शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दहावीच्या भूगोल विषयाचे गुण देणार कसे ? राज्यस्तरीय समितीची बैठक होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 19:13 IST

या विषयाचे गुण कोणत्या आधारे द्यायचे याचा निर्णय अद्यापही झाला नाही़ 

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे निर्णय प्रलंबितच निकाल १० जूनपूर्वीच

- सुनील जोशी 

नांदेड : कोविड-२०१९ च्या लॉकडाऊनमुळे दहावीच्या भूगोल विषयाचा पेपर स्थगित करण्यात आला होता़ राज्यस्तरीय तदर्थ समितीची बैठक लॉकडाऊनमुळे झालीचनसल्याने  या विषयाचे गुण कोणत्या आधारे द्यायचे याचा निर्णय अद्यापही झाला नाही़ 

१० वीचा निकाल पाच विषयांचाच लावायचा की? पाच विषयांच्या गुणांची सरासरी करून भूगोल विषयाचे गुण द्यायचे किंवा इतिहास विषयात जेवढे मार्क विद्यार्थ्यांना पडले तेवढेच मार्क भूगोलला देऊन सुवर्णमध्य साधायचा, हा विषय बोर्डाच्या अधिकाऱ्यांपुढे आहे़ यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी बोर्डाची उच्चस्तरीय तदर्थ समिती आहे़ या समितीमध्ये राज्यात असलेल्या विविध मंडळांचे अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापक, पालक, संस्थाचालक यांचा समावेश आहे़ समितीच्या बैठकीत यावर चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल, असे अपेक्षित होते़ मात्र लॉकडाऊनमुळे तसे झाले नाही़  दरम्यान, लॉकडाऊनमुळे दहावी परीक्षेचे पेपर अद्यापही संबंधित तपासणीस यांच्याकडे पडून आहेत़ विद्यार्थ्यांना अ‍ॅव्हरेज गुण दिले जाणार असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूरचे सचिव  औदुंबर उकीरडे यांनी सांगितले. सगळ्या विषयांचे गुण मिळून अ‍ॅव्हरेज गुण द्यायचे की, जेवढे इतिहासचे गुण मिळाले, तेवढे भूगोलमध्ये द्यायचे, याचा निर्णय घेतला जाईल.

निकाल १० जूनपूर्वीच1 १० जूनपूर्वी निकाल लावावेत, असे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. कालच बोर्डाच्या अध्यक्षांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिग झाली. मधल्या काळात काही ठिकाणी पोलिसांकडून अडवणूक झाल्याने उत्तरपत्रिका आमच्यापर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. 

2 सध्या दहावीचे ३० टक्के आणि बारावीचे ७० टक्के काम झाले आहे.  आजपासून आम्ही प्रत्येक मॉडरेटरसोबत झुमवर बैठक घेणे सुरु केले आहे. पुढील पाच ते सात दिवसांत बऱ्याचशा उत्तरपत्रिका जमा होतील.  

3 जे हॉटझोनमध्ये राहतात, त्यांच्याकडील उत्तरपत्रिका आम्ही स्वत: जमा करून घेऊ अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूरचे सचिव औदुंबर उकिरडे यांनी दिली. 

मॉडरेटरांना क्वारंटाईनची भीती  शासनाने आदेश काढल्याप्रमाणे उत्तरपत्रिका तपासणीचे काम होईल़ पुढे मॉडरेटरकडे पाठविल्या जातील व नंतर मॉडरेटर लातूर बोर्डाकडे उत्तरपत्रिका घेऊन जातील़ मात्र, १४ दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवले जाणार तर नाही ना अशी भीती मॉडरेटरमध्ये पसरली आहे.बोर्डानेच पुढाकार घेऊन जिल्ह्याच्या ठिकाणी उत्तरपत्रिका जमा करायला लावाव्यात व त्या घेण्यासाठी लातूरहूनच चारचाकी वाहन पाठवावे, जेणेकरुन ते सर्वांच्याच सोयीचे होईल, असा मतप्रवाह मॉडरेटरमध्ये सुरु आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसexamपरीक्षाSSC Resultदहावीचा निकालStudentविद्यार्थी