शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

कंधार तालुक्यातील सव्वाशे अंगणवाड्या धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:22 IST

शासनाकडून प्राथमिक शिक्षण दर्जेदार मिळावे यासाठी विविध योजना राबविण्यात येतात़ परंतु, प्रत्यक्षात या योजनांची अंमलबजावणीच करण्यात येत नाही़ त्यात प्राथमिक शिक्षणात सर्वात महत्त्वाच्या असलेल्या अंगणवाड्यांकडेही शासनाचे दुर्लक्ष होत आहे़

ठळक मुद्देसहा अंगणवाड्यांत उघड्यावरच गिरवावे लागतात चिमुकल्यांना धडे

नांदेड : शासनाकडून प्राथमिक शिक्षण दर्जेदार मिळावे यासाठी विविध योजना राबविण्यात येतात़ परंतु, प्रत्यक्षात या योजनांची अंमलबजावणीच करण्यात येत नाही़ त्यात प्राथमिक शिक्षणात सर्वात महत्त्वाच्या असलेल्या अंगणवाड्यांकडेही शासनाचे दुर्लक्ष होत आहे़ एकट्या कंधार तालुक्यात तब्बल सव्वाशे अंगणवाड्यांच्या इमारती धोकादायक बनल्या आहेत़ त्यामुळे येत्या पावसाळ्यात या इमारतींची अवस्था आणखी बिकट होणार आहे़कंधार तालुक्यात अंगणवाडी व मिनी अंगणवाडीची एकूण संख्या ३२० आहे. परंतु, अनेक अंगणवाडीला स्वत:ची इमारत नाही. सव्वाशेपेक्षा अधिक अंगणवाडीला इमारत असली तरी त्या नादुरूस्त आहेत. शाळेच्या खोल्या, अंगणवाडी व्हरांडा, ग्रामपंचायत, समाजमंदिर, भाड्याच्या इमारतीत त्या भरतात. त्यातच सहा अंगणवाड्या उघड्यावर भरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.पूर्वप्राथमिक शिक्षण, आरोग्य, आहार आदी सोयी-सुविधा देऊन देशाची भावी पिढी कार्यक्षम करण्याकरिता अंगणवाडी केंद्राचे मोठे योगदान आहे. परंतु, अद्याप तालुका कुपोषणमुक्त होऊ शकला नाही, अंगणवाडीचे रूप पालटले नाही, अंगणवाड्या हायटेक होत नाहीत. त्यामुळे बालकांना नानाविध समस्यांचा सामना करावा लागतो. त्यातच खेळाचे साहित्य नाही, संरक्षक भिंत नाही, शुद्ध पाणी नाही, विद्युत पुरवठा नाही. अशा समस्यांचा सामना करीतच विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत़स्वत:ची इमारत असलेल्या अंगणवाडीची संख्या फक्त १७५ असून यातील १२५ पेक्षा अधिक इमारती या नादुरूस्त असल्याचे पुढे आले आहे़ सुमारे ३५ अंगणवाड्या या भाड्याच्या इमारतीत आहेत. शाळेच्या कक्ष व व्हरांड्यात सुमारे ५० अंगणवाड्या भरतात. ग्रामपंचायतीत १७, व्हरांड्यात ७, समाजमंदिरात २३, कार्यकर्तीच्या घरी २ अशाप्रकारे मिळेल तिथे अंगणवाडी सुरु करुन विद्यार्थ्यांना धडे गिरवावे लागत आहेत़त्यात उघड्यावर ६ अंगणवाड्या भरत असल्याचे समोर आले आहे. त्यात बाळांतवाडी तांडा अंगणवाडी, नवरंगपुरा क्रमांक २, जांभूळवाडी, रूईतांडा, सावरगावतांडा, रेखातांडा मिनी अंगणवाडीचा समावेश आहे. उघड्यावरील अंगणवाडीत ऊन, वारा, पावसात बालकांना बसावे लागते़ पाऊस किंवा उनाचा पारा वाढला की त्या दिवशी अंगणवाडीला सुटी असे समीकरणच बनले आहे़ यासाठी प्रयत्नाची गरज असून वरिष्ठ पातळीवरून लक्ष देण्याची मागणी होत आहे. अंगणवाडी केंद्रात पायाभूत सुविधा मिळत नाहीत, कुपोषणमुक्ती होत नाही. मग कार्यक्षम भावी पिढी व सुदृढ बालक कसे होतील? हा खरा प्रश्न आहे.आदर्श अंगणवाडी केंद्रात ३२ अंगणवाड्यांचे रूपांतर करण्यासाठी मंजुरी अद्याप मिळाली नाही़ आय.एस.ओ. अंगणवाडीचे उद्दिष्ट पूर्ण होत नाही. अशा विविध अडचणींचा सामना अंगणवाड्या करीत आहेत. त्यात मात्र हजारो बालकांची फरफट होत असून याकडे लक्ष देण्याची गरज आहे़ जिल्हा परिषदेकडून या अंगणवाड्यांसाठी भरीव निधीची तरतूद करुन या इमारती पुन्हा उभाराव्या लागणार आहेत़पावसाळ्यात होवू शकते दुर्घटनाकंधार तालुक्यातील जवळपास सव्वाशे अंगणवाड्यांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत़ अनेक ठिकाणी इमारतींच्या भिंतींना तडे गेले आहेत़ तर काही ठिकाणी छताचा भागही कोसळल्याचे दिसून आले आहे़तर अनेक अंगणवाड्यांची छप्परे गळकी आहेत़ त्यामुळे येत्या पावसाळ्यात या भिंतीमध्ये पाणी मुरुन त्या पडण्याची दाट शक्यता आहे़ त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यताही नाकारता येत नाही़पूर्वप्राथमिक शिक्षण, आरोग्य, आहार आदी सोयीसुविधा देऊन देशाची भावी पिढी कार्यक्षम करण्याकरिता अंगणवाडी केंद्राचे मोठे योगदान आहे. परंतु तालुका अद्याप कुपोषणमुक्त होऊ शकला नाही, अंगणवाडीचे रूप पालटले नाही, अंगणवाड्या हायटेक होत नाहीत.

टॅग्स :NandedनांदेडEducationशिक्षणStudentविद्यार्थी