शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
2
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
3
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
4
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
5
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
6
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
7
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
8
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
9
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
11
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
12
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
13
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
14
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
15
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
16
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
17
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
18
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
19
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
20
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या भूगोल विषयाचे गुण देणार कसे ? राज्यस्तरीय समितीची बैठक होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 19:13 IST

या विषयाचे गुण कोणत्या आधारे द्यायचे याचा निर्णय अद्यापही झाला नाही़ 

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे निर्णय प्रलंबितच निकाल १० जूनपूर्वीच

- सुनील जोशी 

नांदेड : कोविड-२०१९ च्या लॉकडाऊनमुळे दहावीच्या भूगोल विषयाचा पेपर स्थगित करण्यात आला होता़ राज्यस्तरीय तदर्थ समितीची बैठक लॉकडाऊनमुळे झालीचनसल्याने  या विषयाचे गुण कोणत्या आधारे द्यायचे याचा निर्णय अद्यापही झाला नाही़ 

१० वीचा निकाल पाच विषयांचाच लावायचा की? पाच विषयांच्या गुणांची सरासरी करून भूगोल विषयाचे गुण द्यायचे किंवा इतिहास विषयात जेवढे मार्क विद्यार्थ्यांना पडले तेवढेच मार्क भूगोलला देऊन सुवर्णमध्य साधायचा, हा विषय बोर्डाच्या अधिकाऱ्यांपुढे आहे़ यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी बोर्डाची उच्चस्तरीय तदर्थ समिती आहे़ या समितीमध्ये राज्यात असलेल्या विविध मंडळांचे अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापक, पालक, संस्थाचालक यांचा समावेश आहे़ समितीच्या बैठकीत यावर चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल, असे अपेक्षित होते़ मात्र लॉकडाऊनमुळे तसे झाले नाही़  दरम्यान, लॉकडाऊनमुळे दहावी परीक्षेचे पेपर अद्यापही संबंधित तपासणीस यांच्याकडे पडून आहेत़ विद्यार्थ्यांना अ‍ॅव्हरेज गुण दिले जाणार असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूरचे सचिव  औदुंबर उकीरडे यांनी सांगितले. सगळ्या विषयांचे गुण मिळून अ‍ॅव्हरेज गुण द्यायचे की, जेवढे इतिहासचे गुण मिळाले, तेवढे भूगोलमध्ये द्यायचे, याचा निर्णय घेतला जाईल.

निकाल १० जूनपूर्वीच1 १० जूनपूर्वी निकाल लावावेत, असे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. कालच बोर्डाच्या अध्यक्षांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिग झाली. मधल्या काळात काही ठिकाणी पोलिसांकडून अडवणूक झाल्याने उत्तरपत्रिका आमच्यापर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. 

2 सध्या दहावीचे ३० टक्के आणि बारावीचे ७० टक्के काम झाले आहे.  आजपासून आम्ही प्रत्येक मॉडरेटरसोबत झुमवर बैठक घेणे सुरु केले आहे. पुढील पाच ते सात दिवसांत बऱ्याचशा उत्तरपत्रिका जमा होतील.  

3 जे हॉटझोनमध्ये राहतात, त्यांच्याकडील उत्तरपत्रिका आम्ही स्वत: जमा करून घेऊ अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूरचे सचिव औदुंबर उकिरडे यांनी दिली. 

मॉडरेटरांना क्वारंटाईनची भीती  शासनाने आदेश काढल्याप्रमाणे उत्तरपत्रिका तपासणीचे काम होईल़ पुढे मॉडरेटरकडे पाठविल्या जातील व नंतर मॉडरेटर लातूर बोर्डाकडे उत्तरपत्रिका घेऊन जातील़ मात्र, १४ दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवले जाणार तर नाही ना अशी भीती मॉडरेटरमध्ये पसरली आहे.बोर्डानेच पुढाकार घेऊन जिल्ह्याच्या ठिकाणी उत्तरपत्रिका जमा करायला लावाव्यात व त्या घेण्यासाठी लातूरहूनच चारचाकी वाहन पाठवावे, जेणेकरुन ते सर्वांच्याच सोयीचे होईल, असा मतप्रवाह मॉडरेटरमध्ये सुरु आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसexamपरीक्षाSSC Resultदहावीचा निकालStudentविद्यार्थी