शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

नांदेडमध्ये वाळू माफियांना दणका; 34 शेतकऱ्यांसह 438 बिहारींविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 11:07 IST

गोदावरी काठी असलेल्या भणगी गावातील शेतामध्ये 34 शेतकऱ्यांनी  बिहारी  टोळ्यांना राहण्याची, खाण्याची  व्यवस्था केली होती.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांनी मध्यरात्री नांदेड व मुदखेड तालुक्यात कारवाई करत 200 ब्रास वाळू  जप्त  केली होती. पावसाळा संपताच हजारो बिहारी टोळ्यांनी गोदावरी नदीचा ताबा घेतला होता

- अनुराग पोवळे नांदेड - जिल्ह्यात गोदावरी नदीतून नांदेड, मुदखेड, उमरी, लोहा, नायगाव आदी तालुक्यातून बिहारी टोळीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जात होता. खुद्द जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांनी मध्यरात्री नांदेड व मुदखेड तालुक्यात कारवाई करत 200 ब्रास वाळू  जप्त  केली होती. या कारवाईत नांदेड तालुक्यातील भणगी येथील 34 शेतकऱ्यांसह 438 बिहारी मजूरांविरुद्ध नांदेड ग्रामीण ठाण्यात चोरी, पर्यावरण अधिनियम आदी कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

जिल्ह्यात दोन वर्षांपासून वाळू लिलाव न झाल्याने अवैध वाळू उपशाला ऊत आला  होता. कोरोना संकटासह इतर कारणांमुळे या वाळू माफियाकडे महसूल विभागाने दुर्लक्षच केले होते. या  वाळू माफियानी स्थानिक तलाठी,मंडळ अधिकारी यासह नायब तहसीलदारांशी संधान साधून आपले चांगभले केले. विशेष म्हणजे या  वाळू उपशासाठी पहिल्यांदाच बिहारी टोळ्यांचा वापर सुरु केला आहे. पावसाळा संपताच हजारो बिहारी टोळ्यांनी गोदावरी नदीचा ताबा घेतला होता. बांबू व तरफ्यांच्या सहायाने वाळू उपसा केला जात होता. 

     जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी 14 डिसेंबरच्या रात्री मुदखेड तालुक्यातील ब्राह्मणवाडा, नांदेड तालुक्यातील वांगी, नागापुर यासह भणगी येथे पोलीस फौजफाटा घेवून मोठी  कारवाई केली होती. तीन दिवस  ही  कारवाई सुरुच होती. गोदावरी काठी असलेल्या भणगी गावातील शेतामध्ये 34 शेतकऱ्यांनी  बिहारी  टोळ्यांना राहण्याची, खाण्याची  व्यवस्था केली होती. महसूल आणि पोलिसांनी या जागांचे संयुक्त पंचनामे केले. या ठिकाणाहून शेतकरी बिहारी टोळ्यांच्या माध्यमातून अवैध वाळू उपसा करित होते. या प्रकरणी विष्णुपुरीचे मंडळ अधिकारी कोंडिबा नागरवाड यांच्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलिसांनी 34 शेतकऱ्यांसह 438 बिहारीविरुद्ध चोरी, पर्यावरण सरक्षण अधिनियम, महसूल अधिनियम आदी कलमानुसार गुन्हा  दाखल  केला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक कुंडगीर हे करीत आहेत.    दरम्यान  जिल्ह्यात  यापूर्वी बिहारी टोळीविरुद्ध मुदखेड आणि  उमरी पोलिसांनी  गुन्हे दाखल केले आहेत.  पण दुसरीकडे  सोनखेड पोलीस ठाणे आणि  लोहा  तहसीलच्या सहकार्याने बेटसांगवी येथे अवैध वाळू उपसा करणाऱ्या 12 बिहारी मजूराना समज देऊन सोडण्यात आले हेही विशेष. जिल्ह्यात बिहारी टोळ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले जात असताना सोनखेड पोलिसांनी या  बिहारीना कोणती समज दिली असावी याबाबत चर्चा सुरु आहे.

टॅग्स :sandवाळूNandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेड