शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
3
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
4
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
6
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
7
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
8
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
9
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
10
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
11
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
12
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
13
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
14
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
15
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
16
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
17
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
18
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
19
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
20
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

डोंगराळ, दुर्गम भागातही उमटविला आरोग्यसेवेचा ठसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 01:14 IST

कंधार तालुका डोंगराळ, दुर्गम भागानी व्यापला आहे. आरोग्य सुविधेचा लाभ घेण्यासाठी जशी ओढाताण होते.तशीच सुविधा देत असताना कसरत करावी लागते. आंबुलगा उपकेंद्रातील आरोग्य सेविका अहिल्या रणखांब यांंनी आरोग्यसेवेचा ठसा उमटविला आहे.

गंगाधर तोगरेकंधार : कंधार तालुका डोंगराळ, दुर्गम भागानी व्यापला आहे. आरोग्य सुविधेचा लाभ घेण्यासाठी जशी ओढाताण होते.तशीच सुविधा देत असताना कसरत करावी लागते. आंबुलगा उपकेंद्रातील आरोग्य सेविका अहिल्या रणखांब यांंनी आरोग्यसेवेचा ठसा उमटविला आहे. दुर्गम भागातील महिलांसाठी त्यांनी आरोग्यसेवेची घट्ट वीण विणली आहे. आरोग्यसेवेचा त्यांचा नऊ गावचा धावता प्रवास थक्क करणारा असाच आहे.ग्रामीण भागात दळणवळणाची सुविधा आजही तोकडी आहे. रस्ते, वाहन हा कायम कळीचा मुद्या ठरत आला आहे. रात्री-अपरात्री वाडी-तांड्यावर आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर तारांबळ उडते. आरोग्य सुविधा मिळवताना कसरत करावी लागते. गरोदर मातेच्या वेदनेवर औषधोपचार, प्रसूतीची मात्रा देताना उपकेंद्रावर आरोग्यसेविकेची दमछाक होते.डिप्लोमा काळातील ज्ञानाचा कस लागतो. नातेवाईकांना मानसिक धीर द्यावा लागतो. सामान्य कुटुंबांना मायेचा आधार देऊन कार्यकुशलता सेवेतून सिद्ध करावी लागते. त्यात कंत्राटी आरोग्यसेविका अहिल्या रणखांब यांची सेवा लक्षवेधी ठरली आहे.आरोग्यसेविका डिप्लोमा पूर्ण करुन त्या २०१० मध्ये आंबुलगा उपकेंद्रात रूजू झाल्या. आंबुलगा, ब्रम्हवाडी, पिंपळ्याचीवाडी, वाखरडवाडी, वाखरड, टोकवाडी, गऊळ, भोजुचीवाडी, फकिरदरावाडी या गावांसाठी आरोग्यसेवा देताना रूग्णांना दिलासा देण्याची किमया साधली. एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत ८४ गरोदर महिलांची प्रसूती केली. प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर तपासणी, बाळाचे लसीकरण केले. बाळाला ५ वर्षांपर्यंत सेवा अविरत देण्यात आली. कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट सहज पार केले.तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस.पी.ढवळे, तालुका पर्यवेक्षक एस. एम. अली, ता.गट नर्सिंग अधिकारी पद्मीनबाई मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.फरनाज जहॉ, डॉ. वेंकटेश आनलोड, आरोग्य सहाय्यिका टी.एम.जोंधळे यांच्या सहकार्याने सेवेसाठी आत्मबल मिळाले. आणि आरोग्यसेवा देऊन रूग्ण व नातेवाईकांना दिलासा देण्यात यश मिळविले.घरची बेताची आर्थिक परिस्थिती, कुटुंबाची शिक्षणासाठीची प्रेरणा महत्त्वाची ठरली. आर्थिक परिस्थितीचा कधी बाऊ केला नाही. डिप्लोमा करण्यासाठी उसनवारी केली.शासनाचे मानधन तुटपुंजेकोणत्याही रूग्ण व नातेवाईकांनी त्रास दिला नाही. उलट मनोबल वाढविले. दुर्गम भागातील रूग्णांना रात्री-अपरात्री सेवा देत असताना आळस केला नाही, अशी भावना अहिल्या रणखांब यांनी व्यक्त केली. परिस्थितीवर मात करण्याची जिद्द ठेवत आरोग्य सेवा हीच सर्वोत्कृष्ट सेवा असल्याचे मानून यात दाखल झाले.शासन तुटपुंजे मानधन देते. तसेच कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देते.वाढती महागाई असल्याने अपुरे मानधन द्यावे व सेवेत कायम केले तर आर्थिक व कौटुंबिक आधार ठरणार आहे. अन्यथा कामे तेच व कामाचा मोबदला कमी असल्याने आरोग्य सेवेतील महत्त्वाचा घटक दुर्लक्षित राहण्याची भीती आहे.

सेवेची आत्मिक प्रबळ इच्छा, परिस्थितीवर मात करण्याची जिद्द ठेवत आरोग्यसेवा हीच सर्वोत्कृष्ट सेवा असल्याचे मानून यात दाखल झाले. सामान्य रूग्णांना सेवा देताना आंनद वाटला़ कोणत्याही रूग्ण व नातेवाईकांनी त्रास दिला नाही. उलट मनोबल वाढविले. -अहिल्या रणखांब, परिचारिका, प्रा़आक़ेंद्र आंबुलगा

टॅग्स :NandedनांदेडHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल