शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

कंधार तालुक्यातील सव्वाशे अंगणवाड्या धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:22 IST

शासनाकडून प्राथमिक शिक्षण दर्जेदार मिळावे यासाठी विविध योजना राबविण्यात येतात़ परंतु, प्रत्यक्षात या योजनांची अंमलबजावणीच करण्यात येत नाही़ त्यात प्राथमिक शिक्षणात सर्वात महत्त्वाच्या असलेल्या अंगणवाड्यांकडेही शासनाचे दुर्लक्ष होत आहे़

ठळक मुद्देसहा अंगणवाड्यांत उघड्यावरच गिरवावे लागतात चिमुकल्यांना धडे

नांदेड : शासनाकडून प्राथमिक शिक्षण दर्जेदार मिळावे यासाठी विविध योजना राबविण्यात येतात़ परंतु, प्रत्यक्षात या योजनांची अंमलबजावणीच करण्यात येत नाही़ त्यात प्राथमिक शिक्षणात सर्वात महत्त्वाच्या असलेल्या अंगणवाड्यांकडेही शासनाचे दुर्लक्ष होत आहे़ एकट्या कंधार तालुक्यात तब्बल सव्वाशे अंगणवाड्यांच्या इमारती धोकादायक बनल्या आहेत़ त्यामुळे येत्या पावसाळ्यात या इमारतींची अवस्था आणखी बिकट होणार आहे़कंधार तालुक्यात अंगणवाडी व मिनी अंगणवाडीची एकूण संख्या ३२० आहे. परंतु, अनेक अंगणवाडीला स्वत:ची इमारत नाही. सव्वाशेपेक्षा अधिक अंगणवाडीला इमारत असली तरी त्या नादुरूस्त आहेत. शाळेच्या खोल्या, अंगणवाडी व्हरांडा, ग्रामपंचायत, समाजमंदिर, भाड्याच्या इमारतीत त्या भरतात. त्यातच सहा अंगणवाड्या उघड्यावर भरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.पूर्वप्राथमिक शिक्षण, आरोग्य, आहार आदी सोयी-सुविधा देऊन देशाची भावी पिढी कार्यक्षम करण्याकरिता अंगणवाडी केंद्राचे मोठे योगदान आहे. परंतु, अद्याप तालुका कुपोषणमुक्त होऊ शकला नाही, अंगणवाडीचे रूप पालटले नाही, अंगणवाड्या हायटेक होत नाहीत. त्यामुळे बालकांना नानाविध समस्यांचा सामना करावा लागतो. त्यातच खेळाचे साहित्य नाही, संरक्षक भिंत नाही, शुद्ध पाणी नाही, विद्युत पुरवठा नाही. अशा समस्यांचा सामना करीतच विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत़स्वत:ची इमारत असलेल्या अंगणवाडीची संख्या फक्त १७५ असून यातील १२५ पेक्षा अधिक इमारती या नादुरूस्त असल्याचे पुढे आले आहे़ सुमारे ३५ अंगणवाड्या या भाड्याच्या इमारतीत आहेत. शाळेच्या कक्ष व व्हरांड्यात सुमारे ५० अंगणवाड्या भरतात. ग्रामपंचायतीत १७, व्हरांड्यात ७, समाजमंदिरात २३, कार्यकर्तीच्या घरी २ अशाप्रकारे मिळेल तिथे अंगणवाडी सुरु करुन विद्यार्थ्यांना धडे गिरवावे लागत आहेत़त्यात उघड्यावर ६ अंगणवाड्या भरत असल्याचे समोर आले आहे. त्यात बाळांतवाडी तांडा अंगणवाडी, नवरंगपुरा क्रमांक २, जांभूळवाडी, रूईतांडा, सावरगावतांडा, रेखातांडा मिनी अंगणवाडीचा समावेश आहे. उघड्यावरील अंगणवाडीत ऊन, वारा, पावसात बालकांना बसावे लागते़ पाऊस किंवा उनाचा पारा वाढला की त्या दिवशी अंगणवाडीला सुटी असे समीकरणच बनले आहे़ यासाठी प्रयत्नाची गरज असून वरिष्ठ पातळीवरून लक्ष देण्याची मागणी होत आहे. अंगणवाडी केंद्रात पायाभूत सुविधा मिळत नाहीत, कुपोषणमुक्ती होत नाही. मग कार्यक्षम भावी पिढी व सुदृढ बालक कसे होतील? हा खरा प्रश्न आहे.आदर्श अंगणवाडी केंद्रात ३२ अंगणवाड्यांचे रूपांतर करण्यासाठी मंजुरी अद्याप मिळाली नाही़ आय.एस.ओ. अंगणवाडीचे उद्दिष्ट पूर्ण होत नाही. अशा विविध अडचणींचा सामना अंगणवाड्या करीत आहेत. त्यात मात्र हजारो बालकांची फरफट होत असून याकडे लक्ष देण्याची गरज आहे़ जिल्हा परिषदेकडून या अंगणवाड्यांसाठी भरीव निधीची तरतूद करुन या इमारती पुन्हा उभाराव्या लागणार आहेत़पावसाळ्यात होवू शकते दुर्घटनाकंधार तालुक्यातील जवळपास सव्वाशे अंगणवाड्यांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत़ अनेक ठिकाणी इमारतींच्या भिंतींना तडे गेले आहेत़ तर काही ठिकाणी छताचा भागही कोसळल्याचे दिसून आले आहे़तर अनेक अंगणवाड्यांची छप्परे गळकी आहेत़ त्यामुळे येत्या पावसाळ्यात या भिंतीमध्ये पाणी मुरुन त्या पडण्याची दाट शक्यता आहे़ त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यताही नाकारता येत नाही़पूर्वप्राथमिक शिक्षण, आरोग्य, आहार आदी सोयीसुविधा देऊन देशाची भावी पिढी कार्यक्षम करण्याकरिता अंगणवाडी केंद्राचे मोठे योगदान आहे. परंतु तालुका अद्याप कुपोषणमुक्त होऊ शकला नाही, अंगणवाडीचे रूप पालटले नाही, अंगणवाड्या हायटेक होत नाहीत.

टॅग्स :NandedनांदेडEducationशिक्षणStudentविद्यार्थी