शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

माहूर तालुक्यातील हरडफमध्ये पावसाचे थैमान; ३० घरांमध्ये तीन दिवसांपासून पेटली नाही चूल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 13:48 IST

हरडफ आणि परिसरात सलग तीन दिवस पावसाने थैमान घातल्याने उभी पिके साफ झाली.

ठळक मुद्दे पुरामुळे ४० घरांचे नुकसान झाले आहे.३० घरांमध्ये पाणी शिरल्याने तीन दिवसांपासून या घरांत चूल पेटलेली नाही.

- नितेश बनसोडे

श्रीक्षेत्र माहूर  (जि. नांदेड) : हरडफ आणि परिसरात सलग तीन दिवस पावसाने थैमान घातल्याने उभी पिके साफ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला. पुरामुळे ४० घरांचे नुकसान झाले आहे. ३० घरांमध्ये पाणी शिरल्याने तीन दिवसांपासून या घरांत चूल पेटलेली नाही.  

मागील वर्षी माहूर आणि किनवट तालुक्याकडे पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांना एप्रिल-मे महिन्यात  टंचाईच्या झळा सोसाव्या लागल्या.  यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी आनंदीत असतानाच १५ आणि १६ आॅगस्ट रोजी मुसळधार पाऊस झाला आणि होत्याचे नव्हते झाले. या पावसाचा सर्वाधिक फटका हरडफ या गावाला बसला. हे माहूर या तालुका ठिकाणापासून १६ कि.मी. अंतरावरील हे गाव.  सुमारे १७०० लोकसंख्या असलेल्या या गावात ४०५ कुटुंबे वास्तव्यास आहेत. बहुतांश कुटुंबांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे.

१५ आॅगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली आणि सलग २० तास तो कोसळला. हरडफ गाव व हरडफ तांडा यांच्यामध्ये असलेल्या नाल्याला पूर आला आणि  बघता-बघता गावातील ४० हून अधिक घरात हे पाणी शिरले. पुराच्या पाण्यामुळे या घरांत कमरेइतके पाणी साचले. ३० कुटुंबे अक्षरश: उघड्यावर आली. या कुटुंबांच्या राहण्याची तात्पुरती व्यवस्था ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामपंचायत व अंगणवाडीमध्ये करण्यात आली.

गावातील स्वस्त धान्य दुकानदार बेबीबाई सुभाष टनमने व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी विस्थापितांच्या जेवणाची सोय केली तर रेणुकादेवी संस्थानने खाद्य पदार्थांबरोबरच साडी-चोळीचेही वाटप केले. ग्रामस्थांनी माणुसकीच्या भावनेने मागील दोन-तीन दिवसांपासून मदत केली असली तरीही ती तुटपुंजी असल्याच्या भावना या विस्थापितांनी व्यक्त केल्या. पुराची माहिती समजल्यानंतर आ. प्रदीप नाईक यांच्यासह जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव, उपविभागीय अधिकारी शक्ती कदम, तहसीलदार विक्रम राजपूत आदींनी गावाचा तातडीने दौरा करुन ग्रामस्थांना दिलासा दिला. मात्र ठोस मदत अद्यापपर्यंत  भेटलेली नाही. 

पावसाने सगळेच गणित बिघडविलेहरडफ परिसरातील शेतकरी ज्वारी, कापूस, तुरीसह सोयाबिनचे पीक मोठ्या प्रमाणात घेतात. यंदा समाधानकारक पाऊस असल्याने ही पिकेही चांगली होती. मात्र मुसळधार पावसाने सगळेच गणित बिघडविले. गावशिवारातील ४०७ हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे ८५ टक्के शेतशिवार पाण्याखाली गेला असून उभ्या पिकांचे नुकसान पाहावत नसल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.   

दोन घोट पाण्यासाठी कासावीसआभाळ फाटावे, असा पाऊस झाला असला तरी गावकऱ्यांंना पिण्याच्या दोन घोट पाण्यासाठी कासावीस व्हावे लागत आहे. हरडफ गावाला पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देणारी सार्वजनिक पाणी पुरवठ्याची विहिर गावाशेजारच्या नाल्यावर आहे. पुराचे पाणी या विहिरीत घुसल्याने ग्रामपंचायतीने गावाचा पाणी पुरवठा बंद केला आहे. त्यामुळेच शुद्ध पाणी मिळणेही ग्रामस्थांना मुश्कील झाले आहे. येत्या आठ दिवसांत गावचा पाणी पुरवठा सुरळीत करू, असे सरपंच सयाबाई करपते यांनी सांगितले.

२८ हजार हेक्टर क्षेत्र बाधित१५ ते १७ आॅगस्ट या कालावधीत झालेल्या मुसळधार पावसाचा तडाखा किनवटसह माहूर तालुक्याला सोसावा लागला. अनेक पिके पाण्याखाली गेली.  पुराच्या पाण्यामुळे शेतजमिनी खरडल्या गेल्या. या नुकसानीबाबत कृषी विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी ८१ टक्के पिके बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. माहूर तालुक्यात ३४ हजार ६४९ हेक्टर क्षेत्रावर खरिप पेरा झाला होता. त्यातील २८ हजार ३४५ हेक्टर क्षेत्र ३३ टक्याहून अधिक  बाधित झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी ए.एम. पिंपळगावकर यांनी दिली. 

टॅग्स :RainपाऊसNandedनांदेडagricultureशेतीFarmerशेतकरी