शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्हयातील दमदार पाऊस; कुरुळा मंडळात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 14:22 IST

सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ८० महसुल मंडळापैकी १३ महसुली मंडळात मध्यम पावसाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देनांदेड जिल्ह्यात एकूण  २५ महसुली मंडळात पाऊस झाला आहे

नांदेड : जिल्ह्यातील मुखेड,देगलूर, किनवट, कंधार तालुक्यात रविवारी दमदार पाऊस झाला. कंधारमधील कुरुळा मंडळात अतिवृष्टी झाली आहे. 

सर्वाधिक २५.५० मिमी सरासरी  पाऊस देगलूर तालुक्यात झाला आहे. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ८० महसुल मंडळापैकी १३ महसुली मंडळात मध्यम पावसाची नोंद झाली आहे. यात कंधार तालुक्यातील कुरूळा महसुल मंडळात ८० मिलीमीटर पाऊस  झाला आहे.

किनवट तालूक्यातील मांडवी येथेही जोरदार पाऊस झाला असून तिथे ६४ मिलीमीटर म्हणजे अतिवृष्टीच्या काठावर नोंद झाली आहे. शहापूर ४३, शिवणी ३५, जांब ३५, माळेगाव ३२, येवती ३०, देगलूर २८, किनी २८, सगरोळी २८, तामसा २४, मिरखेल २१, तर मातुळ मंडळात २० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. इतर १२ महसुली मंडळात १० ते २० मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामध्ये जाहूर १८, खानापूर १८, माळाकोळी १६, आदमपूर १६, उस्माननगर १५, मुखेड १२, हदगाव १२, निवघा १२, आष्टी १२, लोहा ११, हानेगाव ११

तर हदगाव तालुक्यातील मनाठा मंडळात १० मिली मीटर ईतका पाऊस झाला आहे. नांदेड जिल्ह्यात एकूण  २५ महसुली मंडळात पाऊस झाला आहे. तर अन्य ६५ मंडळात पावसाने उघडीप दिली होती. सोमवारी सकाळपर्यंत जिल्हयात सरासरी ३१३ मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत हा पाऊस ३७.२९ टक्के इतका आहे.

तालुक्यात आता सर्वाधिक पावसाची नोंद कुरूळा झाली आहे.एकूण कुरूळा ३०४ मि.मी. ,उस्माननगर २९३ ,फुलवळ २६१ ,कंधार २३७ ,पेठवडज २१७ व सर्वात कमी बारूळ २०३ मि.मी.झाली आहे.कुरूळा पावसाचे एकमेव कमी कालावधीत त्रिशतक मि.मी.पार करणारे ठरले. अतिवृष्टीमुळे शिवारात जिकडे तिकडे दलदल तयार झाली. सखल भागात सर्वत्र पाणी साचले. नदी ,नाले, तलावात पाणी पातळीत कमालीची वाढ झाली.विशेष म्हणजे गावालगत ऐतिहासिक हेमाडपंथी भवानी मंदिर (शिव पार्वती) आहे.मंदिरा जवळ तलाव आहे. यामध्ये असलेली गाळ काढल्याधे तलावाची खोली जास्त झाली आहे.तरी रात्री झालेल्या पावसामुळे तलाव तुडुंब भरला.

शेत शिवारात पाणी अधिक झाल्याने आता शेती कामाचा खोळंबा झाला आहे.पीके पाण्याखाली आली आहेत.त्यामुळे पाण्याचा वाफसा कधी होईल.असा प्रश्न निर्माण झाला आहे.दि.२० जूलै रोजी दुपारी पुन्हा पावसाने हजेरी लावली.त्यामुळे सोयाबीन पीकाची पाने अगोदरच पिवळी पडत होती.औषधी फवारणी करून हिरवी पाने करण्याचा शेतकरी प्रयत्न करत होते.त्याला मोठी खिळ बसली आहे.

 

टॅग्स :RainपाऊसNandedनांदेड