शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

सिलेंडरच्या स्फोटाने संसाराची राखरांगोळी; जळालेली पुस्तके पाहून चिमुकल्यांना कोसळले रडू

By शिवराज बिचेवार | Updated: April 5, 2023 19:23 IST

पत्रे उडाली अन् कपड्यांसह पुस्तकेही जळाली, सुदैवाने जीवितहानी नाही

नांदेड- मिस्त्री काम करुन एक-एक रुपया जोडत पत्र्याचे घर उभे केले. पत्नीनेही संसाराला हातभार लागावा म्हणून कर्ज काढून साड्यांचा व्यवसाय सुरु केला. परंतु सिलेंडरच्या स्फोटाने होत्याचे नव्हते झाले. अख्खा घराच्या राख रांगोळीत चिमुकल्यांची पुस्तकेही जळाली. ही घटना बुधवारी नसरपूर येथे घडली. सुदैवाने यावेळी घरात कोणी नसल्याने जीवितहानी टळली.

जयभीम शिरसाठ हे मिस्त्री काम करतात. त्यांनी मजूरीतून एक-एक पैसा जोडत सहा महिन्यापूर्वी नसरतपूर येथे पत्र्याचे घर बांधले. तर त्यांची पत्नी अनिता शिरसाठ या गृहिणी आहेत. संसाराला हातभार लागावा म्हणून त्यांनी काही महिन्यापूर्वीच कर्ज काढून साड्यांचा व्यवसाय सुरु केला होता. भीमजयंती असल्याने साड्यांची विक्री होवून काही पैसे पदरात पडतील अशी अपेक्षा त्यांना होती. तसेच ब्युटी पार्लरचे साहित्यही घेतले होते. त्यांची दोन मुले १४ वर्षीय सौरभ आणि ११ वर्षीय रोहित हे दोघेही शाळेत जातात. बुधवारी जयभीम शिरसाठ हे कामावर गेले होते. तर दोन्ही मुले शाळेत गेली होती.

यावेळी अनिता या एकट्याच घरी होत्या. दुपारी गॅसवर स्वंयपाक करीत असताना शेजारी राहत असलेल्या मावशीचा त्यांना फोन आला. गॅसवर भाजी ठेवून त्या मावशीकडे गेल्या. त्यानंतर काही वेळातच सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज अख्या नसरतपूर मध्ये ऐकायला मिळाला. अनिता यांनी घराकडे धाव घेतली. समोरचे भयाण चित्र पाहून त्यांची पाचावर धारणच बसली. कारण घरावरची पत्रे उडून गेली होती. घरातील सर्व साहित्यही जळून खाक झाले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन विभागाने धाव घेतली. आग विझविली परंतु तोपर्यंत संसाराची राखरांगोळी झाली होती. अवघ्या काही क्षणात शिरसाठ कुटुंब उघड्यावर आले होते.

चिमुकल्यांना कोसळले रडूशाळेतून परत आलेल्या सौरभ आणि रोहित यांना स्फोटात जळालेली पुस्तके पाहून रडू कोसळले. आता आम्ही शाळेत कसे जाणार? असा केविलवाणा प्रश्न ते आपल्या आईला विचारत होते. तर अनिता शिरसाठ यांनाही अश्रृच्या धारा आवरता येत नव्हत्या.

सहा महिन्यापूर्वीच बांधले पत्र्याचे घरजयभीम शिरसाठ हे मिस्त्री काम करतात. त्याच्या मजूरीवरच ते मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाचा गाडा चालवितात. पत्नी अनिता यांनीही संसाराला मदत होईल म्हणून साड्यांचा व्यवसाय सुुरु केला होता. सहा महिन्यापूर्वीच डोक्यावर हक्काचे छत असावे म्हणून त्यांनी पत्र्याचे घर बांधले होते. परंतु आगीने होत्याचे नव्हते केले.

टॅग्स :Nandedनांदेडfireआग