शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्हयातील दमदार पाऊस; कुरुळा मंडळात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 14:22 IST

सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ८० महसुल मंडळापैकी १३ महसुली मंडळात मध्यम पावसाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देनांदेड जिल्ह्यात एकूण  २५ महसुली मंडळात पाऊस झाला आहे

नांदेड : जिल्ह्यातील मुखेड,देगलूर, किनवट, कंधार तालुक्यात रविवारी दमदार पाऊस झाला. कंधारमधील कुरुळा मंडळात अतिवृष्टी झाली आहे. 

सर्वाधिक २५.५० मिमी सरासरी  पाऊस देगलूर तालुक्यात झाला आहे. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ८० महसुल मंडळापैकी १३ महसुली मंडळात मध्यम पावसाची नोंद झाली आहे. यात कंधार तालुक्यातील कुरूळा महसुल मंडळात ८० मिलीमीटर पाऊस  झाला आहे.

किनवट तालूक्यातील मांडवी येथेही जोरदार पाऊस झाला असून तिथे ६४ मिलीमीटर म्हणजे अतिवृष्टीच्या काठावर नोंद झाली आहे. शहापूर ४३, शिवणी ३५, जांब ३५, माळेगाव ३२, येवती ३०, देगलूर २८, किनी २८, सगरोळी २८, तामसा २४, मिरखेल २१, तर मातुळ मंडळात २० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. इतर १२ महसुली मंडळात १० ते २० मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामध्ये जाहूर १८, खानापूर १८, माळाकोळी १६, आदमपूर १६, उस्माननगर १५, मुखेड १२, हदगाव १२, निवघा १२, आष्टी १२, लोहा ११, हानेगाव ११

तर हदगाव तालुक्यातील मनाठा मंडळात १० मिली मीटर ईतका पाऊस झाला आहे. नांदेड जिल्ह्यात एकूण  २५ महसुली मंडळात पाऊस झाला आहे. तर अन्य ६५ मंडळात पावसाने उघडीप दिली होती. सोमवारी सकाळपर्यंत जिल्हयात सरासरी ३१३ मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत हा पाऊस ३७.२९ टक्के इतका आहे.

तालुक्यात आता सर्वाधिक पावसाची नोंद कुरूळा झाली आहे.एकूण कुरूळा ३०४ मि.मी. ,उस्माननगर २९३ ,फुलवळ २६१ ,कंधार २३७ ,पेठवडज २१७ व सर्वात कमी बारूळ २०३ मि.मी.झाली आहे.कुरूळा पावसाचे एकमेव कमी कालावधीत त्रिशतक मि.मी.पार करणारे ठरले. अतिवृष्टीमुळे शिवारात जिकडे तिकडे दलदल तयार झाली. सखल भागात सर्वत्र पाणी साचले. नदी ,नाले, तलावात पाणी पातळीत कमालीची वाढ झाली.विशेष म्हणजे गावालगत ऐतिहासिक हेमाडपंथी भवानी मंदिर (शिव पार्वती) आहे.मंदिरा जवळ तलाव आहे. यामध्ये असलेली गाळ काढल्याधे तलावाची खोली जास्त झाली आहे.तरी रात्री झालेल्या पावसामुळे तलाव तुडुंब भरला.

शेत शिवारात पाणी अधिक झाल्याने आता शेती कामाचा खोळंबा झाला आहे.पीके पाण्याखाली आली आहेत.त्यामुळे पाण्याचा वाफसा कधी होईल.असा प्रश्न निर्माण झाला आहे.दि.२० जूलै रोजी दुपारी पुन्हा पावसाने हजेरी लावली.त्यामुळे सोयाबीन पीकाची पाने अगोदरच पिवळी पडत होती.औषधी फवारणी करून हिरवी पाने करण्याचा शेतकरी प्रयत्न करत होते.त्याला मोठी खिळ बसली आहे.

 

टॅग्स :RainपाऊसNandedनांदेड