून शहरवासियांची जवळपास २५ ते ३० दिवसांची तहान भागणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी दिली.विष्णूपुरीतील उपलब्ध पाण्यातून शहरवासियांची तहान भागवणे अवघड होत असल्याने नांदेड महानगरपालिकेने आसना नदीवर पर्यायी पाणीपुरवठा योजना सुरू केली. पिण्याच्या पाण्यासाठी नांदेड महापालिकेने इसापूर प्रकल्पात १० दलघमी पाणी राखीव ठेवले होते. यावर्षी इसापूर प्रकल्पाने तळ गाठल्याने इसापूरमधून नांदेडसाठी पाणी मिळेल की नाही? याबाबत साशंकता होती. मात्र इसापूर प्रकल्पातून नांदेडसाठीही अडीच दलघमी पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी शनिवारी सायंकाळी ६ वाजता पोहोचले. रात्री उशिरापर्यंत जवळपास १ दलघमी पाणी आसनेमध्ये उपलब्ध होईल. दरम्यान, विष्णूपुरी प्रकल्पातही १० दलघमी पाणी सिद्धेश्वर धरणातून घेतले जाणार आहे. १२ एप्रिलपासून हे पाणी सिद्धेश्वरमधून सोडले जाईल. आजघडीला विष्णूपुरी प्रकल्पात १२.२८ दलघमी जलसाठा उपलब्ध आहे. १२ मार्च रोजी दिग्रस बंधाऱ्यातून २५ दलघमी पाणी विष्णूपुरी प्रकल्पात घेण्यात आले होते. प्रकल्पातून सिंचनासाठी नियोजित पाणीपाळ्यामुळे प्रकल्पातील जलसाठा आजघडीला १५ टक्क्यांवर आला आहे. आगामी काळात पाण्याची टंचाई लक्षात घेता सिद्धेश्वरमधून १० दलघमी पाणी घेण्यात येत आहे. शहरवासियांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन आयुक्त गणेश देशमुख, कार्यकारी अभियंता अंधारे यांनी केले आहे.मे महिन्यात दुसरे रोटेशन मिळणारहे पाणी सांगवी पंपावरुन काबरानगर येथील जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचेल. तेथून शहराला पाणीपुरवठा केला जाणार आहे. इसापूरमधून उपलब्ध झालेल्या जवळपास १ दलघमी पाण्यातून शहरवासियांची २५ ते ३० दिवसांची तहान भागणार आहे. इसापूर प्रकल्पातून दुसरे रोटेशन हे मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसºया आठवड्यात घेतले जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :water transportजलवाहतूकriverनदी