शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

किनवट-माहूर तालुक्यांत भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 18:49 IST

किनवट, माहूर तालुक्यांतील डोंगरदऱ्यातील वाडी, वस्ती, तांडे पाण्यासाठी होरपळले आहेत़ मे महिन्यातील प्रखर उन्हाच्या चटक्यांसोबतच पाणीटंचाईने येथील नागरिक मेटाकुटीला आले आहेत़

नांदेड : किनवट, माहूर तालुक्यांतील डोंगरदऱ्यातील वाडी, वस्ती, तांडे पाण्यासाठी होरपळले आहेत़ मे महिन्यातील प्रखर उन्हाच्या चटक्यांसोबतच पाणीटंचाईने येथील नागरिक मेटाकुटीला आले आहेत़ दरवर्षी उन्हाळ्यात घोटभर पाण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे़ 

किनवट : पैनगंगा नदी व मोठ्या नाल्याच्या काठावरील किनवट शहरातील पाणीपातळी पार खोल गेल्याने शहराच्या अनेक भागांत पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे़ जवळपास ११ वस्त्यांमध्ये पाणीटंचाईने गंभीर रूप धारण केले आहे़ शहरात सहा टँकरने पाणीपुरवठा सुरू असून टँकर येताच पाणी मिळविण्यासाठी झुंबड उडत असून पाणी मिळविण्यासाठी धावपळ सुरू होते़ 

दररोज तीन हजार लिटरच्या तीन व पाच हजार लिटरच्या तीन अशा एकूण सहा टँकरने २ लाख ४० हजार लिटर पाण्याचा पुरवठा होत आहे़ २८ हजार ४५४ लोकसंख्या असलेल्या शहरात कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याचा प्रश्न दरवर्षी  उन्हाळ्यात निर्माण होतो़ ३० विंधन विहिरींद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचे नगर परिषद सांगत आहे़ मात्र रामनगर, जुनी कापडलाईन, सराफा लाईन, जफारखान नगर, धोबी गल्ली, भोई गल्ली, बाबा रमजान, विठ्ठलेश्वर मंदिर, लोहार गल्ली, मोमीनगुडा, साईनगर, इस्लामपुरा, गंगानगरसह अन्य भागात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे़ नगराध्यक्ष आनंद मच्छेवार व उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार यांच्या टीमने पाणी कसे मिळेल यासाठी प्रयत्न चालविले आहेत.

आ़प्रदीप नाईक यांनीसुद्धा पाणीटंचाई पाहता आमदार निधीतून तीन टँकर नगरपालिकेला देऊन  दिलसा दिला़ उल्लेखनीय म्हणजे, पैनगंगा नदीवर कोल्हापुरी बंधारा असून वेळीच वॉल्व्ह व गेट न टाकल्याने बंधारा कुचकामी ठरत आहे़ शिवाय शहरालगतच्या नाल्यावर दोन बंधारे असूनही त्याही बंधाऱ्याची तीच परिस्थिती आहे़ बंधारे बांधून मोकळे झाले असले तरी बंधाऱ्यात पाणी साठते की नाही, याचे ना नगरपालिकेला देणे आहे ना संबंधित खात्याला? त्यामुळे बंधारे बांधून उपयोग काय? असा प्रश्न विचारला जात आहे़ पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असले तरी भूगर्भच कोरडाठाक असल्याने पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे़

श्रीक्षेत्र माहूर : तालुक्यातील रूई येथे मागील दोन महिन्यांपासून पाणीटंचाईने तीव्र रूप धारण केले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी  पायपीट कराव्या लागणाऱ्या गावकऱ्यांना घागरभर पाणी दुरापास्तच झाले होते. ही परिस्थिती समजून माजी सरपंच गुमानसिंग चुंगडे यांनी आपल्या शेतातून स्वखर्चाने पाईपलाईन केली. स्वतंत्र नळाद्वारे गावात पाणीपुरवठा सुरू केला. त्यामुळे गावकऱ्यांचे चेहरे समाधानाने उजळले आहेत.

माहूर तालुक्यात मागील तीन वर्षांपासून सततचा दुष्काळ पडत आहे. यंदा तर सरासरीपेक्षा निम्म्याहूनही खूप कमी प्रमाणात पाऊस झाला. परिणामी डिसेंबर महिन्यातच नदी- नाले कोरडे पडले. विहिरी आटल्या, हातपंप (बोअरवेल) पाण्याच्या जागी हवा फेकू लागले, अशी भयावह परिस्थिती माहूर शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांत निर्माण झाली. काही गावांत पाणीपुरवठ्याच्या योजना अर्धवट तर काही गावांतील पाणीपुरवठा पैनगंगा नदीवर अवलंबून असल्याने कोरडीठाक पडलेली नदी पाणीपुरवठा योजनेसाठी आडकाठी झाली. अशात शासनाचे टँकर काही गावांत तर काही गावांत खाजगी टँकर राजकीय व सामाजिक कार्यकर्ते आपआपल्या परिने  पाठवित आहेत. परंतु, मौजे रुई येथील माजी सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष गुमानसिंग चुंगडे यांनी गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शेतातील विहिरीतून पाईपलाईनद्वारे पाणी गावात आणले व घरासमोर नळाची स्वतंत्र व्यवस्था करून गावकऱ्यांसाठी हे नळ सार्वजनिक केले. त्यामुळे गावातील नागरिकांची तहान भागत असून गुमानसिंग यांच्या या स्तुत्य उपक्रमाने पाणीटंचाईवर मात करण्यात येत आहे. त्यांच्या या कार्याचे कौतुक आ़ प्रदीप नाईक, जि़प़चे उपाध्यक्ष समाधान जाधव, तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, गटविकास अधिकारी यु़डी़मंडाळे यांनी केले आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीटंचाईNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेड