शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
4
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
5
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
6
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
7
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
8
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
9
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
10
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
11
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
12
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
13
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
14
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
15
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
16
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
17
१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड
18
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
19
राखी सावंत पुन्हा रचणार स्वयंवर? सेलिब्रिटींना नाही तर राजकारण्यांना देणार आमंत्रण
20
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
Daily Top 2Weekly Top 5

ऐन दिवाळीत बळीराजा आर्थिक संकटात; हमीभावापेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 16:16 IST

बाहेर निवडणुकीची चर्चा पण शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलणार कोण ?

नांदेड : दरवर्षी शेतकऱ्यांचा शेती माल हमीभावाने खरेदी करण्याची घोषणा केली जाते. हमीभाव ठरवलाही जातो. मात्र, त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी कुठेच होताना दिसत नाही. सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा ७९२ ते १३९२ रुपये प्रति क्विंटल कमी दराने सोयाबीन विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ऐन सणासुदीच्या काळात शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने सरकारला शेतकऱ्याच्या गळ्यातील फास हटवायचा नाही का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

आगामी विधानसभा निवडणूक व दिवाळी सणाच्या अनुषंगाने ‘लोकमत’ने गुरुवारी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. यावेळी शेतीमालाला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला. मागच्या काही वर्षांपासून शेतकरी हा अस्मानी आणि सुलतानी संकटांच्या कचाट्यात अडकला आहे. कधी अतिवृष्टी तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना करत शेतकरी शेती माल पिकविण्यासाठी धडपडतोय. सरकारकडून अनेक योजनांच्या घोषणांचा गरज नसताना पाऊस पाडला जात आहे. मात्र, जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या मालाला पाहिजे तसा भाव देण्यासाठी कुणीच प्रयत्न करताना दिसून येत नाही. हमीभावाने शेतीमाल खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्रही उभारण्यात आले. मात्र एकाही हमी भाव खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना आपला माल विक्री करता आला नाही. सध्या खर्च अधिक आणि उत्पादन कमी झाल्याने शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्याकडे आत्महत्येशिवाय पर्याय उरला नाही. अशी खंतही शेतकऱ्यांनी बोलून दाखविली.

हमीभाव केवळ नावालाचकेंद्र सरकारने सोयाबीनला यावर्षीच्या चालू खरीप हंगामासाठी ४८९२ रुपये प्रति क्विंटल हमीभाव निश्चित केला आहे. सोयाबीनचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा ७०० ते ८०० रुपये प्रति क्विंटल कमी दराने शेतकऱ्यांना सोयाबीन विकावे लागत आहे. नांदेडच्याबाजार समितीत गुरुवारी ३९०० रुपये सरासरी दराने सोयाबीनची विक्री झाली. त्यामुळे हमी भाव केवळ नावालाच दिसून येत आहे.व्यंकटेश कदम, शेतकरी

एकही रूपया शिल्लक राहत नाहीशेतकऱ्याला ऐकरी सोयाबीनचा खर्च सरासरी अठरा ते वीस हजार रूपये ऐवढा येतो. अन् उत्पनही वीस हजार रूपयांच्या आसपास होत आहे. यामध्ये शेतकऱ्याने केलेल्या स्वता मेहनतीचा मोबदला पकडला तर खर्च अधिक आणि उत्पन्न कमी अशी परिस्थिती होते. त्यामुळे शेतकऱ्याला शेतीतील उत्पन्नातून एक रूपयाही शिल्लक राहत नसल्याने चांगला भाव मिळणे आवश्यक आहे.- विठ्ठल खांडरे, शेतकरी

शेती मालाला भाव नसल्याने शेतकरी हताशमागच्या काही वर्षापासून शेतकऱ्याच्या कोणत्याचा मालाल चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग हताश झाला आहे. मेहनतीच्या तुलने मोबदला मिळत नसल्याने निराश होवून कित्येक शेतकऱ्यांनी गळफास लावून मृत्यूला कवटाळले. त्यामुळे सरकारने वायफळ घोषणा राबविण्यापेक्षा शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यावा. तरच शेतकरी आत्महत्या थांबतील.- आनंदराव शिंदे, शेतकरी

सोयाबीनचा सरासरी एकरी खर्चनांगरणी- १०००वखरणी-८००सोयाबीन बॅग- ३२००खत-१५००पेरणी- १०००तणनाशक- १५००औषध फवारणी- ४०००सोयाबीन काढणी- ३५००मळणी यंत्र- १५००माल वाहतूक- ५००एकुण खर्च- १८५००उत्पन्न- एकरी ५ क्विंटल, भाव- ३९००, एकुण उत्पन्न- १९५००

टॅग्स :NandedनांदेडAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीMarketबाजार