शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

किनवट-माहूर तालुक्यांत भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 18:49 IST

किनवट, माहूर तालुक्यांतील डोंगरदऱ्यातील वाडी, वस्ती, तांडे पाण्यासाठी होरपळले आहेत़ मे महिन्यातील प्रखर उन्हाच्या चटक्यांसोबतच पाणीटंचाईने येथील नागरिक मेटाकुटीला आले आहेत़

नांदेड : किनवट, माहूर तालुक्यांतील डोंगरदऱ्यातील वाडी, वस्ती, तांडे पाण्यासाठी होरपळले आहेत़ मे महिन्यातील प्रखर उन्हाच्या चटक्यांसोबतच पाणीटंचाईने येथील नागरिक मेटाकुटीला आले आहेत़ दरवर्षी उन्हाळ्यात घोटभर पाण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे़ 

किनवट : पैनगंगा नदी व मोठ्या नाल्याच्या काठावरील किनवट शहरातील पाणीपातळी पार खोल गेल्याने शहराच्या अनेक भागांत पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे़ जवळपास ११ वस्त्यांमध्ये पाणीटंचाईने गंभीर रूप धारण केले आहे़ शहरात सहा टँकरने पाणीपुरवठा सुरू असून टँकर येताच पाणी मिळविण्यासाठी झुंबड उडत असून पाणी मिळविण्यासाठी धावपळ सुरू होते़ 

दररोज तीन हजार लिटरच्या तीन व पाच हजार लिटरच्या तीन अशा एकूण सहा टँकरने २ लाख ४० हजार लिटर पाण्याचा पुरवठा होत आहे़ २८ हजार ४५४ लोकसंख्या असलेल्या शहरात कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याचा प्रश्न दरवर्षी  उन्हाळ्यात निर्माण होतो़ ३० विंधन विहिरींद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचे नगर परिषद सांगत आहे़ मात्र रामनगर, जुनी कापडलाईन, सराफा लाईन, जफारखान नगर, धोबी गल्ली, भोई गल्ली, बाबा रमजान, विठ्ठलेश्वर मंदिर, लोहार गल्ली, मोमीनगुडा, साईनगर, इस्लामपुरा, गंगानगरसह अन्य भागात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे़ नगराध्यक्ष आनंद मच्छेवार व उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार यांच्या टीमने पाणी कसे मिळेल यासाठी प्रयत्न चालविले आहेत.

आ़प्रदीप नाईक यांनीसुद्धा पाणीटंचाई पाहता आमदार निधीतून तीन टँकर नगरपालिकेला देऊन  दिलसा दिला़ उल्लेखनीय म्हणजे, पैनगंगा नदीवर कोल्हापुरी बंधारा असून वेळीच वॉल्व्ह व गेट न टाकल्याने बंधारा कुचकामी ठरत आहे़ शिवाय शहरालगतच्या नाल्यावर दोन बंधारे असूनही त्याही बंधाऱ्याची तीच परिस्थिती आहे़ बंधारे बांधून मोकळे झाले असले तरी बंधाऱ्यात पाणी साठते की नाही, याचे ना नगरपालिकेला देणे आहे ना संबंधित खात्याला? त्यामुळे बंधारे बांधून उपयोग काय? असा प्रश्न विचारला जात आहे़ पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असले तरी भूगर्भच कोरडाठाक असल्याने पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे़

श्रीक्षेत्र माहूर : तालुक्यातील रूई येथे मागील दोन महिन्यांपासून पाणीटंचाईने तीव्र रूप धारण केले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी  पायपीट कराव्या लागणाऱ्या गावकऱ्यांना घागरभर पाणी दुरापास्तच झाले होते. ही परिस्थिती समजून माजी सरपंच गुमानसिंग चुंगडे यांनी आपल्या शेतातून स्वखर्चाने पाईपलाईन केली. स्वतंत्र नळाद्वारे गावात पाणीपुरवठा सुरू केला. त्यामुळे गावकऱ्यांचे चेहरे समाधानाने उजळले आहेत.

माहूर तालुक्यात मागील तीन वर्षांपासून सततचा दुष्काळ पडत आहे. यंदा तर सरासरीपेक्षा निम्म्याहूनही खूप कमी प्रमाणात पाऊस झाला. परिणामी डिसेंबर महिन्यातच नदी- नाले कोरडे पडले. विहिरी आटल्या, हातपंप (बोअरवेल) पाण्याच्या जागी हवा फेकू लागले, अशी भयावह परिस्थिती माहूर शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांत निर्माण झाली. काही गावांत पाणीपुरवठ्याच्या योजना अर्धवट तर काही गावांतील पाणीपुरवठा पैनगंगा नदीवर अवलंबून असल्याने कोरडीठाक पडलेली नदी पाणीपुरवठा योजनेसाठी आडकाठी झाली. अशात शासनाचे टँकर काही गावांत तर काही गावांत खाजगी टँकर राजकीय व सामाजिक कार्यकर्ते आपआपल्या परिने  पाठवित आहेत. परंतु, मौजे रुई येथील माजी सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष गुमानसिंग चुंगडे यांनी गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शेतातील विहिरीतून पाईपलाईनद्वारे पाणी गावात आणले व घरासमोर नळाची स्वतंत्र व्यवस्था करून गावकऱ्यांसाठी हे नळ सार्वजनिक केले. त्यामुळे गावातील नागरिकांची तहान भागत असून गुमानसिंग यांच्या या स्तुत्य उपक्रमाने पाणीटंचाईवर मात करण्यात येत आहे. त्यांच्या या कार्याचे कौतुक आ़ प्रदीप नाईक, जि़प़चे उपाध्यक्ष समाधान जाधव, तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, गटविकास अधिकारी यु़डी़मंडाळे यांनी केले आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीटंचाईNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेड