शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

नांदेडमध्ये वाळू माफियांना दणका; 34 शेतकऱ्यांसह 438 बिहारींविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 11:07 IST

गोदावरी काठी असलेल्या भणगी गावातील शेतामध्ये 34 शेतकऱ्यांनी  बिहारी  टोळ्यांना राहण्याची, खाण्याची  व्यवस्था केली होती.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांनी मध्यरात्री नांदेड व मुदखेड तालुक्यात कारवाई करत 200 ब्रास वाळू  जप्त  केली होती. पावसाळा संपताच हजारो बिहारी टोळ्यांनी गोदावरी नदीचा ताबा घेतला होता

- अनुराग पोवळे नांदेड - जिल्ह्यात गोदावरी नदीतून नांदेड, मुदखेड, उमरी, लोहा, नायगाव आदी तालुक्यातून बिहारी टोळीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जात होता. खुद्द जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांनी मध्यरात्री नांदेड व मुदखेड तालुक्यात कारवाई करत 200 ब्रास वाळू  जप्त  केली होती. या कारवाईत नांदेड तालुक्यातील भणगी येथील 34 शेतकऱ्यांसह 438 बिहारी मजूरांविरुद्ध नांदेड ग्रामीण ठाण्यात चोरी, पर्यावरण अधिनियम आदी कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

जिल्ह्यात दोन वर्षांपासून वाळू लिलाव न झाल्याने अवैध वाळू उपशाला ऊत आला  होता. कोरोना संकटासह इतर कारणांमुळे या वाळू माफियाकडे महसूल विभागाने दुर्लक्षच केले होते. या  वाळू माफियानी स्थानिक तलाठी,मंडळ अधिकारी यासह नायब तहसीलदारांशी संधान साधून आपले चांगभले केले. विशेष म्हणजे या  वाळू उपशासाठी पहिल्यांदाच बिहारी टोळ्यांचा वापर सुरु केला आहे. पावसाळा संपताच हजारो बिहारी टोळ्यांनी गोदावरी नदीचा ताबा घेतला होता. बांबू व तरफ्यांच्या सहायाने वाळू उपसा केला जात होता. 

     जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी 14 डिसेंबरच्या रात्री मुदखेड तालुक्यातील ब्राह्मणवाडा, नांदेड तालुक्यातील वांगी, नागापुर यासह भणगी येथे पोलीस फौजफाटा घेवून मोठी  कारवाई केली होती. तीन दिवस  ही  कारवाई सुरुच होती. गोदावरी काठी असलेल्या भणगी गावातील शेतामध्ये 34 शेतकऱ्यांनी  बिहारी  टोळ्यांना राहण्याची, खाण्याची  व्यवस्था केली होती. महसूल आणि पोलिसांनी या जागांचे संयुक्त पंचनामे केले. या ठिकाणाहून शेतकरी बिहारी टोळ्यांच्या माध्यमातून अवैध वाळू उपसा करित होते. या प्रकरणी विष्णुपुरीचे मंडळ अधिकारी कोंडिबा नागरवाड यांच्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलिसांनी 34 शेतकऱ्यांसह 438 बिहारीविरुद्ध चोरी, पर्यावरण सरक्षण अधिनियम, महसूल अधिनियम आदी कलमानुसार गुन्हा  दाखल  केला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक कुंडगीर हे करीत आहेत.    दरम्यान  जिल्ह्यात  यापूर्वी बिहारी टोळीविरुद्ध मुदखेड आणि  उमरी पोलिसांनी  गुन्हे दाखल केले आहेत.  पण दुसरीकडे  सोनखेड पोलीस ठाणे आणि  लोहा  तहसीलच्या सहकार्याने बेटसांगवी येथे अवैध वाळू उपसा करणाऱ्या 12 बिहारी मजूराना समज देऊन सोडण्यात आले हेही विशेष. जिल्ह्यात बिहारी टोळ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले जात असताना सोनखेड पोलिसांनी या  बिहारीना कोणती समज दिली असावी याबाबत चर्चा सुरु आहे.

टॅग्स :sandवाळूNandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेड