शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

सिलेंडरच्या स्फोटाने संसाराची राखरांगोळी; जळालेली पुस्तके पाहून चिमुकल्यांना कोसळले रडू

By शिवराज बिचेवार | Updated: April 5, 2023 19:23 IST

पत्रे उडाली अन् कपड्यांसह पुस्तकेही जळाली, सुदैवाने जीवितहानी नाही

नांदेड- मिस्त्री काम करुन एक-एक रुपया जोडत पत्र्याचे घर उभे केले. पत्नीनेही संसाराला हातभार लागावा म्हणून कर्ज काढून साड्यांचा व्यवसाय सुरु केला. परंतु सिलेंडरच्या स्फोटाने होत्याचे नव्हते झाले. अख्खा घराच्या राख रांगोळीत चिमुकल्यांची पुस्तकेही जळाली. ही घटना बुधवारी नसरपूर येथे घडली. सुदैवाने यावेळी घरात कोणी नसल्याने जीवितहानी टळली.

जयभीम शिरसाठ हे मिस्त्री काम करतात. त्यांनी मजूरीतून एक-एक पैसा जोडत सहा महिन्यापूर्वी नसरतपूर येथे पत्र्याचे घर बांधले. तर त्यांची पत्नी अनिता शिरसाठ या गृहिणी आहेत. संसाराला हातभार लागावा म्हणून त्यांनी काही महिन्यापूर्वीच कर्ज काढून साड्यांचा व्यवसाय सुरु केला होता. भीमजयंती असल्याने साड्यांची विक्री होवून काही पैसे पदरात पडतील अशी अपेक्षा त्यांना होती. तसेच ब्युटी पार्लरचे साहित्यही घेतले होते. त्यांची दोन मुले १४ वर्षीय सौरभ आणि ११ वर्षीय रोहित हे दोघेही शाळेत जातात. बुधवारी जयभीम शिरसाठ हे कामावर गेले होते. तर दोन्ही मुले शाळेत गेली होती.

यावेळी अनिता या एकट्याच घरी होत्या. दुपारी गॅसवर स्वंयपाक करीत असताना शेजारी राहत असलेल्या मावशीचा त्यांना फोन आला. गॅसवर भाजी ठेवून त्या मावशीकडे गेल्या. त्यानंतर काही वेळातच सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज अख्या नसरतपूर मध्ये ऐकायला मिळाला. अनिता यांनी घराकडे धाव घेतली. समोरचे भयाण चित्र पाहून त्यांची पाचावर धारणच बसली. कारण घरावरची पत्रे उडून गेली होती. घरातील सर्व साहित्यही जळून खाक झाले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन विभागाने धाव घेतली. आग विझविली परंतु तोपर्यंत संसाराची राखरांगोळी झाली होती. अवघ्या काही क्षणात शिरसाठ कुटुंब उघड्यावर आले होते.

चिमुकल्यांना कोसळले रडूशाळेतून परत आलेल्या सौरभ आणि रोहित यांना स्फोटात जळालेली पुस्तके पाहून रडू कोसळले. आता आम्ही शाळेत कसे जाणार? असा केविलवाणा प्रश्न ते आपल्या आईला विचारत होते. तर अनिता शिरसाठ यांनाही अश्रृच्या धारा आवरता येत नव्हत्या.

सहा महिन्यापूर्वीच बांधले पत्र्याचे घरजयभीम शिरसाठ हे मिस्त्री काम करतात. त्याच्या मजूरीवरच ते मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाचा गाडा चालवितात. पत्नी अनिता यांनीही संसाराला मदत होईल म्हणून साड्यांचा व्यवसाय सुुरु केला होता. सहा महिन्यापूर्वीच डोक्यावर हक्काचे छत असावे म्हणून त्यांनी पत्र्याचे घर बांधले होते. परंतु आगीने होत्याचे नव्हते केले.

टॅग्स :Nandedनांदेडfireआग