शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

हळदीला भाव नसल्याने शेतकरी झाला हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:11 IST

हळदीला गतवर्षी ७ ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता़ त्या तुलनेत सुरुवातीच्या काळात चांगला भाव असला तरी हळदीला सध्या मात्र सहा ते साडेसहा हजार प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

ठळक मुद्देश्रीक्षेत्र माहूर तालुका : अपुऱ्या पावसाने उत्पादनही घटलेउत्पादन खर्च व उत्पन्नाचा ताळमेळ लागेना

श्रीक्षेत्र माहूर : हळदीला गतवर्षी ७ ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता़ त्या तुलनेत सुरुवातीच्या काळात चांगला भाव असला तरी हळदीला सध्या मात्र सहा ते साडेसहा हजार प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.अत्यल्प पर्जन्यवृष्टी झाल्याने एकरी उत्पादनात मोठी घट झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. बºयापैकी पाऊस झाला तर एकरी किमान १५ ते २० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते़ मात्र यावर्षी आॅगस्ट २०१८ मध्ये आलेल्या महापुरानंतर वरूणराजाने अवकृपा केल्याने शेतक-यांच्या शेतातील पिकांच्या उत्पादनावर मोठा प्रतिकूल परिणाम झाला असून हळदीचे उत्पादन निम्म्यावरच आले आहे. त्यातच भाव कमी मिळाल्याने बळीराजाचे वार्षिक आर्थिक नियोजन बिघडले असून बळीराजात कहीं खुशी कहीं गम असे वातावरण दिसून येत आहे.माहूर तालुक्यात हळदीचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. तालुक्यातील ४१५ हेक्टर क्षेत्रांवर हळद पिकाची लागवड केली आहे. एका एकरासाठी जवळपास ८ ते १० क्विंटल हळदीचे बियाणे लागते. तसेच प्रतिएकरासाठी बियाणापासून ते लागवडीपर्यंतचा उत्पादन खर्च विचारात घेतला तर सध्या बाजारपेठेमध्ये हळदीला मिळत असलेले भाव परवडणारे नसल्याची प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत. गतवर्षी १५ ते २० क्विंटल उतारा असलेले हळदीचे उत्पन्न यावर्षी एकरी १० ते १५ क्विंटल एवढाच उतारा येत आहे.पाण्याच्या उपलब्धतेचा अभाव याचा देखील हळद उत्पादनावर परिणाम झाला आहे. ६ ते साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असून उत्पादनखर्च व मिळालेल्या उत्पन्नाचा ताळमेळ लावताना बळीराजाच्या नाकीनऊ येत आहेत. शेतातील मिळणा-या उत्पादनातून आपले वार्षिक आर्थिक नियोजन करण्याच्या अपेक्षा बाळगून असलेल्या शेतक-यांचा अपेक्षाभंग झाल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी हळदीचे पीक हे हमी उत्पन देणारे पीक असल्यानेच प्रतिवर्षी हळदीचे लागवड क्षेत्र वाढत असल्याचे दिसत आहे. हळद उत्पादक शेतकºयांच्या अडचणीकडे प्रशासन मात्र दुर्लक्ष करताना दिसत आहे.

यावर्षी अत्यल्प पावसाने हळद पिकाचे उत्पन्न घटले असून जलस्त्रोत आटल्यामुळे पाणी देण्याससुद्धा पुरेसे पाणी बसल्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत उत्पन्न निम्म्याने घटले असून सुरुवातीच्या काळात चांगला भाव होता. मात्र नंतरच्या काळात बाजारात आवक वाढल्यानंतर भाव पाडल्याने मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे-विनायक पुंडलिकराव कुटे, हळद उत्पादक शेतकरी, सायफळ

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीMarketबाजारMONEYपैसा