शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

कंधार तालुक्यातील सव्वाशे अंगणवाड्या धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:22 IST

शासनाकडून प्राथमिक शिक्षण दर्जेदार मिळावे यासाठी विविध योजना राबविण्यात येतात़ परंतु, प्रत्यक्षात या योजनांची अंमलबजावणीच करण्यात येत नाही़ त्यात प्राथमिक शिक्षणात सर्वात महत्त्वाच्या असलेल्या अंगणवाड्यांकडेही शासनाचे दुर्लक्ष होत आहे़

ठळक मुद्देसहा अंगणवाड्यांत उघड्यावरच गिरवावे लागतात चिमुकल्यांना धडे

नांदेड : शासनाकडून प्राथमिक शिक्षण दर्जेदार मिळावे यासाठी विविध योजना राबविण्यात येतात़ परंतु, प्रत्यक्षात या योजनांची अंमलबजावणीच करण्यात येत नाही़ त्यात प्राथमिक शिक्षणात सर्वात महत्त्वाच्या असलेल्या अंगणवाड्यांकडेही शासनाचे दुर्लक्ष होत आहे़ एकट्या कंधार तालुक्यात तब्बल सव्वाशे अंगणवाड्यांच्या इमारती धोकादायक बनल्या आहेत़ त्यामुळे येत्या पावसाळ्यात या इमारतींची अवस्था आणखी बिकट होणार आहे़कंधार तालुक्यात अंगणवाडी व मिनी अंगणवाडीची एकूण संख्या ३२० आहे. परंतु, अनेक अंगणवाडीला स्वत:ची इमारत नाही. सव्वाशेपेक्षा अधिक अंगणवाडीला इमारत असली तरी त्या नादुरूस्त आहेत. शाळेच्या खोल्या, अंगणवाडी व्हरांडा, ग्रामपंचायत, समाजमंदिर, भाड्याच्या इमारतीत त्या भरतात. त्यातच सहा अंगणवाड्या उघड्यावर भरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.पूर्वप्राथमिक शिक्षण, आरोग्य, आहार आदी सोयी-सुविधा देऊन देशाची भावी पिढी कार्यक्षम करण्याकरिता अंगणवाडी केंद्राचे मोठे योगदान आहे. परंतु, अद्याप तालुका कुपोषणमुक्त होऊ शकला नाही, अंगणवाडीचे रूप पालटले नाही, अंगणवाड्या हायटेक होत नाहीत. त्यामुळे बालकांना नानाविध समस्यांचा सामना करावा लागतो. त्यातच खेळाचे साहित्य नाही, संरक्षक भिंत नाही, शुद्ध पाणी नाही, विद्युत पुरवठा नाही. अशा समस्यांचा सामना करीतच विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत़स्वत:ची इमारत असलेल्या अंगणवाडीची संख्या फक्त १७५ असून यातील १२५ पेक्षा अधिक इमारती या नादुरूस्त असल्याचे पुढे आले आहे़ सुमारे ३५ अंगणवाड्या या भाड्याच्या इमारतीत आहेत. शाळेच्या कक्ष व व्हरांड्यात सुमारे ५० अंगणवाड्या भरतात. ग्रामपंचायतीत १७, व्हरांड्यात ७, समाजमंदिरात २३, कार्यकर्तीच्या घरी २ अशाप्रकारे मिळेल तिथे अंगणवाडी सुरु करुन विद्यार्थ्यांना धडे गिरवावे लागत आहेत़त्यात उघड्यावर ६ अंगणवाड्या भरत असल्याचे समोर आले आहे. त्यात बाळांतवाडी तांडा अंगणवाडी, नवरंगपुरा क्रमांक २, जांभूळवाडी, रूईतांडा, सावरगावतांडा, रेखातांडा मिनी अंगणवाडीचा समावेश आहे. उघड्यावरील अंगणवाडीत ऊन, वारा, पावसात बालकांना बसावे लागते़ पाऊस किंवा उनाचा पारा वाढला की त्या दिवशी अंगणवाडीला सुटी असे समीकरणच बनले आहे़ यासाठी प्रयत्नाची गरज असून वरिष्ठ पातळीवरून लक्ष देण्याची मागणी होत आहे. अंगणवाडी केंद्रात पायाभूत सुविधा मिळत नाहीत, कुपोषणमुक्ती होत नाही. मग कार्यक्षम भावी पिढी व सुदृढ बालक कसे होतील? हा खरा प्रश्न आहे.आदर्श अंगणवाडी केंद्रात ३२ अंगणवाड्यांचे रूपांतर करण्यासाठी मंजुरी अद्याप मिळाली नाही़ आय.एस.ओ. अंगणवाडीचे उद्दिष्ट पूर्ण होत नाही. अशा विविध अडचणींचा सामना अंगणवाड्या करीत आहेत. त्यात मात्र हजारो बालकांची फरफट होत असून याकडे लक्ष देण्याची गरज आहे़ जिल्हा परिषदेकडून या अंगणवाड्यांसाठी भरीव निधीची तरतूद करुन या इमारती पुन्हा उभाराव्या लागणार आहेत़पावसाळ्यात होवू शकते दुर्घटनाकंधार तालुक्यातील जवळपास सव्वाशे अंगणवाड्यांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत़ अनेक ठिकाणी इमारतींच्या भिंतींना तडे गेले आहेत़ तर काही ठिकाणी छताचा भागही कोसळल्याचे दिसून आले आहे़तर अनेक अंगणवाड्यांची छप्परे गळकी आहेत़ त्यामुळे येत्या पावसाळ्यात या भिंतीमध्ये पाणी मुरुन त्या पडण्याची दाट शक्यता आहे़ त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यताही नाकारता येत नाही़पूर्वप्राथमिक शिक्षण, आरोग्य, आहार आदी सोयीसुविधा देऊन देशाची भावी पिढी कार्यक्षम करण्याकरिता अंगणवाडी केंद्राचे मोठे योगदान आहे. परंतु तालुका अद्याप कुपोषणमुक्त होऊ शकला नाही, अंगणवाडीचे रूप पालटले नाही, अंगणवाड्या हायटेक होत नाहीत.

टॅग्स :NandedनांदेडEducationशिक्षणStudentविद्यार्थी