शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
3
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
4
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
5
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
6
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
7
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
8
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
9
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
10
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
11
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
13
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
14
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
15
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
16
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
17
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
18
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
19
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
20
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात

कंधारात ऐतिहासिक कलाकुसरीची मूर्तीशिल्प देखभाली अभावी दुर्लक्षित;  अद्ययावत वस्तूसंग्रहालयाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 6:40 PM

बाराशे वर्षांचा इतिहास असलेले नानाविध शेकडो मूर्तीशिल्पांना जतन करण्यासाठी शासन व पुरातत्त्व विभागाने पुढाकार घेण्याची गरज आहे़ कलात्मक रेखाटने, शिल्पांकनाचे सौंदर्य अन् बारकावे पुसटसे होत असल्याची बाब समोर आली आहे़ भुईकोट किल्ला संवर्धनासाठी जसा निधी उपलब्ध करून दिला जात आहे, तसाच मूर्तीशिल्पे जतन करण्यासाठी अद्ययावत वस्तूसंग्रहालयाची निर्मिती करावी, अशी मागणी पर्यटक, इतिहासप्रेमींतून केली जात आहे़ 

- प्रा.गंगाधर तोगरे

कंधार (नांदेड ): बाराशे वर्षांचा इतिहास असलेले नानाविध शेकडो मूर्तीशिल्पांना जतन करण्यासाठी शासन व पुरातत्त्व विभागाने पुढाकार घेण्याची गरज आहे़ कलात्मक रेखाटने, शिल्पांकनाचे सौंदर्य अन् बारकावे पुसटसे होत असल्याची बाब समोर आली आहे़ भुईकोट किल्ला संवर्धनासाठी जसा निधी उपलब्ध करून दिला जात आहे, तसाच मूर्तीशिल्पे जतन करण्यासाठी अद्ययावत वस्तूसंग्रहालयाची निर्मिती करावी, अशी मागणी पर्यटक, इतिहासप्रेमींतून केली जात आहे़ 

आठव्या शतकापासून घडलेल्या अनेक स्मृती राष्ट्रकुटकालीन कंधार आपल्या अंगाखांद्यावर खेळवते आहे़ शहराला मंदिर, मूर्तीचा समृद्ध वारसा आहे़ कृष्णेश्वर मंदिर, क्षेत्रपाल मंदिर, संगरेश्वर मंदिर, बंकेश्वर मंदिर, मंडलसिद्धी विनायक मंदिर, जैन मंदिर, कालप्रिय नाथमंदिर आदी मंदिराने वैभव प्राप्तप्त करून दिले़ मात्र काळाच्या ओघात अनेक मंदिरे नष्ट झाली़ मोजकीच आता कशीतरी तग धरून आहेत़ त्यात जैन मंदिर, बौद्ध मूर्ती, द्वादशभूजा देवी, अष्टभुजा देवी मूर्ती सतर्कतेने चांगल्या स्थितीत पहायला मिळतात़ मात्र शेकडो मूर्तीशिल्पे अडगळीला असल्याचे दिसते़

मूर्तीशिल्पे शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात आढळतात़ खोदकाम, नांगरटी करताना ते प्रकर्षाने  समोर येतात़ त्याचे जतन करण्याचेच मोठे आव्हान आजही कायम आहे़ महादेव, नंदी, पार्वती, कौमारी, जैन, पद्मपाणी, वैष्णवी, महिषासूर मर्दिनी, चामुंडा, लज्जागौरी, महाकालीन, अवलोकीतेश्वर, क्षेत्रपाल भैरव, चंद्रशिळा, हत्ती, गणेश आदी मूर्तीशिल्पे विखुरलेले व अडगळीत आहेत. वादळवारा, ऊन, पाऊस, गारठा आदीचे आघात सहन करत मूर्तीशिल्पे पर्यटकांना आकर्षित करतात़, परंतु बाराशे वर्षांचा समृद्ध वारसा दुर्लक्षित होत असल्याने त्याचे कलात्मक रेखाटने, शिल्पांकनाचे बारकावे पुसटते होत असल्याची भीती पर्यटकांतून व्यक्त होत आहे़

वेरूळ-अजिंठा येथे असलेल्या शिल्पकला, शिल्पवैभवाच्या तोडीचा समृद्ध वारसा, कला साधना, अप्रतिम मूर्तीशिल्पे कंधारचे जतन करणे काळाची गरज आहे़ भुईकोट किल्ला संवर्धन करण्यासाठी शासन-पुरातत्त्व विभागाने दमदार पावले टाकली आहेत़ तशीच पावले मूर्ती जतन, संवर्धनासाठी टाकावीत, अन्यथा अप्रतिम-कलासाधना काळाच्या ओघात पुसटशा होवून सौंदर्य नष्ट होण्याची भीती आहे़ 

माजी खा़भाई डॉक़ेशवराव धोंडगे व माजी आ़भाई गुरुनाथराव कुरुडे यांनी मन्याड खोर्‍याचा मंदिर-मूर्तीचा ऐतिहासिक वारसा जतन करण्याची अनेकवेळा शासनाकडे मागणी केली़ बहाद्दरपुरा येथे पाटबंधारे विभागाकडून राष्ट्रकुट भवन वस्तूसंग्रहालय उभारण्यासाठी पुढाकार घेतला़ त्यामुळे अनेक मूर्तीचे योग्य जतन होण्यास मोठी मदत झाली़ मानार नदी काठावर शांतीघाट परिसर, बगीचा, मंदिर, राष्ट्रकुट भवन वस्तूसंग्रहालय, द्वादशभूजा देवी लोकाश्रय मंडप आदींना पर्यटक त्यामुळे भेटी देतात़ विखुरलेले अनेक मूर्तीशिल्पे एकत्रित करून, भंगलेले मूर्तीशिल्पे एकत्रित करावीत, ज्यात किल्ल्यातील गणेशमूर्ती, नंदी, क्षेत्रपाल आदी उघड्यावर पडलेले आहेत़ त्या कलावैभवाला अद्ययावत वस्तूसंग्रहालय बहाद्दरपुरा येथेच जतन करण्यासाठी करावे़ सद्य:स्थितीत असलेल्या राष्ट्रकुट भवन वस्तूसंग्रहालयाची व्यापकता वाढवावी.