शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
3
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
4
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
5
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
6
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
7
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
8
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
9
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
10
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
12
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
13
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
14
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
15
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
16
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
17
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
18
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
19
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
20
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप

ऐन दिवाळीत बळीराजा आर्थिक संकटात; हमीभावापेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 16:16 IST

बाहेर निवडणुकीची चर्चा पण शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलणार कोण ?

नांदेड : दरवर्षी शेतकऱ्यांचा शेती माल हमीभावाने खरेदी करण्याची घोषणा केली जाते. हमीभाव ठरवलाही जातो. मात्र, त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी कुठेच होताना दिसत नाही. सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा ७९२ ते १३९२ रुपये प्रति क्विंटल कमी दराने सोयाबीन विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ऐन सणासुदीच्या काळात शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने सरकारला शेतकऱ्याच्या गळ्यातील फास हटवायचा नाही का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

आगामी विधानसभा निवडणूक व दिवाळी सणाच्या अनुषंगाने ‘लोकमत’ने गुरुवारी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. यावेळी शेतीमालाला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला. मागच्या काही वर्षांपासून शेतकरी हा अस्मानी आणि सुलतानी संकटांच्या कचाट्यात अडकला आहे. कधी अतिवृष्टी तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना करत शेतकरी शेती माल पिकविण्यासाठी धडपडतोय. सरकारकडून अनेक योजनांच्या घोषणांचा गरज नसताना पाऊस पाडला जात आहे. मात्र, जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या मालाला पाहिजे तसा भाव देण्यासाठी कुणीच प्रयत्न करताना दिसून येत नाही. हमीभावाने शेतीमाल खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्रही उभारण्यात आले. मात्र एकाही हमी भाव खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना आपला माल विक्री करता आला नाही. सध्या खर्च अधिक आणि उत्पादन कमी झाल्याने शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्याकडे आत्महत्येशिवाय पर्याय उरला नाही. अशी खंतही शेतकऱ्यांनी बोलून दाखविली.

हमीभाव केवळ नावालाचकेंद्र सरकारने सोयाबीनला यावर्षीच्या चालू खरीप हंगामासाठी ४८९२ रुपये प्रति क्विंटल हमीभाव निश्चित केला आहे. सोयाबीनचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा ७०० ते ८०० रुपये प्रति क्विंटल कमी दराने शेतकऱ्यांना सोयाबीन विकावे लागत आहे. नांदेडच्याबाजार समितीत गुरुवारी ३९०० रुपये सरासरी दराने सोयाबीनची विक्री झाली. त्यामुळे हमी भाव केवळ नावालाच दिसून येत आहे.व्यंकटेश कदम, शेतकरी

एकही रूपया शिल्लक राहत नाहीशेतकऱ्याला ऐकरी सोयाबीनचा खर्च सरासरी अठरा ते वीस हजार रूपये ऐवढा येतो. अन् उत्पनही वीस हजार रूपयांच्या आसपास होत आहे. यामध्ये शेतकऱ्याने केलेल्या स्वता मेहनतीचा मोबदला पकडला तर खर्च अधिक आणि उत्पन्न कमी अशी परिस्थिती होते. त्यामुळे शेतकऱ्याला शेतीतील उत्पन्नातून एक रूपयाही शिल्लक राहत नसल्याने चांगला भाव मिळणे आवश्यक आहे.- विठ्ठल खांडरे, शेतकरी

शेती मालाला भाव नसल्याने शेतकरी हताशमागच्या काही वर्षापासून शेतकऱ्याच्या कोणत्याचा मालाल चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग हताश झाला आहे. मेहनतीच्या तुलने मोबदला मिळत नसल्याने निराश होवून कित्येक शेतकऱ्यांनी गळफास लावून मृत्यूला कवटाळले. त्यामुळे सरकारने वायफळ घोषणा राबविण्यापेक्षा शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यावा. तरच शेतकरी आत्महत्या थांबतील.- आनंदराव शिंदे, शेतकरी

सोयाबीनचा सरासरी एकरी खर्चनांगरणी- १०००वखरणी-८००सोयाबीन बॅग- ३२००खत-१५००पेरणी- १०००तणनाशक- १५००औषध फवारणी- ४०००सोयाबीन काढणी- ३५००मळणी यंत्र- १५००माल वाहतूक- ५००एकुण खर्च- १८५००उत्पन्न- एकरी ५ क्विंटल, भाव- ३९००, एकुण उत्पन्न- १९५००

टॅग्स :NandedनांदेडAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीMarketबाजार