शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

नांदेड जिल्हयातील दमदार पाऊस; कुरुळा मंडळात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 14:22 IST

सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ८० महसुल मंडळापैकी १३ महसुली मंडळात मध्यम पावसाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देनांदेड जिल्ह्यात एकूण  २५ महसुली मंडळात पाऊस झाला आहे

नांदेड : जिल्ह्यातील मुखेड,देगलूर, किनवट, कंधार तालुक्यात रविवारी दमदार पाऊस झाला. कंधारमधील कुरुळा मंडळात अतिवृष्टी झाली आहे. 

सर्वाधिक २५.५० मिमी सरासरी  पाऊस देगलूर तालुक्यात झाला आहे. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ८० महसुल मंडळापैकी १३ महसुली मंडळात मध्यम पावसाची नोंद झाली आहे. यात कंधार तालुक्यातील कुरूळा महसुल मंडळात ८० मिलीमीटर पाऊस  झाला आहे.

किनवट तालूक्यातील मांडवी येथेही जोरदार पाऊस झाला असून तिथे ६४ मिलीमीटर म्हणजे अतिवृष्टीच्या काठावर नोंद झाली आहे. शहापूर ४३, शिवणी ३५, जांब ३५, माळेगाव ३२, येवती ३०, देगलूर २८, किनी २८, सगरोळी २८, तामसा २४, मिरखेल २१, तर मातुळ मंडळात २० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. इतर १२ महसुली मंडळात १० ते २० मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामध्ये जाहूर १८, खानापूर १८, माळाकोळी १६, आदमपूर १६, उस्माननगर १५, मुखेड १२, हदगाव १२, निवघा १२, आष्टी १२, लोहा ११, हानेगाव ११

तर हदगाव तालुक्यातील मनाठा मंडळात १० मिली मीटर ईतका पाऊस झाला आहे. नांदेड जिल्ह्यात एकूण  २५ महसुली मंडळात पाऊस झाला आहे. तर अन्य ६५ मंडळात पावसाने उघडीप दिली होती. सोमवारी सकाळपर्यंत जिल्हयात सरासरी ३१३ मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत हा पाऊस ३७.२९ टक्के इतका आहे.

तालुक्यात आता सर्वाधिक पावसाची नोंद कुरूळा झाली आहे.एकूण कुरूळा ३०४ मि.मी. ,उस्माननगर २९३ ,फुलवळ २६१ ,कंधार २३७ ,पेठवडज २१७ व सर्वात कमी बारूळ २०३ मि.मी.झाली आहे.कुरूळा पावसाचे एकमेव कमी कालावधीत त्रिशतक मि.मी.पार करणारे ठरले. अतिवृष्टीमुळे शिवारात जिकडे तिकडे दलदल तयार झाली. सखल भागात सर्वत्र पाणी साचले. नदी ,नाले, तलावात पाणी पातळीत कमालीची वाढ झाली.विशेष म्हणजे गावालगत ऐतिहासिक हेमाडपंथी भवानी मंदिर (शिव पार्वती) आहे.मंदिरा जवळ तलाव आहे. यामध्ये असलेली गाळ काढल्याधे तलावाची खोली जास्त झाली आहे.तरी रात्री झालेल्या पावसामुळे तलाव तुडुंब भरला.

शेत शिवारात पाणी अधिक झाल्याने आता शेती कामाचा खोळंबा झाला आहे.पीके पाण्याखाली आली आहेत.त्यामुळे पाण्याचा वाफसा कधी होईल.असा प्रश्न निर्माण झाला आहे.दि.२० जूलै रोजी दुपारी पुन्हा पावसाने हजेरी लावली.त्यामुळे सोयाबीन पीकाची पाने अगोदरच पिवळी पडत होती.औषधी फवारणी करून हिरवी पाने करण्याचा शेतकरी प्रयत्न करत होते.त्याला मोठी खिळ बसली आहे.

 

टॅग्स :RainपाऊसNandedनांदेड