शहरं
Join us  
Trending Stories
1
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
3
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
4
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
5
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
6
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
7
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
8
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
9
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
10
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
11
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
13
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
14
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
15
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
16
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
17
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
18
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
19
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
20
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले

हळदीला भाव नसल्याने शेतकरी झाला हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:11 IST

हळदीला गतवर्षी ७ ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता़ त्या तुलनेत सुरुवातीच्या काळात चांगला भाव असला तरी हळदीला सध्या मात्र सहा ते साडेसहा हजार प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

ठळक मुद्देश्रीक्षेत्र माहूर तालुका : अपुऱ्या पावसाने उत्पादनही घटलेउत्पादन खर्च व उत्पन्नाचा ताळमेळ लागेना

श्रीक्षेत्र माहूर : हळदीला गतवर्षी ७ ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता़ त्या तुलनेत सुरुवातीच्या काळात चांगला भाव असला तरी हळदीला सध्या मात्र सहा ते साडेसहा हजार प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.अत्यल्प पर्जन्यवृष्टी झाल्याने एकरी उत्पादनात मोठी घट झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. बºयापैकी पाऊस झाला तर एकरी किमान १५ ते २० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते़ मात्र यावर्षी आॅगस्ट २०१८ मध्ये आलेल्या महापुरानंतर वरूणराजाने अवकृपा केल्याने शेतक-यांच्या शेतातील पिकांच्या उत्पादनावर मोठा प्रतिकूल परिणाम झाला असून हळदीचे उत्पादन निम्म्यावरच आले आहे. त्यातच भाव कमी मिळाल्याने बळीराजाचे वार्षिक आर्थिक नियोजन बिघडले असून बळीराजात कहीं खुशी कहीं गम असे वातावरण दिसून येत आहे.माहूर तालुक्यात हळदीचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. तालुक्यातील ४१५ हेक्टर क्षेत्रांवर हळद पिकाची लागवड केली आहे. एका एकरासाठी जवळपास ८ ते १० क्विंटल हळदीचे बियाणे लागते. तसेच प्रतिएकरासाठी बियाणापासून ते लागवडीपर्यंतचा उत्पादन खर्च विचारात घेतला तर सध्या बाजारपेठेमध्ये हळदीला मिळत असलेले भाव परवडणारे नसल्याची प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत. गतवर्षी १५ ते २० क्विंटल उतारा असलेले हळदीचे उत्पन्न यावर्षी एकरी १० ते १५ क्विंटल एवढाच उतारा येत आहे.पाण्याच्या उपलब्धतेचा अभाव याचा देखील हळद उत्पादनावर परिणाम झाला आहे. ६ ते साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असून उत्पादनखर्च व मिळालेल्या उत्पन्नाचा ताळमेळ लावताना बळीराजाच्या नाकीनऊ येत आहेत. शेतातील मिळणा-या उत्पादनातून आपले वार्षिक आर्थिक नियोजन करण्याच्या अपेक्षा बाळगून असलेल्या शेतक-यांचा अपेक्षाभंग झाल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी हळदीचे पीक हे हमी उत्पन देणारे पीक असल्यानेच प्रतिवर्षी हळदीचे लागवड क्षेत्र वाढत असल्याचे दिसत आहे. हळद उत्पादक शेतकºयांच्या अडचणीकडे प्रशासन मात्र दुर्लक्ष करताना दिसत आहे.

यावर्षी अत्यल्प पावसाने हळद पिकाचे उत्पन्न घटले असून जलस्त्रोत आटल्यामुळे पाणी देण्याससुद्धा पुरेसे पाणी बसल्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत उत्पन्न निम्म्याने घटले असून सुरुवातीच्या काळात चांगला भाव होता. मात्र नंतरच्या काळात बाजारात आवक वाढल्यानंतर भाव पाडल्याने मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे-विनायक पुंडलिकराव कुटे, हळद उत्पादक शेतकरी, सायफळ

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीMarketबाजारMONEYपैसा