शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

किनवट-माहूर तालुक्यांत भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 18:49 IST

किनवट, माहूर तालुक्यांतील डोंगरदऱ्यातील वाडी, वस्ती, तांडे पाण्यासाठी होरपळले आहेत़ मे महिन्यातील प्रखर उन्हाच्या चटक्यांसोबतच पाणीटंचाईने येथील नागरिक मेटाकुटीला आले आहेत़

नांदेड : किनवट, माहूर तालुक्यांतील डोंगरदऱ्यातील वाडी, वस्ती, तांडे पाण्यासाठी होरपळले आहेत़ मे महिन्यातील प्रखर उन्हाच्या चटक्यांसोबतच पाणीटंचाईने येथील नागरिक मेटाकुटीला आले आहेत़ दरवर्षी उन्हाळ्यात घोटभर पाण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे़ 

किनवट : पैनगंगा नदी व मोठ्या नाल्याच्या काठावरील किनवट शहरातील पाणीपातळी पार खोल गेल्याने शहराच्या अनेक भागांत पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे़ जवळपास ११ वस्त्यांमध्ये पाणीटंचाईने गंभीर रूप धारण केले आहे़ शहरात सहा टँकरने पाणीपुरवठा सुरू असून टँकर येताच पाणी मिळविण्यासाठी झुंबड उडत असून पाणी मिळविण्यासाठी धावपळ सुरू होते़ 

दररोज तीन हजार लिटरच्या तीन व पाच हजार लिटरच्या तीन अशा एकूण सहा टँकरने २ लाख ४० हजार लिटर पाण्याचा पुरवठा होत आहे़ २८ हजार ४५४ लोकसंख्या असलेल्या शहरात कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याचा प्रश्न दरवर्षी  उन्हाळ्यात निर्माण होतो़ ३० विंधन विहिरींद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचे नगर परिषद सांगत आहे़ मात्र रामनगर, जुनी कापडलाईन, सराफा लाईन, जफारखान नगर, धोबी गल्ली, भोई गल्ली, बाबा रमजान, विठ्ठलेश्वर मंदिर, लोहार गल्ली, मोमीनगुडा, साईनगर, इस्लामपुरा, गंगानगरसह अन्य भागात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे़ नगराध्यक्ष आनंद मच्छेवार व उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार यांच्या टीमने पाणी कसे मिळेल यासाठी प्रयत्न चालविले आहेत.

आ़प्रदीप नाईक यांनीसुद्धा पाणीटंचाई पाहता आमदार निधीतून तीन टँकर नगरपालिकेला देऊन  दिलसा दिला़ उल्लेखनीय म्हणजे, पैनगंगा नदीवर कोल्हापुरी बंधारा असून वेळीच वॉल्व्ह व गेट न टाकल्याने बंधारा कुचकामी ठरत आहे़ शिवाय शहरालगतच्या नाल्यावर दोन बंधारे असूनही त्याही बंधाऱ्याची तीच परिस्थिती आहे़ बंधारे बांधून मोकळे झाले असले तरी बंधाऱ्यात पाणी साठते की नाही, याचे ना नगरपालिकेला देणे आहे ना संबंधित खात्याला? त्यामुळे बंधारे बांधून उपयोग काय? असा प्रश्न विचारला जात आहे़ पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असले तरी भूगर्भच कोरडाठाक असल्याने पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे़

श्रीक्षेत्र माहूर : तालुक्यातील रूई येथे मागील दोन महिन्यांपासून पाणीटंचाईने तीव्र रूप धारण केले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी  पायपीट कराव्या लागणाऱ्या गावकऱ्यांना घागरभर पाणी दुरापास्तच झाले होते. ही परिस्थिती समजून माजी सरपंच गुमानसिंग चुंगडे यांनी आपल्या शेतातून स्वखर्चाने पाईपलाईन केली. स्वतंत्र नळाद्वारे गावात पाणीपुरवठा सुरू केला. त्यामुळे गावकऱ्यांचे चेहरे समाधानाने उजळले आहेत.

माहूर तालुक्यात मागील तीन वर्षांपासून सततचा दुष्काळ पडत आहे. यंदा तर सरासरीपेक्षा निम्म्याहूनही खूप कमी प्रमाणात पाऊस झाला. परिणामी डिसेंबर महिन्यातच नदी- नाले कोरडे पडले. विहिरी आटल्या, हातपंप (बोअरवेल) पाण्याच्या जागी हवा फेकू लागले, अशी भयावह परिस्थिती माहूर शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांत निर्माण झाली. काही गावांत पाणीपुरवठ्याच्या योजना अर्धवट तर काही गावांतील पाणीपुरवठा पैनगंगा नदीवर अवलंबून असल्याने कोरडीठाक पडलेली नदी पाणीपुरवठा योजनेसाठी आडकाठी झाली. अशात शासनाचे टँकर काही गावांत तर काही गावांत खाजगी टँकर राजकीय व सामाजिक कार्यकर्ते आपआपल्या परिने  पाठवित आहेत. परंतु, मौजे रुई येथील माजी सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष गुमानसिंग चुंगडे यांनी गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शेतातील विहिरीतून पाईपलाईनद्वारे पाणी गावात आणले व घरासमोर नळाची स्वतंत्र व्यवस्था करून गावकऱ्यांसाठी हे नळ सार्वजनिक केले. त्यामुळे गावातील नागरिकांची तहान भागत असून गुमानसिंग यांच्या या स्तुत्य उपक्रमाने पाणीटंचाईवर मात करण्यात येत आहे. त्यांच्या या कार्याचे कौतुक आ़ प्रदीप नाईक, जि़प़चे उपाध्यक्ष समाधान जाधव, तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, गटविकास अधिकारी यु़डी़मंडाळे यांनी केले आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीटंचाईNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेड