शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
2
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
3
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
4
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
5
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
6
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
7
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
8
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
9
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
10
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
11
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
12
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
13
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
14
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
15
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
16
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
17
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
18
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
19
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
20
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद

तलाठ्यांची बेपर्वा वृत्ती शेतकऱ्यांना भोवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 00:41 IST

शेतक-यांचे पंधरा आकडी खाते क्रमांक टाकून असे स्पष्ट करून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या देगलूर शाखेने तहसीलदारांना याद्या परत पाठविल्या. परंतु आठ दिवसानंतर देखील कोणताही बदल न करताच याद्या बँकेला परत पाठविण्यात आल्याने सगळा घोळ झाला आहे.

ठळक मुद्देदुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३० कोटी रुपये प्राप्त

श्रीकांत कुलकर्णी।देगलूर : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी शासनाने देगलूर तालुक्यासाठी ३० कोटी रुपये तात्काळ दिले. मात्र बहुतांश तलाठ्यांनी शेतक-यांचे खाते क्रमांक अर्धवट टाकून बँकेला याद्या दिल्यामुळे सगळा घोळ झाला आहे.शेतक-यांचे पंधरा आकडी खाते क्रमांक टाकून असे स्पष्ट करून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या देगलूर शाखेने तहसीलदारांना याद्या परत पाठविल्या. परंतु आठ दिवसानंतर देखील कोणताही बदल न करताच याद्या बँकेला परत पाठविण्यात आल्याने सगळा घोळ झाला आहे.देगलूर तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर झाला असून दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतक-यांना प्रति हेक्टरी ६८०० रुपये दोन हेक्टरपर्यंत दोन टप्प्यात शेतक-यांना देण्यात येणार आहे. शेतक-यांना अनुदान देण्यासाठी शासनाने पहिल्या टप्प्यात ८ कोटी ७१ लाख ६० हजार रुपये, दुस-या टप्प्यात ९ कोटी ९ लाख १ हजार रुपये तर तिस-या टप्प्यात १२ कोटी २३ लाख ८९ हजार रुपये असे एकूण ३० कोटी ४ लाख ५१ हजार रुपये शासनाकडून प्राप्त झाले आहेत. मध्यवर्ती बँकेच्या देगलूर शाखेत ४० गावातील शेतकºयांचे खाते असून या बँकेमार्फत २९ हजार ६५५ शेतक-यांना दुष्काळाचे अनुदान वाटप केले जाणार आहे. पहिल्या हप्त्यापोटी या बँकेला १० कोटी ८३ लाख ४९ हजार रुपये प्राप्त झाले आहेत.२०१६ चे विमा वाटप रखडलेज्या शेतक-यांनी २०१६ मध्ये आपल्या पीक विमा काढला नव्हता अशा शेतक-यांना पन्नास टक्के पीक विमा देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्याचे पैसे ही येवून तीन महिण्याचा कालावधी लोटला. केवळ शेतक-यांच्या याद्यात वारंवार घोळ झाल्यामुळे हा पैसा सुद्धा काही गावातील शेतक-यांच्या हाती पडू शकला नाही. देगलूर शाखेत आणखी आठ कोटी रुपये वाटपाचे काम बाकी आहे. हाळी, माळेगाव, बेम्बरा, मानूर, गोगला गोविंद तांडा आदी गावातील शेतकरी या पैशासाठी बँकेत व तलाठ्याकडे खेटे घालत आहेत. बँकेला याद्या दिल्याचे तलाठी सांगतात तर बँकेचे अधिकारी अद्याप याद्याच आल्या नसल्याचे सांगतात. त्यामुळे या गावातील शेतक-यांना २०१६ ची पीक विमा रक्कम मिळेल की नाही याची साशंकता निर्माण झाली आहे.खाते क्रमांकाचा घोळदुष्काळग्रस्त शेतक-यांना अनुदान देण्यासाठी ज्या याद्या तलाठ्यांनी दिल्या़ त्यातच सगळा घोळ झाला आहे. नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे खाते क्रमांक पंधरा अंकाचे आहे. काही तलाठ्यांनी लाभार्थी शेतक-यांच्या तयार केलेल्या यादीमध्ये खाते क्रमांकाचे शेवटचे केवळ चार अंक तर काही तलाठ्यांनी अखेरचे चार अंक सोडून उर्वरित अकरा अंकाचे खाते क्रमांक दिले. कामचुकार वृत्तीच्या काही तलाठ्यांनी खाते क्रमांकाचा रकानाच मोकळा सोडून दिला.तहसीलने जशीच्या तशी यादी पाठविलीतहसील कार्यालयामार्फत आलेल्या यादीमध्ये लाभार्थ्यांचे खाते क्रमांक अर्धवट असल्याने ती परत पाठविल्यानंतर तहसील कार्यालयाने कोणतीही दुरुस्ती न करता जशास तशी यादी परत पाठविली आहे. त्यामुळे नाव आणि खाते क्रमांक पाहून अनुदान रक्कम जमा करण्यास किती वेळ लागेल हे आपण सांगू शकत नाही असे येथील शाखेचे शाखाधिकारी सुभाष कºहाडे यांनी सांगितले. कावळगड्डा येथील तलाठ्याने ९० टक्के शेतक-यांच्या खाते क्रमांकासमोर अखेरचे चार अंक टाकून यादी सादर केल्याचे दिसून आले.४० गावांतील ४१ हजार शेतक-यांचे खातेज्या अर्थी पीक विमा उतरविला आहे़ त्याअर्थी त्या शेतक-यांकडे बँकेचे खाते उपलब्ध आहे असा होतो. प्रत्येक तलाठ्याने आपल्या सज्जतील गावामध्ये जाऊन खाते क्रमांक घेण्याची तसदी घेतली असती तर अनुदान रक्कम मिळण्यास विलंब झाला नसता. मध्यवर्ती बँकेच्या देगलूर शाखेत तालुक्याच्या चाळीस गावातील जवळपास ४१ हजार शेतक-यांचे खाते आहे. महसूल प्रशासनाने लाभार्थी शेतक-यांच्या याद्या अपु-या माहितीसह देऊन सोपस्कार पूर्ण केले. शाखेत अपुरा कर्मचारी वर्ग आहे. त्यामुळे बँक प्रशासनाने अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. शेतक-यांना अनुदानासाठी तात्काळ पैसा दिला पण तलाठ्यानी त्यांचे काम मनावर घेवून न केल्यामुळे शेतक-यांना अनुदानाचा पैसा त्यांच्या हातात दोन महिन्यानी पडेल की त्यास आणखी कालावधी लागू शकतो याबाबत अनिश्चितता कायम आहे.

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीbankबँक